शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

एका माळेचे मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 03:45 IST

भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा कोणताही सामना म्हणजे उभय बाजूंनी जणू धर्मयुद्ध ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. यामध्ये आता बहुधा पाकच्या जोडीला बांगला देशचादेखील समावेश करावा लागेल.

भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा कोणताही सामना म्हणजे उभय बाजूंनी जणू धर्मयुद्ध ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. यामध्ये आता बहुधा पाकच्या जोडीला बांगला देशचादेखील समावेश करावा लागेल. त्यामुळे क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ, खेळात कोणी तरी हरणार आणि कोणी तर जिंकणार वगैरे तत्वचिंतन येथे किमान प्रेक्षकांच्या बाबतीत तरी कधीच कामाला येत नाही. मैदानावर संबंधित संघांमधील खेळाडू भले आपसात ‘स्पोर्ट्समन स्पिरीट’ दाखवून देत असले तरी प्रेक्षकांमध्ये त्याचा लवलेशही नसतो आणि याबाबत दोन्ही देशांमधील (बांगला देश म्हणजे आधीचा पाकिस्ताच की) प्रेक्षकांमध्ये तसूभरही फरक नाही. वीस षटकांच्या मर्यादित सामन्यांच्या विश्व करंडक सामन्यात भारताने आपला पहिला सामना न्यूझीलंडबरोबर खेळताना गमावला तेव्हां भारतीय प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली खरी, पण ती तेवढ्यापुरतीच. पण अशीच हार पाकिस्तानशी खेळताना पदरात पडली असती तर धोनीच्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा जीव नकोसा करुन टाकला गेला असता. अर्थात हा कल्पनाविलास नाही. धोनीच्या घरावर लोक चालून गेले तो इतिहास काही फार जुना नाही. अगदी हाच आणि असाच प्रकार पाकिस्तानातही. आशियाई स्पर्धेत बांगला देशने पाकिस्तानाला हरवले तेव्हां समाज माध्यमांमधून दुबईत बसलेल्या एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याचे आकांडतांडव बरेच फिरत होते. याच स्पर्धेतील अंतिम सामना बांगला देश आणि भारतात झाला आणि भारत जिंकण्याच्या स्थितीत जाऊन पोहोचला तेव्हां शेर ए बांगला स्टेडियममध्ये जणू मातम पसरला होता. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानशी पडल्यानंतर या प्रारंभिक सामन्यालाच अंतिम सामन्याचे स्वरुप प्राप्त झाले. उभय देशांमधील ‘हूज हू’ मोठ्या संख्येत या सामन्याला हजर राहिले. सामना फारसा अटीतटीचा न होता विराट कोहलीने भारताला विजय मिळवून दिला आणि मातम पसरला पाकिस्तानात. पाकचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याच्या नावाने अक्षरश: शिमगा सुरु झाला. त्याला प्रचंड शिवीगाळ सुरु झाली आणि अखेर लोकांच्या दबावाला बळी पडून पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने आफ्रिदीची कप्तानपदावरुन चक्क हकालपट्टी केली. याचा अर्थ जसे प्रेक्षक तसे प्रशासक. जगातील कोणत्याही संघाने हरवले तर दोन्ही देशात त्याचा काही परिणाम होत नाही. पण भारताने पाकला वा पाकने भारताला? लाहौल वलाकुवत!