शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Fuel Price Hike: इंधनाचा भडका कोण विझवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:59 IST

पेट्रोल आणि डिझेल या इंधनाचे दर आकाशाला टेकताच साऱ्या बाजारातील महागाई उंचावायला लागली आहे

पेट्रोल आणि डिझेल या इंधनाचे दर आकाशाला टेकताच साऱ्या बाजारातील महागाई उंचावायला लागली आहे. पेट्रोल व डिझेल यांचा प्रत्यक्ष वापर करणारे मध्यमवर्गीय तर या भाववाढीमुळे होरपळून निघतच आहेत. आता इंधन महागल्यामुळे मालमोटारीतून बाजारात येणाºया जीवनावश्यक वस्तूंसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याने सामान्य माणसांच्या डोळ्यांपुढे काजवे उभे राहू लागले आहेत. जगाच्या बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले हे खरे असले तरी मात्र ते कमी असतानाही आताच्या सरकारने त्याच्या विक्रीचे देशातील दर कमी केले नाहीत. आता तर त्यांना भाववाढीचे जागतिक कारण पुढे करूनच लोकांची फसवणूक करता येते. पी. चिदंबरम हे देशाचे माजी अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी तेलाची दरवाढ किमान दहा वर्षे हाताळली आहे. जगातील तेलाच्या किमतीतील आताची वाढ लक्षात घेतली की देशात त्यांचे भाव लिटरमागे २५ रुपयांनी कमी करता येतात असे त्यांचे म्हणणे आहे व ते त्यांनी सप्रमाण जनतेला ऐकविले आहे. जेथे आपण फारसे काही करू शकत नाही तेथे तज्ज्ञांंचा वा अनुभवी माणसांचा सल्ला घेणे हे साधे शहाणपण आहे. पण आमचे तेलमंत्री वा पंतप्रधान त्याविषयी काही बोलत नाहीत (ते ऐकतही नाहीत) आणि रविशंकर प्रसाद नावाचे कायदा मंत्रीच या विषयावर बोलतात. तेलाचे भाव कमी होणार नाहीत उलट ते पुढच्या काळात आणखी वाढतील अशी धमकीही ते देशाला देतात. याच काळात इंधनावरील कर किमान तीन रुपयांनी कमी करण्याविषयी केंद्राने राज्याला सुचविले आहे. काही राज्ये त्यावर विचार करीत असतानाच दुसºया एका वजनदार मंत्र्यानी ‘तेलावरील कर कमी केला तर विकास योजना थांबतील’ अशी वाणी उच्चारली आहे. सबब काहीकाळ तरी उन्हाळ्याच्या होरपळीएवढीच इंधनाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीची झळ जनतेला सहन करावी लागणार आहे. तेलाच्या किमतीही शहरापरत्वे वेगळ्या व कमालीचा फरक असणाºया आहेत. दिल्लीत पेट्रोल ७७ रु. तर मुंबईत ते ८५ रु. हून अधिक किमतीत विकले जात आहे. याच काळात विकासासाठी ही वाढ होती असे अप्रत्यक्षपणे लोकांना सांगणारे संदेश टिष्ट्वट व फेसबुकातून जनतेला ऐकविले गेले आहे. एका अतिशहाण्याने तर याहीपुढे जाऊन मनमोहन सिंगांच्या सरकारने मेट्रो वा बुलेट ट्रेन आणल्या असत्या तर पेट्रोल व डिझेलची बचत होऊन ही वाढ झालीच नसती असे कमालीचे मूर्ख अनुमान टिष्ट्वटरवर टाकले आहे. ज्या प्रांतात मेट्रो आल्या आहेत त्यातल्या दिल्ली वगळता सर्वत्र त्या तोट्यात चालणाºया आहेत. हे साधे वास्तव ठाऊक नसणाºयांचेच हे शहाणपण आहे. शिवाय मनमोहन सिंगांच्या कारकीर्दीने जी अर्थव्यवस्था उभी केली तिच्याच बळावर आत्ताची बुलेट व मेट्रोची स्वप्ने मोदींचे सरकार देशाला दाखवित आले हेही त्याने लक्षात घेतलेले नाही. नेमक्या याच सुमारास रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. तीन महिन्यांपूर्वी ६५ रु. प्रति डॉलर असलेला दर आता ६८ रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याचा आयातीवर विपरीत परिणाम होईल आणि विदेशात जाणाºयांना त्या प्रवासावर जास्तीचे पैसे मोजावे लागतील. पेट्रोल व डिझेल यांचे भाव तर त्यामुळे आणखीही उंचावतील. हे संकट आजचे नाही. याआधीही अशी संकटे देशावर आली आहेत. त्यावेळच्या सरकारांनी त्यापासून जनतेला कसे संरक्षण दिले व तेलाच्या किमती आटोक्यात कशा ठेवल्या हेही आताच्या राज्यकर्त्यांनी पाहिले पाहिजे. तेलाचे उत्पादन करणारे मध्य आशियातील सारे देश आज अशांत व अस्वस्थ आहेत. त्यातले काही युद्धमग्न आहेत आणि काहींवर अमेरिकेचा बहिष्कार आहे. त्यामुळे तेलाचे उत्पादन कमी झाले असून हे संकट तूर्तास तरी संपण्याची शक्यता नाही. सबब यावर राष्ट्रीय स्वरूपाचेच उपाय आवश्यक आहेत. हवी तर त्यासाठी पूर्वीच्या सरकारातील तज्ज्ञांची मदतही घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल