शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गंगा आणि थेम्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:49 IST

केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यावर गंगेच्या शुद्धीकरणासाठी ‘नमामी गंगे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ढोलताशांच्या गजरात शुभारंभ करण्यात आला

केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यावर गंगेच्या शुद्धीकरणासाठी ‘नमामी गंगे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ढोलताशांच्या गजरात शुभारंभ करण्यात आला तेव्हा आतातरी गंगा प्रदूषणमुक्त होऊन मोकळा श्वास घेणार अशी आशा निर्माण झाली होती. परंतु आज तीन वर्षे लोटून गेल्यावर गंगेच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणाºया केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीच गंगा नदी अस्वच्छच राहणार असे निराशाजनक वक्तव्य केल्याने गंगेचे भवितव्य काय असणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारती यांनी राज्यसभेत बोलताना गंगेची तुलना लंडनमधील थेम्स नदीशी करीत ‘गंगा ही काही थेम्स होऊ शकत नाही’ असेही म्हटले आहे. गंगेची स्वच्छता केवळ सरकारी कामांमुळे होणार नसून लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यात काही चुकीचे नाही. पण शासनातर्फे या दिशेने आजवर किती प्रामाणिक प्रयत्न झालेत हा प्रश्न आहे. खरे तर गंगा नदी म्हणजे भारतीयांच्या आस्थेचा विषय आहे. परंतु लोकांच्या या आस्थेविषयी मनात संशय निर्माण व्हावा एवढी दैनावस्था गंगेची आज झाली आहे. गंगेच्या शुद्धीकरणासाठी आजवर अनेक योजना राबविण्यात आल्या. कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु ती प्रदूषणमुक्त होऊ शकली नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. दुर्दैव हे की पापमुक्तीसाठी गंगेत डुबकी मारणाºयांनाही तिच्या आत्म्याची तडफड कधी कळली नाही. २० हजार कोटी रुपयांच्या नमामी गंगे योजनेनेही काहीच साध्य झालेले नाही, हे वास्तव आहे. भारती यांनी उल्लेख केलेली थेम्स नदी लंडनच्या मध्यवर्ती भागातून वाहाते. या नदीला एकेकाळी गटाराचे रूप प्राप्त झाले होते. १९५० साली शासन, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शेतकरी आणि सामान्य लोकांच्या सक्रिय सहभागातून तिच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर लोकांचे प्रबोधन, जागरूकता आणि कडक कायद्याच्या बळावर थेम्स प्रदूषणमुक्त झाली. भारतात पंजाबमधील काशीबैन नदीच्या बाबतीतही असाच प्रयोग यशस्वी झाला होता. मग गंगेच्या बाबतीत हे का शक्य नाही? अलीकडच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांकडून नद्या शुद्धीकरणाचे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबविले जात आहेत, हे खरे असले तरी संघटित लोकशक्ती आणि सतर्क प्रशासनाचा अभाव आहे. न्यायालयाने नद्यांना मानवी दर्जा दिला असला तरी प्रत्येक मानवाने तिला मानव म्हणून वागविणे गरजेचे आहे.