शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णवेळ आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:59 IST

- मिलिंद कुलकर्णीराज्य शासनाचे प्रशासकीय धोरण एकंदर गोंधळाचे आहे, असेच चित्र आहे. औरंगाबादला कचराकोंडीच्या विषयावरुन हिंसक घटना घडतात, पुढे किरकोळ वादावरुन दंगली घडतात तरीही त्या शहरात पूर्णवेळ पोलीस आयुक्त दिला जात नाही. तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याची सहा-आठ महिन्यात एका शहरातून दुसºया शहरात बदली होत असते. तर जळगावसारख्या आर्थिकदृष्टया अडचणीत ...

- मिलिंद कुलकर्णीराज्य शासनाचे प्रशासकीय धोरण एकंदर गोंधळाचे आहे, असेच चित्र आहे. औरंगाबादला कचराकोंडीच्या विषयावरुन हिंसक घटना घडतात, पुढे किरकोळ वादावरुन दंगली घडतात तरीही त्या शहरात पूर्णवेळ पोलीस आयुक्त दिला जात नाही. तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याची सहा-आठ महिन्यात एका शहरातून दुसºया शहरात बदली होत असते. तर जळगावसारख्या आर्थिकदृष्टया अडचणीत असलेल्या महापालिकेला तब्बल ११ महिने पूर्णवेळ आयुक्त दिला जात नाही. भाजपा मंत्र्यांचे वाक्चातुर्य तर मोठे विलक्षण असते. जळगावला पूर्णवेळ आयुक्तपद का दिले नाही, असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारला गेला असता त्यांनी महापालिकेचे महत्त्वाचे काही प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे प्रभार राहू दिला आहे, असे सांगितले गेले. या ११ महिन्यांच्या काळात जळगावचे कोणते महत्त्वाचे प्रश्न सोडविले गेले, यासंबंधी ना पालकमंत्री बोलायला तयार आहेत, ना आमदार, खासदार. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जळगाव शहरासाठी २५ कोटींचा विशेष निधी देण्याची घोषणा केली होती. त्या निधीचा घोळ एवढा घातला गेला की, त्याचा एक पैसा अद्याप खर्च झालेला नाही. महापालिकेच्या व्यापारी संकुलांतील गाळेकरार आणि हुडको-जिल्हा बँकेचे कर्ज हे दोन्ही विषय प्रलंबित राहिले. अमृत पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराच्या वादावरुन ही योजना सहा महिने विलंबाने सुरु झाली. भुयारी गटार योजनेचा चेंडू अद्याप टोलविला जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना लोकसहभागातून काही विकास कामे करता येणे शक्य आहे. जैन उद्योग समुहाने भाऊचे उद्यान, गांधी उद्यानाचे सुशोभीकरण केले. लायन्स क्लबने बहिणाबाई उद्यानाचे सुशोभीकरण केले. माहेश्वरी समाजाने बहिणाबाई उद्यान चौकाचे सुशोभीकरण आणि प्रवेशद्वार उभारले. गेल्या वर्षी मेहरुण तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण करण्यात आले. यंदा मराठी प्रतिष्ठानने अंबरझरा पाटचारीचे खोलीकरण हाती घेऊन मेहरुण तलावाकडे येणारा प्रवाह मोकळा करण्याचा निर्धार केला आहे. रोटरी ईस्टने आकाशवाणी व क्रीडा संकुल चौकात कट्टा विकसीत करण्याचे काम हाती घेतले आहे. एकता रिटेल किराणा असोसिएशनने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी प्रस्ताव दिला आहे. अनेक स्वयंसेवी व सामाजिक संस्था शहर विकासात योगदान देण्यासाठी तयार आहेत, महापालिकेने गतिमान व पारदर्शक कारभाराद्वारे त्यांना प्रतिसाद द्यायला हवा. नव्या आयुक्तांकडून ही अपेक्षा आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गाळेकराराचा प्रश्न सोडविण्याचे सूतोवाच नव्या आयुक्तांनी केले आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यावर हुडको-जिल्हा बँकेच्या कर्जाचे वन टाईम सेटलमेंट करणे शक्य होणार असल्याचा त्यांचा आशावाद आहे. या दोन प्रश्नांची सोडवणूक झाली तरी विकासाची गाडी रुळावर यायला वेळ लागणार नाही. राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण, विमानसेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा सकारात्मक वातावरणात जळगाव शहराचा कायापालट करण्याच्या कार्यात नव्या आयुक्तांचे योगदान मोलाचे ठरणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव