शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

कसोटी पराभवाच्या बदल्याची आग अखेर शांत झाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 09:06 IST

ज्या देशाची राखीव फळी बलाढ्य, तो देश कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवू शकतो. सध्या भारताकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा शानदार संघ आहे.

किशोर बागडे

वरिष्ठ उपमुख्य संपादक लोकमत, नागपूर

मुंबईतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानेन्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव करत दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. धावांचा विचार केल्यास भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला.  ४ ऑक्टोबर २०१८ ला राजकोटमध्ये वेस्ट इंडिजला एक डाव २७२ धावांनी हरविले होते. तो भारताचा सर्वांत मोठा विजय मानायला हवा. तथापि ऐतिहासिक  विजयाचा विचार केल्यास, इंग्लंडने एक डाव ५७९ धावांनी ऑस्ट्रेलियाला ओव्हलवर १९३८ ला हरविले होते. कसोटी क्रिकेटमध्ये हा सर्वांत ऐतिहासिक विजय मानला जातो. भारतासाठीदेखील मुंबईचा विजय ऐतिहासिक यासाठीच ठरतो, कारण विश्व कसोटी विजेत्या न्यूझीलंडचा ३७२ धावांच्या फरकाने फडशा पाडला.

सोमवारच्या विजयासह न्यूझीलंडकडून अव्वल स्थान हिसकावून घेत टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन संघ बनला. किवी संघाने जून २०२१मध्ये भारताकडून हा दर्जा हिरावून घेतला होता. त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून आपले स्थान पक्के केले होते. पण आता टीम इंडियाने गोड बदला घेत कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून उभय संघात सुरू असलेले बदल्याचे अग्निकुंड थंडावले असावे.भारताच्या मालिका विजयातून एक बाब प्रकर्षाने पुढे आली, ती ही की, भारतीय संघात राखीव फळी (बेंच स्ट्रेंग्थ) अतिशय मजबूत आहे.  या सामन्याआधी मयांक जवळपास बाहेर बसेल असे चित्र होते. पण मयांकने पहिल्या डावात दीडशे आणि दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. जयंतने फलंदाजीतही चुणूक दाखविली, शिवाय न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना पाठोपाठ बाद करीत ‘पळता भुई थोडी’ केली. राखीव फळीतील युवा खेळाडूंना पुढे आणण्याचे काम रवी शास्त्री-कोहली काळात सुरू झाले असेल, पण द्रविड-कोहली यांच्या नेतृत्वात राखीव फळी आणखी भरारी घेईल यात शंका नाही.

ज्या देशाची राखीव फळी अधिक बलाढ्य, तो देश कसोटीसारख्या प्रकारात दीर्घकाळ वर्चस्व गाजवू शकतो. कसोटीसारख्या प्रकारात प्रतिभावान खेळाडूंची फळी असणे फारच उपयुक्त ठरते. सध्या भारताकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा शानदार संघ आहे.हा मालिका विजयदेखील नवी उभारी देणारा ठरतो. काहीच दिवसांआधी भारतीय संघ टी-२० विश्वचषकात दारुण रीतीने पराभूत झाला. त्यामागे न्यूझीलंड कारणीभूत ठरला. त्याआधीही याच न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी (विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) अंतिम सामन्यातही भारताला धूळ चारली होती. त्याचा हा वचपा आहे. आधी टी-२० मालिकेत रोहितच्या नेतृत्वात ‘क्लीन स्वीप’ केले. आता विराटच्या नेतृत्वात कसोटीत नमविले. कानपूर कसोटीतही भारत जिंकू शकला असता. पण मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडने दहाव्या गड्यासाठी उपयुक्त भागीदारी करीत भारताला विजयापासून दूर ठेवण्यात यश मिळविले होते.

श्रेयस अय्यरला संधी मिळताच त्याने दोन्ही हातांनी संधीचे सोने केले. पदार्पणात दमदार शतक झळकाविणाऱ्या श्रेयसने दुसऱ्या डावातही संघ संकटात असताना शानदार अर्धशतकी योगदान दिले. संघावर संकट आले की, राखीव फळीतील हे खेळाडू मदतीला धावून येतात. ज्यांना ज्यांना संधी मिळते ते युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करतात. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी हे चांगले लक्षण आहे. टी. नटराजन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, हनुमा विहारी या सर्वांनी ‘मॅचविनिंग’ खेळी केली. शिवाय संकटकाळात पराभव टाळण्याचे काम केले. ऋषभला त्यावेळी रिद्धिमान साहाच्या जागी यष्टिरक्षणाची संधी मिळाली होती. युवा खेळाडूंची ही ताकद भारतीय संघाच्या झंझावाताची कहाणी अधोरेखित करणारी आहे.

अर्थात, अनुभवी खेळाडूंकडे डोळेझाक करता येत नाही. रविचंद्रन अश्विनने स्वत:च्या कामगिरीतून हे दाखवून दिले. चार वर्षे या जादुई फिरकी गोलंदाजाकडे दुर्लक्ष झाले होते. अखेर निवडकर्त्यांनी चूक सुधारली. अश्विनने मैदानावर आल्या आल्या मालिकेत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने यावर्षी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आणि अनिल कुंबळे आणि हरभजनसिंग यांचे विक्रम मोडले. भारतीय भूमीवर ३०० बळी पूर्ण करणारा तो आता दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळेने हा करिष्मा केला होता. टीम इंडियाला यानंतर द. आफ्रिकेचा गड सर करण्याचे आव्हान असेल. ठरल्यानुसार दौरा झाल्यास कसोटी विजयाच्या कहाणीची पुनरावृत्ती द. आफ्रिकेतदेखील होऊ शकणार आहे. त्यासाठी द्रविडच्या मार्गदर्शनात कोहली ॲन्ड कंपनी सज्ज असेल.

टॅग्स :IndiaभारतNew Zealandन्यूझीलंड