शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

रात्रंदिन आमुचा समस्यांशी लढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 12:25 PM

कोरोना व्हायरसशी लढताना सामान्य माणसाची विनोदबुध्दी किती जागरुक आहे, याचा अनुभव समाजमाध्यमांवरील संदेशांवरुन येत आहे

मिलिंद कुलकर्णीकोरोना व्हायरसशी लढताना सामान्य माणसाची विनोदबुध्दी किती जागरुक आहे, याचा अनुभव समाजमाध्यमांवरील संदेशांवरुन येत आहे. कठीण प्रसंगात, संकट समयी हजरजबाबीपणा, विनोदबुध्दी शाबूत ठेवली तर त्यावर मात करणे सोपे जाते, असे त्यामागे संबंधितांचे तत्त्वज्ञान असावे.गर्दीत जाताना लोक मास्क लावून फिरत आहे, जळगावसारख्या ठिकाणी अशा मास्कची टंचाई निर्माण झाली आहे. या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर या संदेशांना चालना मिळाली. अहो, हे मास्क कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नव्हे तर जळगावमधील धुळीपासून वाचविण्यासाठी लावले जात आहेत. रोज अमूक ग्रॅम धूळ नाका, तोंडाद्वारे पोटात जात आहे. त्याचा परिणाम थेट शरीरावर होत आहे, असे त्या संदेशात म्हटले आहे.जळगावच नव्हे तर खान्देशातील बहुसंख्य पालिका, नगरपंचायती आणि ग्राम पंचायतीने रहिवाशांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मोलाचे कार्य केलेले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यास नागरिक सज्ज आहे. आता तुम्ही विचाराल, असे कोणते उपक्रम या संस्थांनी राबविले आहे. आता आधी रस्त्यांचे उदाहरण घेऊ. एकतरी गुळगुळीत रस्ता दाखवा आणि कोरोना प्रतिबंधाचा मास्क मोफत मिळवा, अशी आॅफर दिली तर कुणालाही महागडा मास्क देण्याची वेळच येणार नाही. (केवळ निवडणूक काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते अभिनेत्रीच्या गालाची उपमा गुळगुळीत रस्त्याचे उदाहरण देताना देत असतात आणि पुढे आश्वासनाप्रमाणे तेही विसरुन जातात, हा भाग अलाहिदा) वैद्यकीय उपचार पध्दतीतील अ‍ॅक्युपे्रशर आणि अ‍ॅक्युपंक्चरचा लाभ रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचारी आणि वाहनधारकांना झाल्याशिवाय राहत नाही. हा केवढा मोठा लाभ आहे. अन्यथा मसाज, मालीशसाठी होणारा खर्च वाचला ते विसरुन कसे चालेल?हा काळ पानगळीचा आहे. शतकोटी वृक्षलागवड झाल्याने सर्वत्र भरपूर झाडी झाली आहेत. पानगळ स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणात होते. सफाई कर्मचारी झाडून एकेठिकाणी तो कचरा गोळा करतात. आता हा कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाचे ट्रॅक्टर येणार आणि तो उचलणार, म्हणजे उगाच इंधनाचा अपव्यय होणार, हा उदात्त विचार लक्षात घेऊन सफाई कर्मचारी दोन पैशाची आगकाडी लावून कचरा जाळून टाकतात. आता त्यांच्या काटकसरीच्या राष्टÑव्यापी विचाराचा आदर्श घेऊन पुरस्कार देण्याऐवजी पर्यावरण, आरोग्य अशा क्षेत्रातील मंडळी धुराच्या नावाने बोंब ठोकतात, याला काय म्हणावे सांगा बरं. बरे एवढ्या सकाळी लोकांनी कशाला बरे घराबाहेर पडावे? चांगले घरी बसावे, टीव्हीवर रात्री राहून गेलेल्या मालिका बघाव्या, बायकोच्या हातचा नाश्ता करावा, पेपर वाचावा...ते दिले सोडून आणि धावायला, फिरायला बाहेर पडतात आणि धूर आणि धुळीच्या नावाने ओरडता, हे काही पटत नाही बुवा!रस्त्यावरील हातगाडीवरील, उघड्यावरील, धूर व धुळीचा प्रभाव असलेले, उघड्या गटारींच्या शेजारी असलेल्या टपऱ्यांवरील खाद्यपदार्थ खाऊन आमची प्रतिकारशक्ती दुप्पट झालेली असताना आम्हाला हो कसला कोरोना व्हायरस बाधणार? ५० वर्षे जुन्या पाईपातून आम्ही ‘अमृत’मय जलसेवन करीत असताना कसली बाधा होणार ? काही होत नाही कोरोना? उगाच घाबरते आहे सारे जग, नाही का?आता तर काय म्हणे मांसाहार करु नका? शाकाहार चांगला आहे, म्हणे. अहो, मांसाहार करणारे किती हुशार आणि चतुर असतात, त्यांना काही फरक पडणार नाही बघा. उघड्यावर मांस विक्री होते, कधी झाला परिणाम? कोंबड्या लटकवून मोटारसायकलीवरुन वाहतूक होते, काही झाला परिणाम? रस्त्यावर तापी, अनेरची मासेविक्री होते, कधी झाली का कोणती बाधा? उगाच तुम्ही मांसाहाराला बदनाम करतात बुवा!४७ तापमानामध्ये तुमचा तो व्हायरस तर टिकला पाहिजे. अहो, होळी जाऊ द्या, बघा सूर्यदेव कसा प्रताप दाखवतो. मुंबई-पुण्याचे पाहुणे काही खान्देशात यायला तयार होत नाही उन्हाळ्यात तिथे चीनमधला व्हायरस कुठे येऊ घातलाय, सांगा बरे. लक्झरी बसमधील वासाने त्या व्हायरसला फेफरे यायचे, उलटटपाली तो परत गेलाच म्हणून समजा. काय मत आहे तुमचे?

टॅग्स :Jalgaonजळगाव