शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

तळहाताच्या नाजूक रेषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:36 IST

काजूबिया भाजायला घेतल्या, पत्र्याला भोके पाडून तीन विटा लावून मोठा जाळ केला़ काजूला डिंक फ ाऱ थोड्या भाजल्या गेल्या़ बाकी कच्च्या आणि उरलेल्या करपलेल्या़ हाताला खोबरेल लावून सुद्धा डिंक खूपच लागला़ आजोबांचा हा बिया भाजण्याचा प्रयोग नातवंडांनी मोठ्या उत्साहाने अनुभवला़ तीन दिवसांनी तळहाताच्या बोटांची पातळ साले जाऊ लागली.

- डॉ. गोविंद काळेकाजूबिया भाजायला घेतल्या, पत्र्याला भोके पाडून तीन विटा लावून मोठा जाळ केला़ काजूला डिंक फ ाऱ थोड्या भाजल्या गेल्या़ बाकी कच्च्या आणि उरलेल्या करपलेल्या़ हाताला खोबरेल लावून सुद्धा डिंक खूपच लागला़ आजोबांचा हा बिया भाजण्याचा प्रयोग नातवंडांनी मोठ्या उत्साहाने अनुभवला़ तीन दिवसांनी तळहाताच्या बोटांची पातळ साले जाऊ लागली़ हा होता डिंकाचा परिणाम़ माझा हा पहिलाच अनुभव़ एकदा तर वाटले हातावरच्या नाजूक रेषा निघून तर जाणार नाहीत ना़हाताकडून सर्व काम करून घ्यायचे पण त्या हातांकडे, बोटाकडे पाहायला वेळच मिळाला नाही़ नखे काढताना हात पालथा़ कशाला कोण तळहातीच्या रेषा निरखणार? खरे तर! शरीराच्या कोणत्याच अवयवांकडे आपले लक्ष जात नाही, जोपर्यंत तो अवयव दुखरा होत नाही़ तळहाताच्या नाजूक रेषांचे दर्शन लहानपणी मात्र रोजच होई़ कारण घरचा दंडक झोपेतून उठले की प्रात:स्मरण म्हणावे लागे़‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वति।करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्॥लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंदाचे अस्तित्व तर आपल्या तळहातावरच आहे़ नाजूक रेषांनी जपले आहे सारे़ म्हणून तर उठल्या उठल्या करदर्शऩ तसा तळ हात कुणाला दाखविला नाही परंतु तिसरी ते चौथी अशा शालेय जीवनाच्या दोन वर्षांत माझा तळहात जास्तीतजास्त कुणी पाहिला असेल तर तो वर्गमास्तरांनी़ चूक झाली रे झाली की ‘हात पुढे कर’ हे दोनच शब्द कठोर आवाजात ऐकू यायचे. नंतर मात्र तळहात लालेलाल़ असे कराचे दर्शन मात्र दोन वर्षे घेतले़ मग तळहाताच्या नाजूक रेषांचे नाजूकपण उरणार कसे? ‘तळहाताच्या नाजूक रेषा / कुणी गोंदाव्या कुणी पुसाव्या’ असे बाळकृष्ण महाराज मर्ढेकर लिहिते झाले़ आमची जात पोराची त्यामुळे हाताला मेंदी लागणे फार क्वचित वाट्याला आले़ त्यातही तळहाताच्या रेषांपेक्षा मेंदीच्या रेषांचेच कौतुक फ ार होई़अद्वैत वेदांताचे पुरस्कर्ते/निर्माते आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रांमधून मात्र तळहात बऱ्याच वेळा भेटीला आला़ आचार्यांची स्तोत्रगंगा म्हणजे अक्षय वाङ्मय़ परा विद्येचे दर्शन घडविणारे़ ‘करतलभिक्षा तरूतलवास:’ तळहातावर पडेल/मिळेल तेवढी भिक्षा आणि तरूतळी निवास हे संन्याशाचे सुख आचार्यांनी अवघ्याच शब्दांत मांडले आहे़ विश्वाकडे अलिप्तपणे पाहता आले पाहिजे़ ‘करकमलतल अमलक् वत्’ हाताच्या तळव्यावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे पाहता आले पाहिजे़

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या