शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हे अपयश कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:05 IST

सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. गत दोन वर्षांपासून संत्रा बागायतदार अशा एका कीटकनाशकाची मोठ्या प्रमाणात फवारणी करू लागले आहेत

गतवर्षी विदर्भातील कापूस उत्पादक पट्ट्यात कीटकनाशक फवारणीने मोठ्या प्रमाणात शेतकरी-शेतमजुरांचे बळी घेतले. वेळीच लक्ष दिले नाही, तर संत्रा उत्पादक पट्ट्यात त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा कृषी संशोधक देऊ लागले आहेत. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांमधील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. गत दोन वर्षांपासून संत्रा बागायतदार अशा एका कीटकनाशकाची मोठ्या प्रमाणात फवारणी करू लागले आहेत, ज्याची संत्रा पिकासाठी शिफारसच करण्यात आलेली नाही. या कीटकनाशकाचा वापर अव्याहत सुरूच राहिल्यास, निकट भविष्यात केवळ संत्रा पिकालाच नव्हे, तर शेतकरी-शेतमजुरांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा कृषी संशोधकांनी दिला आहे. तो गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कपाशीवरील फवारणीने मोठ्या प्रमाणात बळी घेतल्यावर, त्यामागील कारणांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये असे आढळून आले, की इतर पिकांसाठी शिफारस करण्यात आलेल्या कीटकनाशकांचा कपाशीवरील फवारणीसाठी झालेला वापर, मृत्यूंसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरला. कपाशी उत्पादकांनी केलेली चूक आता संत्रा उत्पादकही करू लागले असल्याने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. गत काही वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत कंपन्या खूप आक्रमकरीत्या मार्केटिंग करू लागल्या आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके तसेच संजीवकांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण प्रचंड आहे. त्याचा लाभ घेत, सदर कंपन्या कृषी सेवा केंद्र चालकांना आकर्षक भेटवस्तू, विदेशवारी यासारखी आमिषे दाखवतात आणि आवश्यक नसलेल्या निविष्ठांची प्रमाणाबाहेर विक्री करण्यास भाग पाडतात. यामध्ये कंपनी व विक्रेत्यांची चंगळ होते; पण पुरेसे ज्ञान नसलेल्या शेतकºयांची फसगत होते. सर्व कृषी विद्यापीठांमध्ये स्वतंत्र विस्तार विभाग आहेत. विद्यापीठांमध्ये झालेल्या संशोधनाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचविणे, त्यांचे उद्बोधन-प्रबोधन करणे, हे विस्तार विभागांचे काम असते. त्यामध्ये ते कमी पडल्यानेच शेतकºयांची फसवणूक करण्याची संधी उत्पादक व विक्रेत्यांना मिळते. मनुष्यासाठीची औषधे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत. त्या स्वरूपाची व्यवस्था कीटकनाशके, खते, संजीवके यासाठी करण्याची शक्यता सरकारने पडताळून बघायला हवी. तसे होऊ शकल्यास, केवळ नफा कमावण्यासाठी गरज नसलेल्या निविष्ठा शेतकºयांच्या माथी मारण्याच्या प्रवृत्तीस आळा बसू शकतो. 

टॅग्स :Farmerशेतकरी