शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचे पॅकेज आणि कल्याणकारी योजना तरीही शेतक-यांच्या आत्महत्या, दुष्टचक्रात शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 02:03 IST

केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेळोवेळी देण्यात आलेले कोट्यवधींचे पॅकेज आणि कल्याणकारी योजना शेतक-यांच्या आत्महत्या थांबवू शकलेल्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेली कर्जमाफीही या दुष्टचक्रातून शेतक-यांची सुटका करू शकलेली नाही.

केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेळोवेळी देण्यात आलेले कोट्यवधींचे पॅकेज आणि कल्याणकारी योजना शेतक-यांच्या आत्महत्या थांबवू शकलेल्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेली कर्जमाफीही या दुष्टचक्रातून शेतक-यांची सुटका करू शकलेली नाही. दररोज वृत्तपत्रांमधून झळकणा-या शेतकरी आत्महत्येच्या घटना दुसरे काय सांगतात? गेल्या आठवड्यात यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात टिटवी या गावातील प्रकाश मानगावकर नामक एका शेतक-याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पानपत्र लिहून आत्महत्या केल्याने त्याची दखल घेतली गेली. एरवी या आत्महत्यांकडे कुणाचे फारसे लक्षही नसते. मोदी यांनी दाभाडीत दिलेल्या आश्वासनाच्या आधारे आम्ही जगत होतो. त्यानंतर राज्य शासनाने कर्जमाफी दिल्याने दिलासा मिळणार, अशी अपेक्षा होती. कर्जमाफीसाठी अर्जही केला पण खात्री वाटत नसल्याने तणावातून प्रकाश यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला, ही त्यांच्या पत्नीने मांडलेली व्यथा शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात शासनाला आलेले अपयश उघड करणारी आहे. हवामान बदल, सतत दोन, तीन वर्षात येणारा दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी यामुळे पिकांची होणारी हानी आणि डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी पार लाचार झाला आहे. त्याच्यात कमालीचे नैराश्य निर्माण झाले असून त्याला या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर होणारे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. राज्य शासनाने ३५ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली खरी पण त्यातील गुंता अजूनही सुटलेला नाही. ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा केला जात असला तरी नेमका किती शेतक-यांना त्याचा लाभ मिळणार याबाबत संभ्रम कायम आहे. यासाठीचे जे निकष ठरविण्यात आले आहेत त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप आहे. शेतक-यांच्या गळ्याला फास असताना त्याच्या आत्महत्यांचे सुद्धा राजकारण करण्याचा हिणकस आणि असंवेदनशील प्रकार सर्वच सत्ताधारी पक्ष आजवर करीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना शेतक-यांसाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती. त्याची दखल घेतली गेल्याचे दिसत नाही. शासनाला शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्याची खरोखरच इच्छा असेल तर कर्जमाफी अथवा पॅकेजचा फार्स न करता शेती आणि शेतक-यांच्या प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करावा आणि त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाय योजावेत.