शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

पालकत्वाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 19:45 IST

- मिलिंद कुलकर्णीपार्टी विथ द डिफरन्स असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री चार वर्षात इतके बदलतील, असे वाटत नव्हते. जळगावचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे संवेदनशील मंत्री, नेते म्हणून ओळखले जातात. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी जळगावात काही वर्षे कार्य केले असल्याने त्यांना जळगावविषयी आत्मियता आहे. परंतु त्यांच्या १३ ...

- मिलिंद कुलकर्णीपार्टी विथ द डिफरन्स असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री चार वर्षात इतके बदलतील, असे वाटत नव्हते. जळगावचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे संवेदनशील मंत्री, नेते म्हणून ओळखले जातात. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी जळगावात काही वर्षे कार्य केले असल्याने त्यांना जळगावविषयी आत्मियता आहे. परंतु त्यांच्या १३ महिन्यांच्या कारकिर्दीत जळगावला फार काही मिळाले, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पूर्वीच्या काँग्रेस आघाडीच्या काळात मंजूर आणि सुरू झालेल्या प्रकल्पांची उद्घाटने करायलासुद्धा पालकमंत्र्यांना वेळ नाही, हे जळगावकर अनुभवत आहेत. वनविभागाच्या लांडोरखोरी उद्यानाचे उद्घाटन असेच दोन महिने रखडले होते. आता जळगावातील नाट्यगृहदेखील मंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे. हे कौतुकसोहळे झाले. पण जळगावकरांच्या दु:खाशी, वेदनेशी समरस व्हायला, मंत्र्यांना वेळ नाही, हे दुर्दैव आहे. एकेकाळी पालकमंत्री असलेले प्रा.लक्ष्मणराव ढोबळे वाकडी येथे येऊन गेले. पण पाटील हे जळगावात येऊन वाकडीला गेले नाही. ज्या खात्याचा कारभार तात्पुरत्या स्वरूपात ते बघत आहेत, त्या कृषी खात्याशी निगडित रावेर तालुक्यातील ५१ गावांमधील दोन हजार हेक्टरवरील केळी तीन दिवसांच्या वादळाने भूईसपाट झाली. रावेरला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील शहापूर तालुक्यात याच काळात केळीचे नुकसान झाले. त्याठिकाणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान स्वत: येऊन गेले आणि त्यांनी ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रती हेक्टरी १ लाख रुपये भरपाई, खत व बियाण्यांसाठी बिनव्याजी कर्ज, बँकेच्या कर्जावरील व्याजमाफी, ३१ डिसेंबरपर्यंतचे वीज बिल सरकार भरणार अशा जागेवरच घोषणा केल्या. मात्र रावेरच्या शेतकºयांच्या नुकसानीचा अद्याप पंचनामा बाकी आहे. पाटील यांच्याकडे महसूल खाते आहे, त्यांनी केवळ लवकर पंचनामे पूर्ण करा, असे निवेदन जारी करून कर्तव्यपूर्ती केली. विशेष म्हणजे याच काळात पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत नियुक्त मंत्री गटाचे सदस्य होते. दुसरे सदस्य जळगावकर गिरीश महाजन हे होते. त्यांनी चौहान यांच्यासारखी भूमिका घेऊन शेतकरीहिताचा निर्णय घेऊ शकले असते. पण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगितले जात असेल तर अमळनेरात पाटील यांनी तर आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या पाटील यांनी संस्थाचालकांची बैठक घेतली. भाजपा उमेदवाराला समर्थन देण्याचे आवाहन केले. या वेळी काही संस्थाचालकांनी व्यथा मांडली, कर्मचारी भरतीचे आमचे अधिकार सरकारने काढले आहेत. मात्र पाटील प्रत्युत्तर देताना म्हणाले, असा कोणताही निर्णय झाला नाही, आणि मी अजून सहा तास मुख्यमंत्री आहे, त्यामुळे असा निर्णय होऊही देणार नाही. ही तत्परता वाकडी आणि रावेरच्या केळी उत्पादकांविषयी का दाखविली नाही, हा प्रश्न आहेच.