शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

फारुक अब्दुल्लांची नजरकैदेतून मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 05:32 IST

फारुक अब्दुल्लांच्या सुटकेबद्दल जनतेने आनंद व्यक्त केलेला नाही. कलम ३७० रद्द केल्याने काश्मिरी जनतेच्या मनावर खोलवर आघात झाला असून, आतंकवादी शक्तींना बळ मिळाल्याचे दिसून आले.

मोदी सरकारने काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व अग्रणी नेते फारुक अब्दुल्ला यांची नजरकैदेतून मुक्तता केली. हा निर्णय अचानक घेण्यात आला. काश्मीरच्या पोलिसांनाही याची कल्पना देण्यात आली नव्हती. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या नजरकैदेमध्ये तीन महिन्यांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे जूनपर्यंत अब्दुल्ला मोकळे होणार नाहीत, असे सर्व जण समजत होते. परंतु, अचानक त्यांच्या मुक्ततेचे आदेश केंद्र सरकारकडून निघाले. काश्मीरमधील परिस्थितीत असा कोणता बदल झाला, की मोदी सरकारला ही उपरती झाली, हे अद्याप समजलेले नाही. फारुक अब्दुल्लाही त्याबद्दल बोललेले नाहीत.किंबहुना, राजकीय भाष्य करण्यास त्यांना अद्याप मोकळीक दिलेली नाही, असे कळते. गेल्या आॅगस्ट महिन्यात ३७० कलम रद्द करून काश्मीरचा विशेष दर्जा केंद्र सरकारने काढून घेतला. त्यानंतर लगेचच फारुक अब्दुल्ला, त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्टच्या नावाखाली ही नजरकैद कायदेशीर करण्यात आली. फारुक अब्दुल्ला यांची मुक्तता झाली असली तरी ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती हे नजरकैदेतच आहेत. अनेक अन्य नेते अद्याप तुरुंगात वा नजरकैदेत आहेत. फारुक अब्दुल्लांची सुटका करून काश्मिरी जनतेला थोडेफार आश्वस्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. गेले काही दिवस, विशेषत: दिल्ली दंगलीनंतर केंद्र सरकारचा नूर बदलत चालला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनपीआरबद्दल घेतलेली नरमाईची भूमिका, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याची दाखविलेली तयारी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भाजप नेत्यांनी केलेली आक्रमक भाषणे भोवली, याची कबुली अमित शहा यांनी पूर्वीच दिली. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे, त्यापाठोपाठ सीएए कायदा आणणे आणि एनपीआर व नंतर एनआरसीचा अट्टहास जाहीरपणे व्यक्त करणे याचा काही प्रमाणात राजकीय फायदा झाला असला, तरी मुस्लीम समाजात कमालीचा असंतोष व अविश्वास पेरण्याचे नुकसान या निर्णयांमुळे झाले. एका मोठ्या समुदायामधील अविश्वास देश चालविण्यासाठी अडचणीचा ठरू शकतो, याचे भान प्रथम पंतप्रधान मोदींना आले व त्यांनी शहा यांना त्यांची आक्रमकता बाजूला ठेवण्यास भाग पाडले. यामुळेच काश्मीरमध्ये संवादाची चाचपणी सुरू करण्यात आली. अब्दुल्ला यांची मुक्तता ही त्याची पहिली पायरी आहे. गेल्याच महिन्यात रॉचे माजी प्रमुख ए. के. दुलत यांनी अब्दुल्ला यांची भेट घेतली होती. केंद्रातील गृह खाते व सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अनुमतीने ही भेट झाल्याचे दुलत यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. वाजपेयींच्या काळात दुलत काश्मीरमधील वाटाघाटींत महत्त्वाची भूमिका बजावीत होते. त्या वेळी वाजपेयी आणि अडवाणी यांनी फारुक अब्दुल्ला यांना उपराष्टÑपती करण्याची तयारी दाखविली होती, असे दुलत यांनी काश्मीरविषयक पुस्तकात नमूद केले आहे. काश्मीरला भारताशी जोडण्याचा वाजपेयी सरकारचा प्रयत्न होता. दुलत त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. मुफ्ती मोहंमद सईद यांच्या पीडीपीबरोबर सरकार बनविण्याच्या आधी अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सबरोबर सरकार बनविण्यास भाजपचे नेते उत्सुक होते; पण ओमर अब्दुल्ला यांनी त्याला नकार दिला, असेही दुलत सांगतात. दुलत यांची विशेष भेट व त्यानंतर अब्दुल्ला यांची झालेली सुटका, काश्मीरमध्ये नुकताच उभा राहिलेला नवा राजकीय पक्ष यामागे एक सूत्र आहे. ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सर्व घडामोडी राजकीय आहेत. काश्मीरच्या नागरिकांना याबद्दल देणेघेणे नाही. सध्या काश्मीरमध्ये शांतता आहे व अब्दुल्लांच्या सुटकेबद्दल जनतेने आनंद व्यक्त केलेला नाही. मात्र, कलम ३७० रद्द केल्यामुळे काश्मिरी जनतेच्या मनावर खोलवर आघात झाला असून आतंकवादी शक्तींना अधिक बळ मिळाले आहे, असे दुलत यांचे निरीक्षण आहे. हे खरे असेल, तर काश्मीरची पुढील वाटचाल अद्याप खडतर दिसते. फारुक अब्दुल्लांच्या मुक्ततेने त्यामध्ये फार फरक पडणार नाही. पण संवादाची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने, परिस्थिती निवळावी म्हणून केंद्र सरकार काही पावले उचलण्याचा प्रयत्न करते आहे, एवढा संदेश मात्र सर्वत्र गेला आहे.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर