शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!

By मनोज गडनीस | Updated: June 16, 2024 07:45 IST

विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी:  गेल्या शनिवारी मुंबईविमानतळावर एकीकडे एअर इंडिया कंपनीचे विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर आले आणि ते उड्डाण घेत असताना मागील बाजूने इंडिगोचे विमान धावपट्टीवर उतरले. दोन विमानांमध्ये जेमतेम पाचशे मीटरचे अंतर होते. यापैकी एका जरी विमानाचे नियंत्रण सुटले असते किंवा अचानक विमानात तांत्रिक दोष निर्माण झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र, असे का झाले? दोन विमाने एकाचवेळी धावपट्टीवर आली याला केवळ एक घटना म्हणून पाहता येणार नाही. तर याच्या मुळाशी गेल्यास मुंबई विमानतळाची रचना, रोज होणारी महाकाय विमान वाहतूक या मुद्द्यांनाही विचारात घेणे गरजेचे आहे. तरच, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचणे शक्य होईल.

१८५० एकर अशा विस्तीर्ण जागेत पसरलेल्या मुंबई विमानतळावरील सर्वांत मोठी समस्या आहे ती धावपट्टीची. देशात किंवा जगात बहुतांश विमानतळांवर दोन, तीन किंवा त्यापेक्षा अधिक धावपट्ट्या या समांतर रेषेत असतात. मात्र, मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्या या काटकोनात आहेत. त्यामुळे एकावेळी एकच उड्डाण किंवा एका विमानाचे लैंडिंग होते.

 

२००० सालच्या सुरुवातीला जेव्हा मुंबई विमानतळाचा पुनर्विकास झाला त्यावेळी मुंबई विमानतळाला साधारणपणे अर्धगोलाकार स्थितीत वेढा घालून असलेल्या झोपड्या हटवून विमानतळ परिसर वाढवून या धावपट्ट्या समांतर करण्याचा विचार झाला होता. त्या दृष्टीने नियोजनही झाले होते. मात्र, या झोपडपट्ट्यांवर ज्यांच्या मतांची मदार आहे त्या स्थानिक राजकारण्यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणाला आणि झोपड्या हटविण्याला प्रचंड विरोध केला. राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून विमानतळाची पुनर्रचना झाली तर किमान दुर्घटनेचे भूत मानगुटीवर बसणार नाही.

मुंबईत ताशी ३० विमाने

■ सद्यःस्थितीत मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यग्र विमानतळ आहे. या विमानतळावरून दिवसाकाठी ९५० पेक्षा जास्त विमानांची ताशी ३० विमाने ये-जा होते.

■ या नियमित विमानांखेरीज मुंबई विमानतळावरून खासगी विमाने तसेच मालवाहू विमानांचा प्रवासही मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे विमान वाहतूक कक्षातील अधिकाऱ्यांना डोळ्यात तेल घालून प्रत्येक मिनिटाकाठी होणाऱ्या उड्डाणाचे नियोजन करावे लागते.

■ हे नियोजन केवळ कागदोपत्री होत नाही. एटीसीकडून उडाणासाठी अनुमती दिली जाते त्यावेळी विमानाने निर्धारित वेळेत उड्डाण करणे अपेक्षित असते. त्यात एका सेकंदाचाही विलंब झाला तरी धावपट्टीवरील वाहतुकीचे नियोजन कोलमडू शकते. काटकोनी धावपट्ट्यांवर जी विमाने उतरण्याच्या तयारीत असतात, अशा विमानांना अनुमती देताना संबंधित विमानाचे आकारमान, त्याचा वेग आणि विमानतळ परिसरात असलेल्या वाऱ्याचा वेग याचे गणित मांडून अनुमती दिली जाते.

काटकोनात असलेल्या धावपट्ट्यांवर जेव्हा एकावेळी एकाच विमानाचे उड्डाण किंवा लैंडिंग होत असते आणि त्यात या तांत्रिक गणितांचा विचार "करायचा असतो तेव्हा ते काम निश्चितच आव्हानात्मक असते, हे खरे.

टॅग्स :Mumbaiमुंबईairplaneविमान