शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गंगा आणि थेम्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:49 IST

केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यावर गंगेच्या शुद्धीकरणासाठी ‘नमामी गंगे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ढोलताशांच्या गजरात शुभारंभ करण्यात आला

केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यावर गंगेच्या शुद्धीकरणासाठी ‘नमामी गंगे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ढोलताशांच्या गजरात शुभारंभ करण्यात आला तेव्हा आतातरी गंगा प्रदूषणमुक्त होऊन मोकळा श्वास घेणार अशी आशा निर्माण झाली होती. परंतु आज तीन वर्षे लोटून गेल्यावर गंगेच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणाºया केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीच गंगा नदी अस्वच्छच राहणार असे निराशाजनक वक्तव्य केल्याने गंगेचे भवितव्य काय असणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारती यांनी राज्यसभेत बोलताना गंगेची तुलना लंडनमधील थेम्स नदीशी करीत ‘गंगा ही काही थेम्स होऊ शकत नाही’ असेही म्हटले आहे. गंगेची स्वच्छता केवळ सरकारी कामांमुळे होणार नसून लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यात काही चुकीचे नाही. पण शासनातर्फे या दिशेने आजवर किती प्रामाणिक प्रयत्न झालेत हा प्रश्न आहे. खरे तर गंगा नदी म्हणजे भारतीयांच्या आस्थेचा विषय आहे. परंतु लोकांच्या या आस्थेविषयी मनात संशय निर्माण व्हावा एवढी दैनावस्था गंगेची आज झाली आहे. गंगेच्या शुद्धीकरणासाठी आजवर अनेक योजना राबविण्यात आल्या. कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु ती प्रदूषणमुक्त होऊ शकली नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. दुर्दैव हे की पापमुक्तीसाठी गंगेत डुबकी मारणाºयांनाही तिच्या आत्म्याची तडफड कधी कळली नाही. २० हजार कोटी रुपयांच्या नमामी गंगे योजनेनेही काहीच साध्य झालेले नाही, हे वास्तव आहे. भारती यांनी उल्लेख केलेली थेम्स नदी लंडनच्या मध्यवर्ती भागातून वाहाते. या नदीला एकेकाळी गटाराचे रूप प्राप्त झाले होते. १९५० साली शासन, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शेतकरी आणि सामान्य लोकांच्या सक्रिय सहभागातून तिच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर लोकांचे प्रबोधन, जागरूकता आणि कडक कायद्याच्या बळावर थेम्स प्रदूषणमुक्त झाली. भारतात पंजाबमधील काशीबैन नदीच्या बाबतीतही असाच प्रयोग यशस्वी झाला होता. मग गंगेच्या बाबतीत हे का शक्य नाही? अलीकडच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांकडून नद्या शुद्धीकरणाचे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबविले जात आहेत, हे खरे असले तरी संघटित लोकशक्ती आणि सतर्क प्रशासनाचा अभाव आहे. न्यायालयाने नद्यांना मानवी दर्जा दिला असला तरी प्रत्येक मानवाने तिला मानव म्हणून वागविणे गरजेचे आहे.