शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

एका माळेचे मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 03:45 IST

भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा कोणताही सामना म्हणजे उभय बाजूंनी जणू धर्मयुद्ध ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. यामध्ये आता बहुधा पाकच्या जोडीला बांगला देशचादेखील समावेश करावा लागेल.

भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा कोणताही सामना म्हणजे उभय बाजूंनी जणू धर्मयुद्ध ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. यामध्ये आता बहुधा पाकच्या जोडीला बांगला देशचादेखील समावेश करावा लागेल. त्यामुळे क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ, खेळात कोणी तरी हरणार आणि कोणी तर जिंकणार वगैरे तत्वचिंतन येथे किमान प्रेक्षकांच्या बाबतीत तरी कधीच कामाला येत नाही. मैदानावर संबंधित संघांमधील खेळाडू भले आपसात ‘स्पोर्ट्समन स्पिरीट’ दाखवून देत असले तरी प्रेक्षकांमध्ये त्याचा लवलेशही नसतो आणि याबाबत दोन्ही देशांमधील (बांगला देश म्हणजे आधीचा पाकिस्ताच की) प्रेक्षकांमध्ये तसूभरही फरक नाही. वीस षटकांच्या मर्यादित सामन्यांच्या विश्व करंडक सामन्यात भारताने आपला पहिला सामना न्यूझीलंडबरोबर खेळताना गमावला तेव्हां भारतीय प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली खरी, पण ती तेवढ्यापुरतीच. पण अशीच हार पाकिस्तानशी खेळताना पदरात पडली असती तर धोनीच्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा जीव नकोसा करुन टाकला गेला असता. अर्थात हा कल्पनाविलास नाही. धोनीच्या घरावर लोक चालून गेले तो इतिहास काही फार जुना नाही. अगदी हाच आणि असाच प्रकार पाकिस्तानातही. आशियाई स्पर्धेत बांगला देशने पाकिस्तानाला हरवले तेव्हां समाज माध्यमांमधून दुबईत बसलेल्या एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याचे आकांडतांडव बरेच फिरत होते. याच स्पर्धेतील अंतिम सामना बांगला देश आणि भारतात झाला आणि भारत जिंकण्याच्या स्थितीत जाऊन पोहोचला तेव्हां शेर ए बांगला स्टेडियममध्ये जणू मातम पसरला होता. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानशी पडल्यानंतर या प्रारंभिक सामन्यालाच अंतिम सामन्याचे स्वरुप प्राप्त झाले. उभय देशांमधील ‘हूज हू’ मोठ्या संख्येत या सामन्याला हजर राहिले. सामना फारसा अटीतटीचा न होता विराट कोहलीने भारताला विजय मिळवून दिला आणि मातम पसरला पाकिस्तानात. पाकचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याच्या नावाने अक्षरश: शिमगा सुरु झाला. त्याला प्रचंड शिवीगाळ सुरु झाली आणि अखेर लोकांच्या दबावाला बळी पडून पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने आफ्रिदीची कप्तानपदावरुन चक्क हकालपट्टी केली. याचा अर्थ जसे प्रेक्षक तसे प्रशासक. जगातील कोणत्याही संघाने हरवले तर दोन्ही देशात त्याचा काही परिणाम होत नाही. पण भारताने पाकला वा पाकने भारताला? लाहौल वलाकुवत!