शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!

By मनोज गडनीस | Updated: June 16, 2024 07:45 IST

विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी:  गेल्या शनिवारी मुंबईविमानतळावर एकीकडे एअर इंडिया कंपनीचे विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर आले आणि ते उड्डाण घेत असताना मागील बाजूने इंडिगोचे विमान धावपट्टीवर उतरले. दोन विमानांमध्ये जेमतेम पाचशे मीटरचे अंतर होते. यापैकी एका जरी विमानाचे नियंत्रण सुटले असते किंवा अचानक विमानात तांत्रिक दोष निर्माण झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र, असे का झाले? दोन विमाने एकाचवेळी धावपट्टीवर आली याला केवळ एक घटना म्हणून पाहता येणार नाही. तर याच्या मुळाशी गेल्यास मुंबई विमानतळाची रचना, रोज होणारी महाकाय विमान वाहतूक या मुद्द्यांनाही विचारात घेणे गरजेचे आहे. तरच, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचणे शक्य होईल.

१८५० एकर अशा विस्तीर्ण जागेत पसरलेल्या मुंबई विमानतळावरील सर्वांत मोठी समस्या आहे ती धावपट्टीची. देशात किंवा जगात बहुतांश विमानतळांवर दोन, तीन किंवा त्यापेक्षा अधिक धावपट्ट्या या समांतर रेषेत असतात. मात्र, मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्या या काटकोनात आहेत. त्यामुळे एकावेळी एकच उड्डाण किंवा एका विमानाचे लैंडिंग होते.

 

२००० सालच्या सुरुवातीला जेव्हा मुंबई विमानतळाचा पुनर्विकास झाला त्यावेळी मुंबई विमानतळाला साधारणपणे अर्धगोलाकार स्थितीत वेढा घालून असलेल्या झोपड्या हटवून विमानतळ परिसर वाढवून या धावपट्ट्या समांतर करण्याचा विचार झाला होता. त्या दृष्टीने नियोजनही झाले होते. मात्र, या झोपडपट्ट्यांवर ज्यांच्या मतांची मदार आहे त्या स्थानिक राजकारण्यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणाला आणि झोपड्या हटविण्याला प्रचंड विरोध केला. राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून विमानतळाची पुनर्रचना झाली तर किमान दुर्घटनेचे भूत मानगुटीवर बसणार नाही.

मुंबईत ताशी ३० विमाने

■ सद्यःस्थितीत मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यग्र विमानतळ आहे. या विमानतळावरून दिवसाकाठी ९५० पेक्षा जास्त विमानांची ताशी ३० विमाने ये-जा होते.

■ या नियमित विमानांखेरीज मुंबई विमानतळावरून खासगी विमाने तसेच मालवाहू विमानांचा प्रवासही मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे विमान वाहतूक कक्षातील अधिकाऱ्यांना डोळ्यात तेल घालून प्रत्येक मिनिटाकाठी होणाऱ्या उड्डाणाचे नियोजन करावे लागते.

■ हे नियोजन केवळ कागदोपत्री होत नाही. एटीसीकडून उडाणासाठी अनुमती दिली जाते त्यावेळी विमानाने निर्धारित वेळेत उड्डाण करणे अपेक्षित असते. त्यात एका सेकंदाचाही विलंब झाला तरी धावपट्टीवरील वाहतुकीचे नियोजन कोलमडू शकते. काटकोनी धावपट्ट्यांवर जी विमाने उतरण्याच्या तयारीत असतात, अशा विमानांना अनुमती देताना संबंधित विमानाचे आकारमान, त्याचा वेग आणि विमानतळ परिसरात असलेल्या वाऱ्याचा वेग याचे गणित मांडून अनुमती दिली जाते.

काटकोनात असलेल्या धावपट्ट्यांवर जेव्हा एकावेळी एकाच विमानाचे उड्डाण किंवा लैंडिंग होत असते आणि त्यात या तांत्रिक गणितांचा विचार "करायचा असतो तेव्हा ते काम निश्चितच आव्हानात्मक असते, हे खरे.

टॅग्स :Mumbaiमुंबईairplaneविमान