शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फसलेली कोटींची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:43 IST

मिलिंद कुलकर्णी विकासाची कामे करीत असताना लोकप्रिय घोषणा, मोठमोठाले आकडे जनतेच्या तोंडावर फेकले की, तो राजकीय पक्ष, केंद्र, राज्य ...

मिलिंद कुलकर्णी

विकासाची कामे करीत असताना लोकप्रिय घोषणा, मोठमोठाले आकडे जनतेच्या तोंडावर फेकले की, तो राजकीय पक्ष, केंद्र, राज्य सरकारे आणि लोकप्रतिनिधी स्वत:ला अनेक विशेषणे लावून घ्यायला मोकळी होतात. ‘करून दाखवलं’, ‘विकासपुरुष’ ही विशेषणे आपण ऐकली आहेत; पण वास्तवात तसे काहीही घडत नाही. घोषणांचा फुगा फुटतो. आपण फसवले गेलो, हा सल मतदारांच्या मनात मात्र कायम राहतो. अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे देता येईल. १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करू, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले होते. सव्वा वर्ष झाले; पण आश्वासनाची पूर्ती झाली नाही. आश्वासनाच्या उलट लोकांना अवास्तव व अवाजवी बिले आल्याची तक्रार मोठ्या प्रमाणात झाली.तोच विषय रेल्वे अर्थसंकल्पाचा आहे. पक्षीयदृष्ट्या विचार केला तर खान्देशातील चारही खासदार भाजपचे आहेत. मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला शंभर टक्के पाठिंबा दिला, असा याचा अर्थ आहे; पण त्या तुलनेत खान्देशला केंद्र सरकारकडून फार काही मिळाले, असे झाले नाही. २०२० आणि २०२१ च्या अर्थसंकल्पातील तरतुदी पाहिल्या तर नव्याने काही निधीची तरतूद केली गेली, असे दिसत नाही. भुसावळ ते जळगाव, जळगाव ते मनमाड यांच्या चौथ्या व तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी गेल्यावर्षी ५५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. यंदाही ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ५० कोटींची वाढ केली असली तरी या मार्गासाठी किती निधीची अपेक्षा आहे, किती वर्षात हा मार्ग पूर्ण होण्याची मुदत आहे, याविषयी ना रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बोलत आहेत ना खासदार बोलत आहेत. पाचोरा ते जामनेर या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी डीपीआर बनविण्यासाठी गेल्यावेळी एक कोटी रुपयांची तरतूद केली गेली. या सर्वेक्षणाचे काय झाले, हे समोर आलेले नाही. यंदा मात्र सर्वेक्षणाला गती देऊ, असे रेल्वेचे अधिकारी म्हणत असताना दुसरीकडे ही रेल्वे पुढे बोदवड, मलकापूरपर्यंत नेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची घोषणा केली गेली आहे. सर्वेक्षण अद्याप झालेले नाही आणि त्यापूर्वीच विस्तारीकरणाचा विचार करण्याच्या या कृतीला काय म्हणावे?प्रकल्प का रेंगाळतात?गेल्या वर्षी पॅसेंजर गाड्या १६ डब्यांच्या मेमू ट्रेनमध्ये रूपांतरित करण्याची घोषणा करण्यात आली. यंदा सांगितले गेले की, मेमू कारशेडसाठी दुसऱ्यांदा निविदा काढणार आहोत. बडनेरा, अमरावती- नरखेडमार्गावरील आठ डब्यांच्या मेमू ट्रेन बारा डब्यांच्या करण्याचा विचार आहे. याचा अर्थ मेमूचा विषय अजून अधांतरी आहे. मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गासाठी ९,५४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीचे स्वागत करत असताना हा प्रकल्प का रेंगाळत आहे, याचाही गांभीर्याने विचार करायला हवा. सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असताना त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रथम या रेल्वेसंबंधी समावेश झाला होता. ऑगस्ट २०१८ मध्ये ३६२ कि.मी. अंतराच्या या रेल्वेमार्गासाठी सामंजस्य करार झाला. केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, केंद्रीय रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार भारतीय बंदर रेल्वे महामंडळ हा मार्ग उभारणार आहे. त्यासाठी विशेष उद्देश कंपनी गठित करण्यात येईल. जेएनपीटी, जलवाहतूक मंत्रालय किंवा त्यांनी नेमलेल्या उपक्रमांचा ५५ टक्के हिस्सा राहील. रेल्वे, महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकार १५ टक्के हिस्सा देईल. आता रेल्वेने त्यांची तरतूद केली. जलवाहतूक मंत्रालय, दोन्ही राज्य सरकारे त्यांचे योगदान कधी देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहिल्या टप्प्यात धुळे ते नरडाणा या मार्गाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भूसंपादनाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद झाली म्हणून आनंद मानायचा की, इतर बाबी कधी स्पष्ट होणार, याची प्रतीक्षा करायची हा प्रश्न आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने या रेल्वेमार्गाचे काम होईल, अशी अपेक्षा आहे. त्याच गडकरी यांनी २५ जानेवारी २०१६ रोजी जळगाव येथे १६ हजार ५८२ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ केला होता. पाच वर्षांत एकही रस्ता पूर्ण झालेला नाही. कोणताही शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. कामे कधी पूर्ण होतील, याची शाश्वती द्यायला तयार नाही. मग जनतेने खड्ड्यांतून मार्गक्रमण करीत राहावे, याशिवाय दुसरा काय पर्याय आहे.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव