शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांत लोकमताचा कौल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 07:23 IST

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी प्रदेशातील तीन राज्यांसह तेलंगण व मिझोरम या दोन राज्यांत आता होत असलेल्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल देशाचे भावी राजकारण स्पष्ट करतानाच

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी प्रदेशातील तीन राज्यांसह तेलंगण व मिझोरम या दोन राज्यांत आता होत असलेल्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल देशाचे भावी राजकारण स्पष्ट करतानाच २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालांचेही संकेत देईल. छत्तीसगडमध्ये सोमवारी १८ जागांसाठी झालेले ७० टक्के मतदान या निवडणुकीविषयी जनतेत असलेली जागृती दाखविणारे आहे. विशेषत: नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता तेथील आदिवासी ज्या संख्येने मतदानाला आले ती संख्या शहरी मध्यमवर्गीयांनाही एक चांगला धडा शिकविणारी आहे. मतदान जास्तीचे झाले तर ते विरोधकांना अनुकूल ठरते असे अनेकवार आढळले असले तरी तो नियम समजण्याचे कारण नाही. तथापि झालेले मतदान अनेकांच्या छातीत घबराट उत्पन्न करणारे नक्कीच आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस, भाजपा व बसपा आघाडीसह जोगींचा छोटासा पक्ष लढतीत असला तरी त्यातली खरी चुरस काँग्रेस व भाजपामध्येच आहे. तेथील रमणसिंग सरकार गेली १५ वर्षे सत्तेत आहे आणि सत्तेत असण्याचे गैरफायदेही फार मोठे आहेत. मोदींचा जोर, संघाचे पाठबळ व दीर्घकाळच्या सत्तेने दिलेले लाभही त्यांच्या पाठीशी आहेत. तथापि राहुल गांधींनी त्या राज्यात दिलेली धडक मोठी व राजकीय जाणकारांना अजून उलगडता येऊ नये अशी आहे हे मात्र निश्चित. राजस्थानचा निकाल लागल्यातच जमा असून वसुंधरा राजे यांचे सरकार तेथे कमालीचे अप्रिय बनले आहे. त्या राज्यात झालेल्या लोकसभेच्या तीन पोटनिवडणुका त्यांनी एकाच वेळी गमावल्या आहेत. शिवाय काँग्रेसचे अशोक गेहलोत व सचिन पायलट या दोघांनीही वसुंधरा राजे यांना लोकप्रियतेच्या स्पर्धेत मागे टाकले आहे.

 

जाटांचे आंदोलन, राजपुतांचा असंतोष व सरकारचा प्रत्येक प्रश्नात प्रकट झालेला अपुरेपणा याही गोष्टी तेथील निकालांना वळण देऊ शकणाऱ्या आहेत. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची लोकप्रियता शाबूत आहे. मात्र त्यांचे सरकार तेवढेसे लोकप्रिय राहिलेले नाही. मंत्र्यांत दुही व पक्षात असंतोष आहे. मोदींचा प्रभाव येथेही मोठा असला तरी त्याला तडा देण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे. कमलनाथ, दिग्विजयसिंग व ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे तीनही नेते तेथे प्रथमच एकजुटीने काम करतानाही दिसले आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव त्या राज्यात स्वबळावर लढत आहेत. ‘मी राज्य मिळविले आहे, शिवाय हैदराबाद शहर त्यात आणले आहे. त्यामुळे दुसरा कोणी प्रतिस्पर्धी माझ्यासमोर उभा राहू शकणार नाही’ असा त्यांचा अहंकार आहे. ते मोदी व राहुल या दोघांवरही एकाच वेळी टीका करीत असल्याने त्या राज्यात तिहेरी लढतीचे चित्र पाहायला मिळेल आणि ते काहीसे चंद्रशेखर राव यांच्या बाजूला झुकलेलेही असेल. मिझोरम हे राज्य कोणताही राजकीय पक्ष चालवीत नाही. ही स्थिती असल्याने त्यातला निकाल देशाच्या एकूण राजकारणावर फारसा परिणाम करणारा असणार नाही. मात्र यापुढे होणाºया झारखंड, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या तीनही राज्यांतील सरकारे त्यांची लोकप्रियता गमावून बसली आहेत. मोदी येतील, संघ येईल आणि कदाचित राम मंदिरही धावून येईल यावर तेथील भाजपा सरकारांची मदार उभी आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मोदींची लोकप्रियता मोठी आहे. राहुल गांधींच्या टीकेचा रोख त्यांच्यावरच का असतो हे यातून समजणारे आहे. शिवाय काही काळापूर्वी दुबळे होऊन पाहिले जाणारे राहुल गांधींचे नेतृत्व आता चांगले वजनदार व राष्ट्रव्यापी झाले आहे. पुढची लोकसभा निवडणूकही त्याचमुळे काँग्रेस आणि भाजपातच लढविली जाईल (इतर पक्षांनी त्यांचा व्याप आपल्या राज्यापुरता व जातीपुरता राखल्यानेही असे झाले आहे). त्या निवडणुकांना काही महिन्यांचा वेळ असला तरी आताच्या पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आहेत आणि त्यातून उद्याचा लोकमताचा कौल लक्षात येऊ शकणार आहे. त्याचमुळे अमित शहांखेरीज देशातला कोणताही नेता आपल्या यशाचे मोठे दावे करीत नाही. राजकीय प्रश्नांहून पुतळ्यांना, मंदिरांना व दैवतांना सत्ताकारणात महत्त्व आले की कुणाच्या तरी पायाखालची वाळू घसरू लागली आहे एवढे मात्र नक्कीच लक्षात येते.सत्ताकारण म्हटले की काही प्रमाणात असंतोष राहतच असतो. मात्र या वेळी प्रथमच ‘करा वा मरा’ अशी भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली जाताना दिसणे हे महत्त्वाचे व यापुढे कोणताही पक्ष वा नेता मतदारांना गृहीत धरू शकणार नाही हे सांगणारे आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018