शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

एका माळेचे मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 03:45 IST

भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा कोणताही सामना म्हणजे उभय बाजूंनी जणू धर्मयुद्ध ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. यामध्ये आता बहुधा पाकच्या जोडीला बांगला देशचादेखील समावेश करावा लागेल.

भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा कोणताही सामना म्हणजे उभय बाजूंनी जणू धर्मयुद्ध ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. यामध्ये आता बहुधा पाकच्या जोडीला बांगला देशचादेखील समावेश करावा लागेल. त्यामुळे क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ, खेळात कोणी तरी हरणार आणि कोणी तर जिंकणार वगैरे तत्वचिंतन येथे किमान प्रेक्षकांच्या बाबतीत तरी कधीच कामाला येत नाही. मैदानावर संबंधित संघांमधील खेळाडू भले आपसात ‘स्पोर्ट्समन स्पिरीट’ दाखवून देत असले तरी प्रेक्षकांमध्ये त्याचा लवलेशही नसतो आणि याबाबत दोन्ही देशांमधील (बांगला देश म्हणजे आधीचा पाकिस्ताच की) प्रेक्षकांमध्ये तसूभरही फरक नाही. वीस षटकांच्या मर्यादित सामन्यांच्या विश्व करंडक सामन्यात भारताने आपला पहिला सामना न्यूझीलंडबरोबर खेळताना गमावला तेव्हां भारतीय प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली खरी, पण ती तेवढ्यापुरतीच. पण अशीच हार पाकिस्तानशी खेळताना पदरात पडली असती तर धोनीच्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा जीव नकोसा करुन टाकला गेला असता. अर्थात हा कल्पनाविलास नाही. धोनीच्या घरावर लोक चालून गेले तो इतिहास काही फार जुना नाही. अगदी हाच आणि असाच प्रकार पाकिस्तानातही. आशियाई स्पर्धेत बांगला देशने पाकिस्तानाला हरवले तेव्हां समाज माध्यमांमधून दुबईत बसलेल्या एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याचे आकांडतांडव बरेच फिरत होते. याच स्पर्धेतील अंतिम सामना बांगला देश आणि भारतात झाला आणि भारत जिंकण्याच्या स्थितीत जाऊन पोहोचला तेव्हां शेर ए बांगला स्टेडियममध्ये जणू मातम पसरला होता. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानशी पडल्यानंतर या प्रारंभिक सामन्यालाच अंतिम सामन्याचे स्वरुप प्राप्त झाले. उभय देशांमधील ‘हूज हू’ मोठ्या संख्येत या सामन्याला हजर राहिले. सामना फारसा अटीतटीचा न होता विराट कोहलीने भारताला विजय मिळवून दिला आणि मातम पसरला पाकिस्तानात. पाकचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याच्या नावाने अक्षरश: शिमगा सुरु झाला. त्याला प्रचंड शिवीगाळ सुरु झाली आणि अखेर लोकांच्या दबावाला बळी पडून पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने आफ्रिदीची कप्तानपदावरुन चक्क हकालपट्टी केली. याचा अर्थ जसे प्रेक्षक तसे प्रशासक. जगातील कोणत्याही संघाने हरवले तर दोन्ही देशात त्याचा काही परिणाम होत नाही. पण भारताने पाकला वा पाकने भारताला? लाहौल वलाकुवत!