शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

हे अपयश कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:05 IST

सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. गत दोन वर्षांपासून संत्रा बागायतदार अशा एका कीटकनाशकाची मोठ्या प्रमाणात फवारणी करू लागले आहेत

गतवर्षी विदर्भातील कापूस उत्पादक पट्ट्यात कीटकनाशक फवारणीने मोठ्या प्रमाणात शेतकरी-शेतमजुरांचे बळी घेतले. वेळीच लक्ष दिले नाही, तर संत्रा उत्पादक पट्ट्यात त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा कृषी संशोधक देऊ लागले आहेत. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांमधील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. गत दोन वर्षांपासून संत्रा बागायतदार अशा एका कीटकनाशकाची मोठ्या प्रमाणात फवारणी करू लागले आहेत, ज्याची संत्रा पिकासाठी शिफारसच करण्यात आलेली नाही. या कीटकनाशकाचा वापर अव्याहत सुरूच राहिल्यास, निकट भविष्यात केवळ संत्रा पिकालाच नव्हे, तर शेतकरी-शेतमजुरांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा कृषी संशोधकांनी दिला आहे. तो गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कपाशीवरील फवारणीने मोठ्या प्रमाणात बळी घेतल्यावर, त्यामागील कारणांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये असे आढळून आले, की इतर पिकांसाठी शिफारस करण्यात आलेल्या कीटकनाशकांचा कपाशीवरील फवारणीसाठी झालेला वापर, मृत्यूंसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरला. कपाशी उत्पादकांनी केलेली चूक आता संत्रा उत्पादकही करू लागले असल्याने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. गत काही वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत कंपन्या खूप आक्रमकरीत्या मार्केटिंग करू लागल्या आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके तसेच संजीवकांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण प्रचंड आहे. त्याचा लाभ घेत, सदर कंपन्या कृषी सेवा केंद्र चालकांना आकर्षक भेटवस्तू, विदेशवारी यासारखी आमिषे दाखवतात आणि आवश्यक नसलेल्या निविष्ठांची प्रमाणाबाहेर विक्री करण्यास भाग पाडतात. यामध्ये कंपनी व विक्रेत्यांची चंगळ होते; पण पुरेसे ज्ञान नसलेल्या शेतकºयांची फसगत होते. सर्व कृषी विद्यापीठांमध्ये स्वतंत्र विस्तार विभाग आहेत. विद्यापीठांमध्ये झालेल्या संशोधनाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचविणे, त्यांचे उद्बोधन-प्रबोधन करणे, हे विस्तार विभागांचे काम असते. त्यामध्ये ते कमी पडल्यानेच शेतकºयांची फसवणूक करण्याची संधी उत्पादक व विक्रेत्यांना मिळते. मनुष्यासाठीची औषधे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत. त्या स्वरूपाची व्यवस्था कीटकनाशके, खते, संजीवके यासाठी करण्याची शक्यता सरकारने पडताळून बघायला हवी. तसे होऊ शकल्यास, केवळ नफा कमावण्यासाठी गरज नसलेल्या निविष्ठा शेतकºयांच्या माथी मारण्याच्या प्रवृत्तीस आळा बसू शकतो. 

टॅग्स :Farmerशेतकरी