शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

पूर्णवेळ आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:59 IST

- मिलिंद कुलकर्णीराज्य शासनाचे प्रशासकीय धोरण एकंदर गोंधळाचे आहे, असेच चित्र आहे. औरंगाबादला कचराकोंडीच्या विषयावरुन हिंसक घटना घडतात, पुढे किरकोळ वादावरुन दंगली घडतात तरीही त्या शहरात पूर्णवेळ पोलीस आयुक्त दिला जात नाही. तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याची सहा-आठ महिन्यात एका शहरातून दुसºया शहरात बदली होत असते. तर जळगावसारख्या आर्थिकदृष्टया अडचणीत ...

- मिलिंद कुलकर्णीराज्य शासनाचे प्रशासकीय धोरण एकंदर गोंधळाचे आहे, असेच चित्र आहे. औरंगाबादला कचराकोंडीच्या विषयावरुन हिंसक घटना घडतात, पुढे किरकोळ वादावरुन दंगली घडतात तरीही त्या शहरात पूर्णवेळ पोलीस आयुक्त दिला जात नाही. तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याची सहा-आठ महिन्यात एका शहरातून दुसºया शहरात बदली होत असते. तर जळगावसारख्या आर्थिकदृष्टया अडचणीत असलेल्या महापालिकेला तब्बल ११ महिने पूर्णवेळ आयुक्त दिला जात नाही. भाजपा मंत्र्यांचे वाक्चातुर्य तर मोठे विलक्षण असते. जळगावला पूर्णवेळ आयुक्तपद का दिले नाही, असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारला गेला असता त्यांनी महापालिकेचे महत्त्वाचे काही प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे प्रभार राहू दिला आहे, असे सांगितले गेले. या ११ महिन्यांच्या काळात जळगावचे कोणते महत्त्वाचे प्रश्न सोडविले गेले, यासंबंधी ना पालकमंत्री बोलायला तयार आहेत, ना आमदार, खासदार. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जळगाव शहरासाठी २५ कोटींचा विशेष निधी देण्याची घोषणा केली होती. त्या निधीचा घोळ एवढा घातला गेला की, त्याचा एक पैसा अद्याप खर्च झालेला नाही. महापालिकेच्या व्यापारी संकुलांतील गाळेकरार आणि हुडको-जिल्हा बँकेचे कर्ज हे दोन्ही विषय प्रलंबित राहिले. अमृत पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराच्या वादावरुन ही योजना सहा महिने विलंबाने सुरु झाली. भुयारी गटार योजनेचा चेंडू अद्याप टोलविला जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना लोकसहभागातून काही विकास कामे करता येणे शक्य आहे. जैन उद्योग समुहाने भाऊचे उद्यान, गांधी उद्यानाचे सुशोभीकरण केले. लायन्स क्लबने बहिणाबाई उद्यानाचे सुशोभीकरण केले. माहेश्वरी समाजाने बहिणाबाई उद्यान चौकाचे सुशोभीकरण आणि प्रवेशद्वार उभारले. गेल्या वर्षी मेहरुण तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण करण्यात आले. यंदा मराठी प्रतिष्ठानने अंबरझरा पाटचारीचे खोलीकरण हाती घेऊन मेहरुण तलावाकडे येणारा प्रवाह मोकळा करण्याचा निर्धार केला आहे. रोटरी ईस्टने आकाशवाणी व क्रीडा संकुल चौकात कट्टा विकसीत करण्याचे काम हाती घेतले आहे. एकता रिटेल किराणा असोसिएशनने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी प्रस्ताव दिला आहे. अनेक स्वयंसेवी व सामाजिक संस्था शहर विकासात योगदान देण्यासाठी तयार आहेत, महापालिकेने गतिमान व पारदर्शक कारभाराद्वारे त्यांना प्रतिसाद द्यायला हवा. नव्या आयुक्तांकडून ही अपेक्षा आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गाळेकराराचा प्रश्न सोडविण्याचे सूतोवाच नव्या आयुक्तांनी केले आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यावर हुडको-जिल्हा बँकेच्या कर्जाचे वन टाईम सेटलमेंट करणे शक्य होणार असल्याचा त्यांचा आशावाद आहे. या दोन प्रश्नांची सोडवणूक झाली तरी विकासाची गाडी रुळावर यायला वेळ लागणार नाही. राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण, विमानसेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा सकारात्मक वातावरणात जळगाव शहराचा कायापालट करण्याच्या कार्यात नव्या आयुक्तांचे योगदान मोलाचे ठरणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव