शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
4
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
5
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
6
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
7
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
8
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
9
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
11
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
12
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
13
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
14
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
15
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
16
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
17
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
18
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
19
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
20
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील

वाहनांचा महापूर

By admin | Updated: May 8, 2017 23:38 IST

कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणाहून प्रवास करता यावा यासाठी स्वत:चे वाहन असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातून मग वाहन खरेदीला वेग येतो.

कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणाहून प्रवास करता यावा यासाठी स्वत:चे वाहन असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातून मग वाहन खरेदीला वेग येतो. खरेदीदार वाढले की उत्पादनही वाढवावे लागते. तेच सध्या भारतातील वाहन उद्योगाचे झाले आहे. भारतात वाहनांची एवढी मागणी आहे की गेल्या वर्षभरात भारतात तब्बल दोन कोटी ५३ लाख १६ हजार वाहने निर्माण झाली आहेत. सियाम या भारतीय वाहन उद्योगांच्या संघटनेनेच ही आकडवारी जाहीर केली आहे. नोटाबंदीचा फटका सहन करूनही गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्पादनात साडेपाच टक्के वाढ झाली आहे. एकूणच वाहन उद्योगाची भरभराट होताना सध्या दिसत आहे. मात्र हे सारे होत असतानाच आणि प्रत्येक घरात वाहन येत असताना हा महापूर आपल्याला कुठे घेऊन जातोय, याचा विचार मात्र कोणीच करताना दिसत नाही. बीएस-३ मानकांनुसार तयार करण्यात आलेल्या वाहनांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यानंतर तर अशा वाहनांची कंपन्यांनी स्वस्तात विक्री करण्यात सुरुवात केली. या वाहनांच्या खरेदीलाही पूर आला होता. तीन दिवसांत लाखो वाहने विकली गेली. स्वस्तातले वाहन आपल्याला मिळावे यासाठी विक्रेत्यांकडे लोकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र यातील एकानेही विचार केला नाही की हे वाहन विकत घेऊन आपण अधिक प्रदूषण करणार आहोत. आता ही सर्व वाहने रस्त्यावर आहेत. पूर्वी ज्या गतीने प्रदूषण होत होते त्यात या नव्या वाहनांनी भर घातली आहे. शिवाय रोज विक्री होणाऱ्या इतर वाहनांची गणना तर वेगळीच. यंदा तयार झालेल्या वाहनांची आकडेवारी पाहता यातील अर्धी वाहने निर्यात झाली, असे जरी गृहीत धरले तरी अर्धेअधिक वाहने भारतीय बाजारात विकली गेली असणार. म्हणजेच जवळपास सव्वा कोटी वाहने वर्षभरात रस्त्यावर आली. या आकडेवारीनुसार रोज नव्याने रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या जवळपास ३५ हजारांच्या घरात आहे. आपल्या देशात चांगले रस्ते नाहीत, ट्राफिक जामने वैताग आणलाय अशी ओरड आपण कायम ऐकत असतो. मात्र, अशा रस्त्यांवरूनही गाडी दामटवणे थांबवायला कुणी तयार नाही. सिंगापूरसारख्या देशात वैयक्तिक वाहनांवर दुपटीने कर आकारला जातो. त्यामुळे तेथे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी आहे आणि लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर करतात. आपल्या देशात असे होणे अवघड असले तरी किमान धूर फेकणाऱ्या या वाहनांच्या संख्येवर अंकुश आल्यास निश्चितच देशातील प्रत्येकाचे आयुष्य किमान काही दिवसांनी वाढेल.