शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कामचुकारपणावर बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:08 IST

कमला मिलमधील दोन रेस्टोपबच्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पालिकेच्या तीन विभागांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

कमला मिलमधील दोन रेस्टोपबच्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पालिकेच्या तीन विभागांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्ट्रो’मध्ये ज्या पद्धतीने ही आग भडकली होती आणि बाहेर पडता न आल्याने होरपळून, गुदमरून ग्राहकांचा बळी गेला होता; ते पाहता सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यावर खरे तर पालिकेनेच कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. पण न्यायालयाच्या समितीने इमारत प्रस्ताव, अग्निशमन आणि आरोग्य विभागावर बोट ठेवत त्यांनी पुरेशी खातरजमा न करता परवाने दिल्याचा निष्कर्ष काढला. आधी जे परवाने दिले होते त्यातील त्रुटी दूर झाल्याची खात्री न करता परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. इमारत प्रस्ताव विभागाच्या परवानगीपूर्वीच उपाहारगृहाला परवानगी देण्यात आली; आवारातील बांधकाम वाढवणे - तेथे बदल करण्यास मुभा देण्यात आल्याबद्दल समितीने स्पष्टीकरण मागवले आहे. कळीचा मुद्दा म्हणजे आग लागल्यास बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा आहे की नाही, आगीची सूचना देणाऱ्या यंत्रणा बसवल्या आहेत की नाही याची खातरजमाही केली नसल्याकडे समितीने वेधलेले लक्ष. मूलभूत बाबींची पूर्तता नसतानाही परवाने का, कसे, कोणत्या परिस्थितीत, कुणाच्या सांगण्यावरून दिले गेले याचे उत्तर या विभागांना द्यावे लागेल आणि त्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, म्हणजेच वेळकाढूपणा करता येणार नाही, हे महत्त्वाचे. या आगीत १४ जणांचा बळी गेल्यानंतरही दोषी स्पष्ट होत नव्हते किंवा होऊ दिले जात नव्हते. त्यामुळे या समितीपुढील चौकशीत जबाबदारी निश्चित होईल आणि पालिकेतील विभागांना फार काळ परस्परांवर जबाबदारी ढकलण्याचा खेळ खेळता येणार नाही, हेही दिलासादायक आहे. या रेस्टोपबमधील आगीची दुर्घटना ही मुंबईतील पहिली घटना नव्हे. यापूर्वीही वेगवेगळ्या दुर्घटनांत यंत्रणांची हलगर्जी उघड झाली होती. अनेक उपाहारगृहे नियम धाब्यावर बसवून उभी असल्याचे या दुर्घटनेनंतर पालिकेने मान्य केले, काही काळ कारवाई झाली; त्यानंतर जैसे थे परिस्थिती राहिली. यात अनेकांचे हात गुंतलेले असल्याने जबाबदारी निश्चित करून संबंधितांना दोषी ठरवण्यात कायमच चालढकल केली गेली. तीच मुंबईकरांच्या जिवावर बेतते आहे. या प्रकरणातून दोषी कोण ते स्पष्ट होण्याबरोबरच पुन्हा या पद्धतीने कुणाचा जीव जाणार नाही, यासाठी नियम पाळण्यावर भर दिला; तरी आजवर जे जे आगीत होरपळले त्यांच्या जखमेवर हलकीशी फुंकर मारली जाईल.