शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

कामचुकारपणावर बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:08 IST

कमला मिलमधील दोन रेस्टोपबच्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पालिकेच्या तीन विभागांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

कमला मिलमधील दोन रेस्टोपबच्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पालिकेच्या तीन विभागांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्ट्रो’मध्ये ज्या पद्धतीने ही आग भडकली होती आणि बाहेर पडता न आल्याने होरपळून, गुदमरून ग्राहकांचा बळी गेला होता; ते पाहता सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यावर खरे तर पालिकेनेच कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. पण न्यायालयाच्या समितीने इमारत प्रस्ताव, अग्निशमन आणि आरोग्य विभागावर बोट ठेवत त्यांनी पुरेशी खातरजमा न करता परवाने दिल्याचा निष्कर्ष काढला. आधी जे परवाने दिले होते त्यातील त्रुटी दूर झाल्याची खात्री न करता परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. इमारत प्रस्ताव विभागाच्या परवानगीपूर्वीच उपाहारगृहाला परवानगी देण्यात आली; आवारातील बांधकाम वाढवणे - तेथे बदल करण्यास मुभा देण्यात आल्याबद्दल समितीने स्पष्टीकरण मागवले आहे. कळीचा मुद्दा म्हणजे आग लागल्यास बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा आहे की नाही, आगीची सूचना देणाऱ्या यंत्रणा बसवल्या आहेत की नाही याची खातरजमाही केली नसल्याकडे समितीने वेधलेले लक्ष. मूलभूत बाबींची पूर्तता नसतानाही परवाने का, कसे, कोणत्या परिस्थितीत, कुणाच्या सांगण्यावरून दिले गेले याचे उत्तर या विभागांना द्यावे लागेल आणि त्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, म्हणजेच वेळकाढूपणा करता येणार नाही, हे महत्त्वाचे. या आगीत १४ जणांचा बळी गेल्यानंतरही दोषी स्पष्ट होत नव्हते किंवा होऊ दिले जात नव्हते. त्यामुळे या समितीपुढील चौकशीत जबाबदारी निश्चित होईल आणि पालिकेतील विभागांना फार काळ परस्परांवर जबाबदारी ढकलण्याचा खेळ खेळता येणार नाही, हेही दिलासादायक आहे. या रेस्टोपबमधील आगीची दुर्घटना ही मुंबईतील पहिली घटना नव्हे. यापूर्वीही वेगवेगळ्या दुर्घटनांत यंत्रणांची हलगर्जी उघड झाली होती. अनेक उपाहारगृहे नियम धाब्यावर बसवून उभी असल्याचे या दुर्घटनेनंतर पालिकेने मान्य केले, काही काळ कारवाई झाली; त्यानंतर जैसे थे परिस्थिती राहिली. यात अनेकांचे हात गुंतलेले असल्याने जबाबदारी निश्चित करून संबंधितांना दोषी ठरवण्यात कायमच चालढकल केली गेली. तीच मुंबईकरांच्या जिवावर बेतते आहे. या प्रकरणातून दोषी कोण ते स्पष्ट होण्याबरोबरच पुन्हा या पद्धतीने कुणाचा जीव जाणार नाही, यासाठी नियम पाळण्यावर भर दिला; तरी आजवर जे जे आगीत होरपळले त्यांच्या जखमेवर हलकीशी फुंकर मारली जाईल.