शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Fuel Price Hike: इंधनाचा भडका कोण विझवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:59 IST

पेट्रोल आणि डिझेल या इंधनाचे दर आकाशाला टेकताच साऱ्या बाजारातील महागाई उंचावायला लागली आहे

पेट्रोल आणि डिझेल या इंधनाचे दर आकाशाला टेकताच साऱ्या बाजारातील महागाई उंचावायला लागली आहे. पेट्रोल व डिझेल यांचा प्रत्यक्ष वापर करणारे मध्यमवर्गीय तर या भाववाढीमुळे होरपळून निघतच आहेत. आता इंधन महागल्यामुळे मालमोटारीतून बाजारात येणाºया जीवनावश्यक वस्तूंसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याने सामान्य माणसांच्या डोळ्यांपुढे काजवे उभे राहू लागले आहेत. जगाच्या बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले हे खरे असले तरी मात्र ते कमी असतानाही आताच्या सरकारने त्याच्या विक्रीचे देशातील दर कमी केले नाहीत. आता तर त्यांना भाववाढीचे जागतिक कारण पुढे करूनच लोकांची फसवणूक करता येते. पी. चिदंबरम हे देशाचे माजी अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी तेलाची दरवाढ किमान दहा वर्षे हाताळली आहे. जगातील तेलाच्या किमतीतील आताची वाढ लक्षात घेतली की देशात त्यांचे भाव लिटरमागे २५ रुपयांनी कमी करता येतात असे त्यांचे म्हणणे आहे व ते त्यांनी सप्रमाण जनतेला ऐकविले आहे. जेथे आपण फारसे काही करू शकत नाही तेथे तज्ज्ञांंचा वा अनुभवी माणसांचा सल्ला घेणे हे साधे शहाणपण आहे. पण आमचे तेलमंत्री वा पंतप्रधान त्याविषयी काही बोलत नाहीत (ते ऐकतही नाहीत) आणि रविशंकर प्रसाद नावाचे कायदा मंत्रीच या विषयावर बोलतात. तेलाचे भाव कमी होणार नाहीत उलट ते पुढच्या काळात आणखी वाढतील अशी धमकीही ते देशाला देतात. याच काळात इंधनावरील कर किमान तीन रुपयांनी कमी करण्याविषयी केंद्राने राज्याला सुचविले आहे. काही राज्ये त्यावर विचार करीत असतानाच दुसºया एका वजनदार मंत्र्यानी ‘तेलावरील कर कमी केला तर विकास योजना थांबतील’ अशी वाणी उच्चारली आहे. सबब काहीकाळ तरी उन्हाळ्याच्या होरपळीएवढीच इंधनाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीची झळ जनतेला सहन करावी लागणार आहे. तेलाच्या किमतीही शहरापरत्वे वेगळ्या व कमालीचा फरक असणाºया आहेत. दिल्लीत पेट्रोल ७७ रु. तर मुंबईत ते ८५ रु. हून अधिक किमतीत विकले जात आहे. याच काळात विकासासाठी ही वाढ होती असे अप्रत्यक्षपणे लोकांना सांगणारे संदेश टिष्ट्वट व फेसबुकातून जनतेला ऐकविले गेले आहे. एका अतिशहाण्याने तर याहीपुढे जाऊन मनमोहन सिंगांच्या सरकारने मेट्रो वा बुलेट ट्रेन आणल्या असत्या तर पेट्रोल व डिझेलची बचत होऊन ही वाढ झालीच नसती असे कमालीचे मूर्ख अनुमान टिष्ट्वटरवर टाकले आहे. ज्या प्रांतात मेट्रो आल्या आहेत त्यातल्या दिल्ली वगळता सर्वत्र त्या तोट्यात चालणाºया आहेत. हे साधे वास्तव ठाऊक नसणाºयांचेच हे शहाणपण आहे. शिवाय मनमोहन सिंगांच्या कारकीर्दीने जी अर्थव्यवस्था उभी केली तिच्याच बळावर आत्ताची बुलेट व मेट्रोची स्वप्ने मोदींचे सरकार देशाला दाखवित आले हेही त्याने लक्षात घेतलेले नाही. नेमक्या याच सुमारास रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. तीन महिन्यांपूर्वी ६५ रु. प्रति डॉलर असलेला दर आता ६८ रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याचा आयातीवर विपरीत परिणाम होईल आणि विदेशात जाणाºयांना त्या प्रवासावर जास्तीचे पैसे मोजावे लागतील. पेट्रोल व डिझेल यांचे भाव तर त्यामुळे आणखीही उंचावतील. हे संकट आजचे नाही. याआधीही अशी संकटे देशावर आली आहेत. त्यावेळच्या सरकारांनी त्यापासून जनतेला कसे संरक्षण दिले व तेलाच्या किमती आटोक्यात कशा ठेवल्या हेही आताच्या राज्यकर्त्यांनी पाहिले पाहिजे. तेलाचे उत्पादन करणारे मध्य आशियातील सारे देश आज अशांत व अस्वस्थ आहेत. त्यातले काही युद्धमग्न आहेत आणि काहींवर अमेरिकेचा बहिष्कार आहे. त्यामुळे तेलाचे उत्पादन कमी झाले असून हे संकट तूर्तास तरी संपण्याची शक्यता नाही. सबब यावर राष्ट्रीय स्वरूपाचेच उपाय आवश्यक आहेत. हवी तर त्यासाठी पूर्वीच्या सरकारातील तज्ज्ञांची मदतही घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल