शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

वाळू संकटमुक्तीचा मार्ग सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:00 IST

वाळू माफिया आणि त्यांच्या कारनाम्यांवर नेहमीच चर्चा होते. आता मात्र वाळूटंचाईच्या संकटमोचनाचा मार्ग बांधकाम क्षेत्र शोधू लागले आहे.

- राजा मानेवाळू माफिया आणि त्यांच्या कारनाम्यांवर नेहमीच चर्चा होते. आता मात्र वाळूटंचाईच्या संकटमोचनाचा मार्ग बांधकाम क्षेत्र शोधू लागले आहे.गेल्या दोन दशकांत महाराष्टÑात वाळू उपसा आणि त्याअनुषंगाने जन्मास आलेल्या वाळू तस्करीचे संकट टप्प्याटप्प्याने मोठे होत गेले. त्यातूनच वाळू तस्करीच्या अक्षरश: टोळ्या निर्माण झाल्या आणि करोडोंच्या अर्थकारणासह प्रशासन व राजकारणातही धुमाकूळ घालू लागल्या. वाळू लिलाव पद्धती, पर्यावरणविषयक मुद्यांना दिली जाणारी बगल, प्रचंड प्रमाणात महसूल बुडवून उपसली जाणारी वाळू, बेकायदेशीर वाळू व्यवहाराला संरक्षण देण्यासाठी नैसर्गिकरीत्या तयार झालेले नोटांच्या इशाऱ्यावर नाचणारे कवच आणि शासनाच्या विकास योजनांबरोबरच सर्वच स्तरातील लोकांच्या घरबांधणीसाठी लागणाºया वाळू उपलब्धतेत निर्माण होणारे अडथळे आदी प्रश्नांनी नेहमीच सर्व घटकांना त्रास दिलेला आहे.हरित लवादाने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नद्यांसह अनेक पाणीप्रवाह क्षेत्रातील वाळू उपशासाठी निश्चित स्वरूपाचे नियम ठरविले आहेत. वाहत्या पाण्याखालील वाळू न काढण्यापासून जागतिक स्तरावर विकसित झालेल्या उपसा यंत्रांवर विशिष्ट स्वरूपाचे निर्बंध घालण्यापर्यंतची काळजी लवादाने घेतली. त्या काळजीचा भाग म्हणून महसुली यंत्रणेनेही अनेक ठिकाणी कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. याच अंमलबजावणीला छेद देण्याचे काम वाळू तस्करांनी निर्माण केलेल्या भ्रष्ट यंत्रणेने केल्याचे दिसून येते. दुर्दैवाने या यंत्रणेत काही शासकीय हातही सहभागी झाले आणि ही यंत्रणा म्हणजेच वाळू वितरण पद्धती असे सूत्र बनले. या सूत्राला बदलून टाकण्याचा प्रयत्न अनेक चांगल्या अधिकाºयांनी केल्याचे उदाहरणेही आपण अनुभवली. अशा कर्तबगार कर्मचारी-अधिकाºयांना चिरडण्याचे प्रयत्न झाले. या पार्श्वभूमीवर पर्यावरणवादी, घरबांधणीसाठी वाळूची गरज असलेला सर्वसामान्य माणूस, मोठे शासकीय कंत्राटदार आणि बिल्डर्स यांना सुलभरीत्या वाळू मिळविणे जिकिरीचे बनले.पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील वाळू उपसा बंद करण्याच्या न्यायालयीन आदेशाने सर्वच घटकांची कोंडी झाली होती. हरित लवादाचे निकष आणि वाळू लिलाव प्रक्रिया पद्धतीतील सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच वाळूची उपलब्धता होण्याचा मार्ग कायद्याने ठरविला आहे. त्याच मार्गाने जाऊन वाळू उपलब्ध करून घेणे एवढाच पर्याय सध्या उरलेला आहे.एकट्या सोलापूर जिल्ह्याचे उदाहरण घेतले तरी राज्याच्या मानगुटीवर बसलेल्या वाळूच्या संकटाची कल्पना आपल्याला येईल. सोलापूर शहर व जिल्ह्यात उड्डाणपूल आणि अनेक रस्त्यांच्या तब्बल २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची फक्त घोषणाच नव्हे तर काही कामांचे भूमिपूजन करण्याचे कामही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. घरबांधणीसह सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आज वाळूअभावी ठप्प आहेत. या क्षेत्रावर अवलंबून असणाºया १५ हजार कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्नही तेवढाच गंभीर बनलेला आहे. सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न वाळूअभावी अधुरेच राहत असताना येत्या दोन वर्षांत लागणारी सहा लाख ब्रास वाळू कशी मिळणार आणि वाळू संकटमोचनाचा मार्ग कसा सापडणार, हाच खरा प्रश्न आहे.