शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

पंचतारांकित राजकीय संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:36 IST

मिलिंद कुलकर्णी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांचे नेते, माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. काही ...

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांचे नेते, माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. काही नेत्यांच्या यात्रा सुरु आहेत. यात्रा म्हटले की, आपल्यापुढे तीर्थक्षेत्राची यात्रा, कावड यात्रा, चारधाम यात्रा समोर येतात. परंतु, अलिकडे वातानुकुलित गाड्यांमध्ये यात्रा होतात. अशा वाहनांमधून जनसामान्यांशी संपर्क किती साधला जातो, हा संशोधनाचा विषय ठरावा. आकर्षक वाहनांमधून निघणाऱ्या यात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा, गावांमध्ये जनता गोळा होतेच. रस्त्यावर किरकोळ अपघात झाला किंवा थोडी वादावादी झाली तरी गावातील बसथांब्यावर गर्दी जमायला वेळ लागत नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे. विमान, हेलिकॉप्टर आणि वातानुकुलित वाहनांच्या रांगा पाहायला लोक जमा होतात, हा त्यातलाच प्रकार आहे. ही गर्दी म्हणजे आपली आणि पक्षाची लोकप्रियता आहे, असा समज जर कोणी करीत असेल तर त्या भ्रमात त्यांनी राहावे, आपल्याला काय? नाही का?राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. जनसामान्यांशी असलेली नाळ बहुसंख्य पक्ष व नेत्यांची तुटत चालली आहे. याचे प्रमुख कारण असे की, सामान्यांना ही मंडळी सहज उपलब्ध होत नाही. अडीअडचणीच्यावेळी, समस्येच्या वेळी कैफियत मांडायला नेते भेटत नाही, आणि त्यांची यंत्रणा देखील कामचुकार असते. मंत्र्यापेक्षा त्यांचा स्वीय सहायक टेचात राहतो, हा अनुभव हमखास येतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या स्थितीचे मिश्किल शब्दात वर्णन केले आहे, चहापेक्षा किटली गरम...पूर्वी पक्ष कार्यालय हा कार्यकर्ते आणि सामान्य जनतेसाठी मोठा आधार होता. कार्यालयात कायम वर्दळ असायची. इतिहासात डोकावले तर सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रत्येक जिल्ह्यात स्वमालकीचे कार्यालय आहे. कोणताही मंत्री जिल्ह्यात आला की, तो प्रथम काँग्रेस भवनात यायचा हा प्रघात होता. शिवसेनेची मुंबईतील वाढ ही त्यांच्या शाखा कार्यालयांमुळे झाली. सेनेचे पहिल्या फळीचे नेते दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी हे रोज शाखा कार्यालयासाठी नियमित वेळ देत असत. जनसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करीत असत.आता मंत्री, नेते आले की, एखाद्या उद्योगपती, व्यापाºयाच्या निवासस्थानी किंवा त्याच्या फार्म हाऊसवर जाणे पसंत करतात. काही तर पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकतात. हॉटेल किंवा उद्योगाचा सुरक्षारक्षक सामान्य कार्यकर्त्यावर डाफरतो आणि नेत्याच्या भेटीपासून रोखतो. पक्षाचा झेंडा घेऊन गावात काम करणारा, प्रसंगी राजकीय आंदोलनात जमावबंदीसारखे अनेक गुन्हे अंगावर घेणारा, नातलग आणि मित्रांशी पक्षाच्या प्रेम आणि निष्ठेखातर कटूपणा घेणारा कार्यकर्ता नेत्याला भेटू शकत नाही, मध्यस्थामार्फत वशीला लावून भेटावे लागते, ही शोकांतिका आहे.अलिकडेच एका यात्रेत हॉटेलला मुक्कामी असलेल्या नेत्याला भेटायला खान्देशातील एक आमदार गेले असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. ओळखपत्राची मागणी केली. विधिमंडळात ओळखपत्र ठीक आहे, पण पक्षाच्या नेत्याला खाजगी हॉटेलमध्ये भेटायला जातानाही ओळखपत्र मागितले जाते, हा अनुभव त्या आमदाराला नवीन होता. नेत्याचे लक्ष गेल्याने त्यांनी हस्तक्षेप करीत बोलावून घेतले ही बाब वेगळी, पण हा प्रकार आमदाराबाबत घडतो. सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था असेल, याची कल्पना केलेली बरी.सत्ता, पद आहे तोवर गोतावळा जमतो, या दोन्ही गोष्टी सोडून गेल्यावर कावळे आणि मावळे दोन्ही उडून जातात. दरबार सुनासुना होतो. चिटपाखरु फिरकत नाही. तेव्हा भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव होऊ लागते. पण वेळ निघून गेलेली असते. ही वेळ येऊ द्यायची नसेल तर सर्वच राजकीय पक्षांनी पंचतारांकित संस्कृती सोडून पक्ष कार्यालय, सामान्य कार्यकर्त्याशी नाळ जुळवून ठेवायला हवी.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव