शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंथनातून ‘अमृत’ यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:10 IST

मिलिंद कुलकर्णी पुराणात समुद्रमंथनाची कथा आहे. मंथनातून निघणारे अमृत देवांनी तर विष राक्षसांनी प्राशन केले होते. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तीचे ...

मिलिंद कुलकर्णीपुराणात समुद्रमंथनाची कथा आहे. मंथनातून निघणारे अमृत देवांनी तर विष राक्षसांनी प्राशन केले होते. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तीचे निदर्शक म्हणून देव आणि दानवांना ओळखले जाते. लहानपणी ‘विषामृत’ हा खेळ खेळला जात असे. त्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे जळगाव शहरातील ‘अमृत पाणीपुरवठा योजने’वरुन असेच समुद्रमंथन सध्या सुरु आहे.केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका यांचा सहभाग असलेली अमृत पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून शहरात राबवली जात आहे. मुदतीच्या आत ती पूर्ण झाली नाही आणि मुदतवाढ देण्यापूर्वी आकारलेला दंड मक्तेदार जैन इरिगेशन यांना मान्य नाही, असे त्रांगडे आहे. त्यालाही दोन महिने उलटले. परंतु, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या ‘सुपारी’च्या आरोपावरुन अपेक्षेप्रमाणे गदारोळ उडाला.महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या; मात्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ४७ हजार मते मिळविल्याने उत्साहित झालेल्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात लगेच शड्डू ठोकले. एका गटाने आमदारांच्या प्रतिमेला ‘बेलफूल’ वाहण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. तर दुसऱ्या गटाने पत्रकार परिषद घेऊन आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपचे नव्याने महानगर जिल्हाध्यक्ष झालेले दीपक सूर्यवंशी हे आमदारांच्या बचावासाठी पुढे आले आणि त्यांनी राष्टÑवादीला प्रतिटोला हाणला. जळगावकरांनी नाकारलेल्या पक्षाने विनाकारण वादात पडू नये, असा सल्ला दिला.महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेच्या सदस्यांनीही आमदार आणि भाजपची खिल्ली उडवली.मक्तेदार जैन इरिगेशननेही आपली भूमिका मांडत, हा तिढा सोडविण्यासाठी सर्व संबंधितांची एकत्रित बैठक बोलाविण्याची मागणी केली. ही योजना पूर्ण करण्याची इच्छा असल्याचा मनोदय देखील व्यक्त केला.आमदारांच्या विधानानंतर हे सगळे मंथन झाले. जळगावकरांच्या हाती काय आले, अमृत की विष ? या प्रश्नाकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पहाण्याची आवश्यकता आहे. शेजारील धुळे जिल्ह्यातील पाणी योजना पाच-सहा वर्षांनंतरही वादामुळे पूर्ण होऊ शकलेली नाही. तसे जळगावात होऊ नये, यासाठी सर्व संबंधितांनी पुढे यायला हवे. चर्चेतून मार्ग काढायला हवा. अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण जवळ असलेले वाघूर धरण यंदा ओसंडून वाहत आहे. जलसाठा चांगला असतानाही सध्या महापालिका नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. पाईपलाईन फुटल्याने येणारा व्यत्यय हा वेगळाच आहे. पाणीपुरवठ्याची योजना जुनी झाल्याने एकाचवेळी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर अमृत पाणी योजना पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही योजना लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.गेल्या पाच-दहा वर्षांत जळगावचा विकास खुंटलेला आहे, त्याला कारणीभूत पक्षीय राजकारण, एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती, श्रेयासाठी चढाओढ, अभ्यासूपणा आणि कर्तव्यतत्परतेचा अभाव, व्यापक विचारापेक्षा तात्कालिक फायद्यासाठी संकुचित भूमिका हे घटक आहेत. घरकूल खटल्याचा निकाल लागला, परंतु, अपूर्णावस्थेत असलेली घरकुले पूर्ण व्हावी, यासाठी ना आमदार प्रयत्न करीत आहे, ना महापौर करीत आहे. शिवाजीनगर, पिंप्राळा, असोदा या उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम आहे. राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण संथ गतीने सुरु आहे. विमानतळावर नाईट लॅडिंगची सुविधा झाली असली तरी विमानसेवा रडतखडत सुरु आहे. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. मंदीमुळे उद्योगांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरु असताना नव्या उद्योगांसाठी प्रोत्साहनपर वातावरण व अर्थसहाय्य, जागेची उपलब्धता यासंबंधी निर्णय होताना दिसत नाही. दहावी, बारावीनंतर मुले शिक्षणासाठी मुंबई, पुणे तर पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. हे बदलवण्यासाठी पक्षभेद विसरुन प्रयत्नांची आवश्यकता आहे.अमृत पाणीयोजनेचा विषय सोडविण्यासाठी शिवसेनेने पाणीपुरवठा मंत्री गुुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून हा प्रश्न मार्गी लावायला हवा. राष्टÑवादीने अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन निधी कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. जळगावकरांसाठी या मंथनातून अमृत निघावे, हीच अपेक्षा आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव