शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

उडाला तर पक्षी...!

By admin | Updated: December 15, 2015 03:53 IST

पॅरिस येथील जागतिक हवामान बदलासंबंधीच्या परिषदेचं सूप वाजवल्यावर जे काही दावे-प्रतिदावे केले जात आहेत, ते बघितल्यावर ‘उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक’ ही

पॅरिस येथील जागतिक हवामान बदलासंबंधीच्या परिषदेचं सूप वाजवल्यावर जे काही दावे-प्रतिदावे केले जात आहेत, ते बघितल्यावर ‘उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक’ ही म्हण आठवल्याशिवाय राहणार नाही. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा आविर्भाव हा ‘विजयी झालो’, असा आहे. उलट पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना व तज्ज्ञ पूर्णत: निराशेचा सूर लावत ‘काहीच हाती लागले नाही’, असे म्हणत आहेत. थोडे वस्तुनिष्ठरीत्या बघायचे झाल्यास अशा जागतिक परिषदांमधून फारसे कधीच काही ठोस हाताला लागत नसते. उदाहरणार्थ, जागतिक स्तरावरचे दहशतवादाचे संकट कसे निवारायचे याबद्दल अलीकडेच झालेल्या ‘जी-२०’ गटाच्या बैठकीत व्यापक सहमती झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात सीरियात जे काही चालू आहे, त्याबाबत या बैठकीला हजर असलेल्या रशियाचे वेगळे मत आहे. पण ‘इस्लामिक स्टेट’चा नायनाट करणे जागतिक शांततेसाठी गरजेचे आहे, या उद्देशाला रशियाचा पूर्ण पाठिंबा आहे. मतभेद आहेत, ते हे कसे करावे याबद्दल. ते मतभेद तसेच ठेवूनही ‘जी-२०’ गटाच्या बैठकीत सहमती झाल्याचे जाहीर केले गेले. हे उदाहरण अशासाठी लक्षात घ्यायचे की, जागतिक स्तरावर सहमती होते, ती इतकीच. त्यापलीकडे प्रत्येक देश प्राधान्य देतो, ते आपल्या हितसंबंधांना. पॅरिस परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या कराराकडे याच दृष्टीने बघायला हवे. हवामान बदलामुळे जगाला धोका संभवतो, याबद्दल पूर्ण सहमती या परिषदेत झाली आणि हा धोका निवारण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन होऊन त्या संबंधातील काही मुद्यांवर करार करण्याचे ठरले. कार्बन वायूचे उत्सर्जन नियंत्रणात आणून नंतर ते टप्प्याटप्प्याने कमी करीत नेल्यासच हवामान बदलाचा हा धोका निवारता येण्याजोगी परिस्थिती निर्माण होणार आहे. दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींमुळे कार्बनचे उत्सर्जन होत असते. मूलत: कारखाने, वीजनिर्मिती केंद्रे, सर्व प्रकारची वाहने जो धूर ओकत असतात, त्यात कार्बन वायूचे प्रमाण मोठे असते. हे आटोक्यात आणणे आवश्यक आहे. पण तसे करायचे झाल्यास धूर कमी सोडणारी यंत्रे कारखान्यात बसवावी लागतील, वाहनांची इंजिनेही तशी बनवावी लागतील. हे खर्चाचे काम आहे; कारण त्यासाठी नवे संशोधन करावे लागेल, नंतर अशा यंत्रांचे व इंजिनांचे उत्पादन करणे भाग आहे. म्हणजे अशा यंत्रांची किंमत वाढणार. ती बसवून उत्पादन केले जाणाऱ्या वस्तूंचे भाव वाढणार. त्याचा फटका सर्वसमान्यांना बसणार. जर हे शक्य होणार नसेल, तर त्यापैकी जास्त धूर ओकणारे कारखाने बंद करावे लागतील किंवा जादा धूर सोडणारी वाहने रस्त्यावर आणण्यास बंदी घालावी लागेल. कारखाने बंद पडल्यास बेरोजगारी वाढेल, वाहने रस्त्यावर आणू न दिल्यास लोकांचीच गैरसोय होईल, शिवाय यापैकी ज्या काही रिक्षा वा टॅक्सी किंवा मालमोटारी असतील, त्यांच्या चालकांचे उत्पन्नाचे साधनच जाईल. पण हवामान बदलाचा धोका महाभयंकर असल्याने काही पावले उचलावीच लागणार आहेत. म्हणूनच जेव्हा हा हवामान बदलाचा धोका जाणवू लागला आणि तो निवारण्यासाठी काय पावले टाकावीत, याची चर्चा सुरू झाली, तेव्हापासून ज्या राष्ट्रांनी गेल्या दोन अडीच शतकात औद्योगिकीकरणावर भर देऊन आपली प्रगती साधताना प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आता आपली जबाबदारी ओळखून विकास साधू पाहणाऱ्या देशांना कार्बनचे कमी उत्सर्जन करणारी अत्याधुनिक यंत्रे बसविण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे, ही मागणी होऊ लागली. विकसित देशांनी ती प्रथम फारशी मनावर घेतली नाही. नंतर तत्वत: ती मान्य केली. दरवर्षी १०० अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची तयारी दाखवली. प्रत्यक्षात फारसे काही झाले नाही. आता या पॅरिस परिषदेत विकसित देशांनी असा निधी देण्याचे मान्य केले आहे. पण हे बंधनकारक असावे, ही मागणी त्यांनी फेटाळली आहे. दुसरीकडे जगातील सर्व देशांनी कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याची आपापली उद्दिष्ट्ये जाहीर करावीत, अशी मागणीही गेली काही वर्षे हवामान बदलासंबंधीच्या चर्चा व बैठकात होत आली आहे. त्यावरही या परिषदेत शिक्कामोर्तब झाले. येत्या दोन दशकात किमान ३३ टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट भारताने जाहीर केले आहे. पर्यावरण की विकास, हा जो वितंडवाद घातला जातो, तो थांबल्यास निदान या दिशेने पावले तरी टाकली जाऊ शकतात. देशाच्या राजधानीत एक उपाय म्हणून सम-विषम तारखांचा नियम वाहनांना लागू करण्याबाबतच्या निर्णयाने उद्भवलेला वाद अशा वितंडवादाचा निदर्शक आहे. पर्यावरणाचा समतोल साधतच विकास आणि त्यासाठी गरज भासल्यास जीवनपद्धतीत योग्य तो बदल, अशी आपली भूमिका हवी. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ ही हवामान बदलाच्या धोक्याची लक्षणे आहेत. ती लक्षात घेऊन तातडीने उपाय योजले जायला हवेत. ही जाणीव जागतिक स्तरावर प्रखर करणे इतकाच खरे तर पॅरिस परिषदेचा मर्यादित उद्देश होता. शेवटी जबाबदारी आहे, ती प्रत्येक देशाची आणि ती आपली आपण कशी पार पाडणार, हेच खरे आव्हान आहे. दिल्लीतील परिस्थितीने ते अधोरेखित केले आहे.