शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

मंथनातून ‘अमृत’ यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:10 IST

मिलिंद कुलकर्णी पुराणात समुद्रमंथनाची कथा आहे. मंथनातून निघणारे अमृत देवांनी तर विष राक्षसांनी प्राशन केले होते. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तीचे ...

मिलिंद कुलकर्णीपुराणात समुद्रमंथनाची कथा आहे. मंथनातून निघणारे अमृत देवांनी तर विष राक्षसांनी प्राशन केले होते. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तीचे निदर्शक म्हणून देव आणि दानवांना ओळखले जाते. लहानपणी ‘विषामृत’ हा खेळ खेळला जात असे. त्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे जळगाव शहरातील ‘अमृत पाणीपुरवठा योजने’वरुन असेच समुद्रमंथन सध्या सुरु आहे.केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका यांचा सहभाग असलेली अमृत पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून शहरात राबवली जात आहे. मुदतीच्या आत ती पूर्ण झाली नाही आणि मुदतवाढ देण्यापूर्वी आकारलेला दंड मक्तेदार जैन इरिगेशन यांना मान्य नाही, असे त्रांगडे आहे. त्यालाही दोन महिने उलटले. परंतु, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या ‘सुपारी’च्या आरोपावरुन अपेक्षेप्रमाणे गदारोळ उडाला.महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या; मात्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ४७ हजार मते मिळविल्याने उत्साहित झालेल्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात लगेच शड्डू ठोकले. एका गटाने आमदारांच्या प्रतिमेला ‘बेलफूल’ वाहण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. तर दुसऱ्या गटाने पत्रकार परिषद घेऊन आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपचे नव्याने महानगर जिल्हाध्यक्ष झालेले दीपक सूर्यवंशी हे आमदारांच्या बचावासाठी पुढे आले आणि त्यांनी राष्टÑवादीला प्रतिटोला हाणला. जळगावकरांनी नाकारलेल्या पक्षाने विनाकारण वादात पडू नये, असा सल्ला दिला.महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेच्या सदस्यांनीही आमदार आणि भाजपची खिल्ली उडवली.मक्तेदार जैन इरिगेशननेही आपली भूमिका मांडत, हा तिढा सोडविण्यासाठी सर्व संबंधितांची एकत्रित बैठक बोलाविण्याची मागणी केली. ही योजना पूर्ण करण्याची इच्छा असल्याचा मनोदय देखील व्यक्त केला.आमदारांच्या विधानानंतर हे सगळे मंथन झाले. जळगावकरांच्या हाती काय आले, अमृत की विष ? या प्रश्नाकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पहाण्याची आवश्यकता आहे. शेजारील धुळे जिल्ह्यातील पाणी योजना पाच-सहा वर्षांनंतरही वादामुळे पूर्ण होऊ शकलेली नाही. तसे जळगावात होऊ नये, यासाठी सर्व संबंधितांनी पुढे यायला हवे. चर्चेतून मार्ग काढायला हवा. अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण जवळ असलेले वाघूर धरण यंदा ओसंडून वाहत आहे. जलसाठा चांगला असतानाही सध्या महापालिका नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. पाईपलाईन फुटल्याने येणारा व्यत्यय हा वेगळाच आहे. पाणीपुरवठ्याची योजना जुनी झाल्याने एकाचवेळी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर अमृत पाणी योजना पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही योजना लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.गेल्या पाच-दहा वर्षांत जळगावचा विकास खुंटलेला आहे, त्याला कारणीभूत पक्षीय राजकारण, एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती, श्रेयासाठी चढाओढ, अभ्यासूपणा आणि कर्तव्यतत्परतेचा अभाव, व्यापक विचारापेक्षा तात्कालिक फायद्यासाठी संकुचित भूमिका हे घटक आहेत. घरकूल खटल्याचा निकाल लागला, परंतु, अपूर्णावस्थेत असलेली घरकुले पूर्ण व्हावी, यासाठी ना आमदार प्रयत्न करीत आहे, ना महापौर करीत आहे. शिवाजीनगर, पिंप्राळा, असोदा या उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम आहे. राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण संथ गतीने सुरु आहे. विमानतळावर नाईट लॅडिंगची सुविधा झाली असली तरी विमानसेवा रडतखडत सुरु आहे. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. मंदीमुळे उद्योगांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरु असताना नव्या उद्योगांसाठी प्रोत्साहनपर वातावरण व अर्थसहाय्य, जागेची उपलब्धता यासंबंधी निर्णय होताना दिसत नाही. दहावी, बारावीनंतर मुले शिक्षणासाठी मुंबई, पुणे तर पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. हे बदलवण्यासाठी पक्षभेद विसरुन प्रयत्नांची आवश्यकता आहे.अमृत पाणीयोजनेचा विषय सोडविण्यासाठी शिवसेनेने पाणीपुरवठा मंत्री गुुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून हा प्रश्न मार्गी लावायला हवा. राष्टÑवादीने अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन निधी कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. जळगावकरांसाठी या मंथनातून अमृत निघावे, हीच अपेक्षा आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव