शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सोशल मीडियाचे भूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:13 IST

काही वर्षांत सर्वसामान्यांच्या हातांमध्ये सहजपणे मोबाईल आले आणि इंटरनेट अतिशय स्वस्त झाले. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा माध्यमांतून लोक स्वत:हून व्यक्त होत आहेत.

काही वर्षांत सर्वसामान्यांच्या हातांमध्ये सहजपणे मोबाईल आले आणि इंटरनेट अतिशय स्वस्त झाले. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा माध्यमांतून लोक स्वत:हून व्यक्त होत आहेत. एकेकाळी प्रसार माध्यमेच लोकांशी संवाद साधत. पण सोशल मीडियाद्वारे प्रत्येक जण इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. भाजपाने २0१४ साली याच माध्यमांचा चाणाक्षपणे वापर करून, काँग्रेसविरोधी वातावरण तयार केले आणि त्यात यशही आले. आता काँग्रेस पक्षही पूर्ण ताकदीनिशी सोशल मीडियात उतरला असून, तो भाजपाविरोधी वातावरण तयार करू पाहत आहे. त्यामुळेच अस्वस्थ झालेले भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका, असे सांगण्याची वेळ आली. हे माध्यम कधी कुणाला साथ देईल आणि कुणाला गाळात घालेल, हे सांगता येत नाही. राजकीय पक्षांचा मुद्दा बाजूला ठेवला तरी या सोशल मीडियाने अनेकांना वेडे केले, ही वस्तुस्थिती आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक जण त्यावर कुणी काय मजकूर टाकला आहे, हे पाहत असतात. आपल्याला आवडलेला, कुणाची प्रशंसा करणारा, प्रसंगी आपणास न आवडणाºया व्यक्तीची बदनामी करणारा मजकूर दुसºयांना वा ग्रुपवर टाकत असतात. तसे करताना शंभरपैकी नव्याण्णव टक्के लोक त्याची सत्यासत्यताही तपासत नाही. त्यामुळेच एड्स, कॅन्सरवर इलाज, वडापाव खाल्ल्याने एड्सची लागण होण्याची शक्यता असा मजकूर नामवंत डॉक्टरांच्या नावाने खपवला जातो. खोटानाटा मजकूर सरसकट पसरवला जातो. त्यातून तणाव निर्माण होऊ शकतो, भावना दुखावू शकतात, धार्मिक विद्वेष वाढू शकतो, बदनामी होते, याचाही विचार होत नाही. आपल्या अंगणातील कचरा दुसºयाच्या अंगणात टाकून देण्याचाच हा प्रकार. हा बेजबाबदारपणा आहे. उत्तर प्रदेशात अशा दोन घटना घडल्या. एकाने पंतप्रधान मोदी यांच्या ‘अच्छे दिन’ची टवाळी करणारी चित्रफित व्हॉट्सअ‍ॅपवर टाकली. दुसºयाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर तो सामनाच फिक्स होता आणि स्वत:च्या पराभवासाठी भारतीय संघाने पैसे घेतले, असा मजकूर टाकला. असा मजकूर टाकणे अतिशय गैर आहे. पण पोलिसांनी या प्रकरणांत खूप घाई केली. क्रिकेटचा सामना फिक्स असल्याचा मजकूर टाकणाºयावर पोलिसांनी देशद्रोहाचा व धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले. मोदींवर भाष्य करणाºयावरही गुन्हा दाखल केला. राजकीय नेत्यांवरील टीका वा टवाळीकडे पोलीस बदनामी म्हणून पाहणार असतील, तर काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी यांना देशद्रोही म्हणवणाºयांवर कारवाई केल्याचे एकही उदाहरण दिसत नाही. काहींवरील टीका मान्य आणि काहींवरील अमान्य अशी दुहेरी भूमिका चुकीची आहे. पोलीस नेहमीच राजकीय नेतृत्वाच्या कलेने चालतात. ‘साहेब’ सांगतील, तसे वागतात. कित्येकदा साहेबाने न सांगताही त्यांची परस्पर सेन्सॉरशिप सुरू होते. या प्रकरणातील दोघे न्यायालयात निर्दोष सुटतीलही. पण तोपर्यंत मनस्ताप तर नशिबी आलाच. म्हणूनच आपल्या मानगुटीवर बसलेले सोशल मीडियाचे भूत आपण स्वत:हूनच खाली उतरवायला हवे. ते काम इतर कुणी करणार नाही. त्यासाठी आपल्याकडे आलेला मजकूर पुढे सरकवताना त्याची सत्यासत्यता पडताळून पाहायलाच हवी. अन्यथा अशा प्रकरणांत निष्कारण त्रास होऊ शकेल. मुळात व्यक्त होण्याच्या या माध्यमावर बंधने असू नयेत. पण त्याबरोबरच आपण स्वत:वर बंधने घालून न घेतल्यास सोशल मीडियाचे भूत उच्छाद घातल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया