शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेताचे कुंपण, की कुंपणाचे शेत?

By सुधीर महाजन | Updated: January 17, 2018 03:02 IST

कुंपण शेत खाते की, शेताने कुंपण खाल्ले; असा हा प्रश्न आहे. श्रीधर स्वामी नावाचे एक संत होऊन गेले त्यांनी रसाळ भाषेत पांडव प्रतापासारखे ग्रंथ लिहिले एका भजनात त्यांनी एक अफलातून कल्पना मांडली

कुंपण शेत खाते की, शेताने कुंपण खाल्ले; असा हा प्रश्न आहे. श्रीधर स्वामी नावाचे एक संत होऊन गेले त्यांनी रसाळ भाषेत पांडव प्रतापासारखे ग्रंथ लिहिले एका भजनात त्यांनी एक अफलातून कल्पना मांडली; ते म्हणतात ‘पाण्याला लागली मोठी तहान’ पाण्याला तहान लागणे ही अद्भुत कल्पना तिचा गूढ तत्त्वज्ञानाच्या चौकटीतील अर्थ काहीही असो; पण सरळ सरळ पाणी तहानलेले ही जरा गंमत वाटते. तर हे आठवायचे कारण म्हणजे औरंगाबाद शहरात सध्या सुरू असलेले महसूल अधिकाºयांचे धोबीपछाड राजकारण. जे जमीन हस्तांतरणातून झाले. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरांनी अप्पर जिल्हाधिकारी चोरमारे, उपजिल्हाधिकारी कटके, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, वर्तमान निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांना निलंबित केले तर सेवानिवृत्त अप्पर आयुक्त लवांदे यांच्यावर ठपका ठेवला.औरंगाबाद शहरालगतच्या इनामी, मदतमास, खिदमतमास, महारवतनाच्या जमिनींचे इतरांच्या नावे फेरफारचे हे प्रकरण आहे. या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर पैसा खेळवला गेला असा संशय आहे. निलंबनापर्यंत हे प्रकरण साधे सरळ वाटत होते. परंतु देवेंद्र कटके या उपजिल्हाधिकाºयाने थेट विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरांवर एक कोटी रुपये लाच मागण्याचा आरोप केला आणि सारी महसूल यंत्रणा हादरली. एका कनिष्ठाने वरिष्ठांवर केलेला हा थेट आरोप होता या घटनेच्या अगोदर महसूल अधिकाºयांच्या वर्तुळात अशा मागणीची चर्चाही होती, आता जमीन हस्तांतर प्रकरण भापकर आणि कटके यांच्याभोवती फिरत आहे.गायरानातील या पडीक जमिंनींचे पन्नास-साठ वर्षांपूर्वी मोल नव्हते. त्यामुळे त्यांचे वतन, इनाम असे वाटप झाले. पुढे गावांचा विस्तार झाला आणि या जमिनींना भाव आला. शहरालगतच्या जमिनीवर बिल्डरांची नजर गेली आणि नाममात्र नजराणा भरून कोट्यवधीच्या अशा जमिनींचे हस्तांतरण झाले. धनदांडगी मंडळी, बिल्डर, राजकारणी आणि महसूल यंत्रणा असे भ्रष्टाचाराचे कडबोळे प्रत्येक शहरात तयार झाले. भूमाफिया हा एक वेगळाच प्रकार उदयाला आला, खरे म्हणजे या जमिनींचा मालक कोण? त्यांचे मूल्यांकन काय? अशा नजराणा व्यवहारामुळे सरकारचे किती नुकसान झाले? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि ते कुणीही विचारतही नाही. सरकारी जमिनी ताब्यात घेण्यासाठी जी.आर.चा आधार घेतला जातो. माणसेही उभी केली जातात. हे राज्यभर चालले. या अधिकाºयांच्या निलंबनानंतर गेली चार महिने भापकरांनी चौकशी अहवालावर निर्णय घेतला नाही. विश्वंभर गावंडेच्या बाजूने अहवाल देण्याच्या हालचाली चालू आहेत अशी कुणकुण लागल्यानंतर कटकेंनी भापकरांवर थेट शरसंधान केले आणि आयुक्त आपल्याविषयी जातीयवादी दृष्टिकोन ठेवून आहेत असा आरोप केला. शिवाय जिल्हाधिकाºयांनी आपला अहवाल दिलेलाच आहे. या अधिकाºयांवरील निलंबनाची कारवाई जुजबी आहे पुढे ती टिकणार नाही असे बोलले जाते; पण एक कोटीच्या मागणीचा आरोप यावर भापकरही काही बोलत नाहीत; त्यामुळे प्रकरण आणखीनच गूढ बनले म्हणूनच प्रारंभी म्हटल्याप्रमाणे कुंपणाने शेत खाल्ल्याचा हा प्रकार सकृतदर्शनी दिसतो. जमीन हस्तांतर प्रकरणात महसूल अधिकाºयांची ही उघडउघड हाणामारी असली तरी महसूल यंत्रणा भ्रष्टाचारात किती बरबटली त्याचे हे वास्तव चित्र आहे. प्रवृत्ती तीच, अधिकाºयांची नावे प्रत्येक ठिकाणी वेगळी.(sudhir.mahajan@lokmat.com)