शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

तळहाताच्या नाजूक रेषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:36 IST

काजूबिया भाजायला घेतल्या, पत्र्याला भोके पाडून तीन विटा लावून मोठा जाळ केला़ काजूला डिंक फ ाऱ थोड्या भाजल्या गेल्या़ बाकी कच्च्या आणि उरलेल्या करपलेल्या़ हाताला खोबरेल लावून सुद्धा डिंक खूपच लागला़ आजोबांचा हा बिया भाजण्याचा प्रयोग नातवंडांनी मोठ्या उत्साहाने अनुभवला़ तीन दिवसांनी तळहाताच्या बोटांची पातळ साले जाऊ लागली.

- डॉ. गोविंद काळेकाजूबिया भाजायला घेतल्या, पत्र्याला भोके पाडून तीन विटा लावून मोठा जाळ केला़ काजूला डिंक फ ाऱ थोड्या भाजल्या गेल्या़ बाकी कच्च्या आणि उरलेल्या करपलेल्या़ हाताला खोबरेल लावून सुद्धा डिंक खूपच लागला़ आजोबांचा हा बिया भाजण्याचा प्रयोग नातवंडांनी मोठ्या उत्साहाने अनुभवला़ तीन दिवसांनी तळहाताच्या बोटांची पातळ साले जाऊ लागली़ हा होता डिंकाचा परिणाम़ माझा हा पहिलाच अनुभव़ एकदा तर वाटले हातावरच्या नाजूक रेषा निघून तर जाणार नाहीत ना़हाताकडून सर्व काम करून घ्यायचे पण त्या हातांकडे, बोटाकडे पाहायला वेळच मिळाला नाही़ नखे काढताना हात पालथा़ कशाला कोण तळहातीच्या रेषा निरखणार? खरे तर! शरीराच्या कोणत्याच अवयवांकडे आपले लक्ष जात नाही, जोपर्यंत तो अवयव दुखरा होत नाही़ तळहाताच्या नाजूक रेषांचे दर्शन लहानपणी मात्र रोजच होई़ कारण घरचा दंडक झोपेतून उठले की प्रात:स्मरण म्हणावे लागे़‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वति।करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्॥लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंदाचे अस्तित्व तर आपल्या तळहातावरच आहे़ नाजूक रेषांनी जपले आहे सारे़ म्हणून तर उठल्या उठल्या करदर्शऩ तसा तळ हात कुणाला दाखविला नाही परंतु तिसरी ते चौथी अशा शालेय जीवनाच्या दोन वर्षांत माझा तळहात जास्तीतजास्त कुणी पाहिला असेल तर तो वर्गमास्तरांनी़ चूक झाली रे झाली की ‘हात पुढे कर’ हे दोनच शब्द कठोर आवाजात ऐकू यायचे. नंतर मात्र तळहात लालेलाल़ असे कराचे दर्शन मात्र दोन वर्षे घेतले़ मग तळहाताच्या नाजूक रेषांचे नाजूकपण उरणार कसे? ‘तळहाताच्या नाजूक रेषा / कुणी गोंदाव्या कुणी पुसाव्या’ असे बाळकृष्ण महाराज मर्ढेकर लिहिते झाले़ आमची जात पोराची त्यामुळे हाताला मेंदी लागणे फार क्वचित वाट्याला आले़ त्यातही तळहाताच्या रेषांपेक्षा मेंदीच्या रेषांचेच कौतुक फ ार होई़अद्वैत वेदांताचे पुरस्कर्ते/निर्माते आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रांमधून मात्र तळहात बऱ्याच वेळा भेटीला आला़ आचार्यांची स्तोत्रगंगा म्हणजे अक्षय वाङ्मय़ परा विद्येचे दर्शन घडविणारे़ ‘करतलभिक्षा तरूतलवास:’ तळहातावर पडेल/मिळेल तेवढी भिक्षा आणि तरूतळी निवास हे संन्याशाचे सुख आचार्यांनी अवघ्याच शब्दांत मांडले आहे़ विश्वाकडे अलिप्तपणे पाहता आले पाहिजे़ ‘करकमलतल अमलक् वत्’ हाताच्या तळव्यावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे पाहता आले पाहिजे़

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या