शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटातील मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:18 IST

भारतीय मराठी चित्रपट महामंडळात सध्या ‘खरीखुरी मारामारी’ रंगली आहे. त्यात गटबाजीचे राजकारण आहे, वादावादी आहे, अंगावर धावून जाणे आहे, अर्वाच्य शिवीगाळीपासून महिलांच्या विनयभंगापर्यंतचे सर्व प्रकार आहेत.

असंख्य चित्रपटांची कथानके ही काल्पनिकच असतात. त्यातील व्यक्तिमत्त्वे, त्यांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथा रंगतदार करण्यासाठी निवडलेली असतात. खूप थोडे चित्रपट हे सत्यकथेवर आधारित असतात. याला मराठी चित्रपटही अपवाद नाही. त्यातील पाऊस असो की शृंगार, विनोद असो की मारामारी; सर्व काल्पनिक असते. मात्र, वाटते खरीखुरी! मराठी चित्रपटसृष्टीच्या वृद्धीसाठी २३ मार्च १९६७ रोजी नोंदणीकृत केलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात सध्या अशीच ‘खरीखुरी मारामारी’ रंगली आहे. त्यात गटबाजीचे राजकारण आहे, वादावादी आहे, अंगावर धावून जाणे आहे, अर्वाच्य शिवीगाळीपासून महिलांच्या विनयभंगापर्यंतचे सर्व प्रकार आहेत.

विनयभंगाची तक्रार पोलीस ठाण्यात गुदरल्यानंतर त्याचा कोर्टड्रामाही झाला आहे. सबळ पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटले. त्याचे सेलिब्रेशनही क्रूरपणे करणे आणि पुन्हा तणावपूर्ण वातावरण तयार होण्यापर्यंत महामंडळातील राजकारणाचे कथानक रंगले आहे. मात्र, चित्रपटातील कथेप्रमाणे हे काल्पनिक नाही तर सर्व सत्य घटनेवर आधारित आहे आणि मराठी चित्रपटाची जन्मनगरी असलेल्या कोल्हापूरनगरीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वयाच्या बावन्नाव्या वर्षी घडते आहे. ज्येष्ठ-श्रेष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली आणि बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर आणि ग. दि. माडगूळकर यांच्या उपाध्यक्षपदाखाली तिची वाटचाल सुरू झाली. मराठी चित्रपट क्षेत्राचा चौफेर विकास व्हावा, हा ढोबळमानाने मूळ उद्देश समोर ठेवून या दिग्गजांनी महामंडळाची स्थापना केली. सुधीर फडके अध्यक्ष असेपर्यंत तरी मूळ उद्देशानुसार कारभार चालू होता. या दिग्गज कलाकारांचा दबदबाच एवढा होता की, त्यांच्या नावानेच महामंडळ कार्यरत होते.

मुख्यालय कोल्हापुरात ठेवण्याचा उद्देशही हाच होता की, मराठी चित्रपटाचे पालनपोषण करणारा कलाकार ते असंख्य प्रकारच्या तंत्रज्ञांची खाण कोल्हापूरनगरीत होती. दोन स्टुडिओ कार्यरत होते. आजूबाजूच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या परिसरात आऊटडोअर शूटिंगची मोठी संधी होती. मुंबईमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीच्या वृद्धीसाठी जेव्हा गोरेगावमध्ये जागा देण्यात आली तेव्हा मराठी चित्रपट व्यवसायासाठी कोल्हापूरला चित्रनगरी करण्याच्या विचाराने उचल खाल्ली होती. जयंतराव टिळक, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आदी जाणकार राजकारणी सांस्कृतिक मंत्री होते, तेव्हा त्यांनी या महामंडळाला बळ देण्याचा प्रयत्न केला. मराठी चित्रपटास सर्वाधिक पोषक वातावरण कोल्हापुरात असल्याने अनेक प्रस्ताव या राजकारणी मंडळींनी जाणतेपणी समोर ठेवले. पण त्याचा लाभ घेणारे नेतृत्वच महामंडळाकडे उरले नव्हते. स्वत:हून तशी पावलेही टाकली गेली नाहीत. खुज्या माणसांची सावली लांब लांब पडू लागली की, सायंकाळ झाली आहे, असे म्हणतात तसे या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे झाले आहे. गेल्या रविवारी महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली ती एखाद्या साखर कारखान्याच्या सभेलाही लाजवेल इतक्या हीन पातळीवर पार पडली. समांतर सभाही झाली. त्याला काही अर्थ नसतो, हे माहीत असूनही त्यात ठराव करण्यात आले. महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मराठी भाषा, संस्कृती, कला, चित्रपट यांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या शिवसेनेचा आधार घेत मराठी चित्रपटसृष्टीचा विस्तार ठिकठिकाणी करण्यासाठी योगदान देता येऊ शकते. मात्र, याची जाणीव नसणारे खुजे लोक (हो खुजे लोकच, ते कलाकार वाटतच नाहीत) महामंडळाचा राजकीय आखाडा करून मारामाºया करीत आहेत. यांना कशाचेही सोयरसुतक नाही.

कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या उभारणीसाठी योगदान देण्याऐवजी फालतू राजकारण करीत खºयाखुºया मारामाºया करीत आहेत. सध्याचे चित्रपटविश्व डिजिटल क्रांतीमुळे जागतिक पातळीवर प्रचंड वेगाने विस्तारत असताना यांना जागेत, पैशात आणि सत्तेत रस वाटावा यापेक्षा मराठी भाषाविश्वाचे दुर्दैव ते काय?