शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फडणवीसांनी केला विलंब

By admin | Updated: January 7, 2016 21:48 IST

गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असूनही भाजपाचाच पालकमंत्री आपली भूमिका विसरला आणि सोलापूरच्या गड्डा यात्रा नियोजनावरून प्रशासन व देवस्थान समितीत रण पेटले

गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असूनही भाजपाचाच पालकमंत्री आपली भूमिका विसरला आणि सोलापूरच्या गड्डा यात्रा नियोजनावरून प्रशासन व देवस्थान समितीत रण पेटले. भाजपा सरकारने हा संघर्ष वेळीच का संपविला नाही? नऊशे वर्षांची परंपरा असलेली श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रा देवस्थान समितीच्या नेतृत्वाखाली भरते. वेगवेगळे धार्मिक विधी आणि गड्डा यात्रेत भक्तगण वर्षानुवर्षे आनंद-उत्साहाने सहभागी होतात. यात्रेचे नियोजन, सुरक्षा, पर्यावरण आणि कायदे याचा भक्तांशी कधी संबंधच आला नाही. जिल्हा प्रशासनाने तो संबंध येणार नाही याची काळजी आजवर घेतली. जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांचा प्रवेश झाला आणि त्यांनी यात्रेचा आणि त्या सर्व बाबींचा कायदेशीर संबंध असतो हे सांगायला सुरुवात केली. तशी ती सुरुवात गतवर्षीच झाली होती. पण यावर्षी तिने व्यापक स्वरूप धारण केले. त्या व्याप्तीने देवस्थान समितीच्या पारंपरिक अस्मिता अन् अधिकारालाच हात घातला. आपत्कालीन कायद्यानुसार यात्रेचा आराखडा, आपत्कालीन रस्त्यापासून ते थेट धुळीमुळे भक्तगणांच्या आरोग्यास निर्माण होणाऱ्या धोक्यापर्यंतचे अनेक मुद्दे पुढे आले. तसे पाहिले तर या मुद्यांवर चर्चेद्वारे तोडगा निघणे अवघड नव्हते. परंतु जिल्हाधिकारी मुंढे यांची नियम व कायद्यावर बोट ठेवणारी कार्यपद्धती आणि देवस्थान समितीच्या आग्रही भूमिकेमुळे चर्चेची दारे आपोआपच बंद झाली. जिल्हा प्रशासन विरुद्ध देवस्थान समिती असा थेट संघर्षच सुरू झाला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि तुकाराम मुंढे यांच्यातील मतभेदाने हा संघर्ष अधिकच तीव्र झाला. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यात संवादाऐवजी संघर्षच असेल तर त्या जिल्ह्याचे काय होणार? नेमके तेच घडले.वाद मिटविण्याऐवजी पुरावे-प्रतिपुरावे देण्याची शर्यतच लागली. आपत्कालीन रस्ता, होम मैदान आणि त्याची मालकी याचाच वाद रंगला. वर्षानुवर्षे यात्रेसाठी १५ डिसेंबरपासून इथले होम मैदान उत्साहाने सजायला लागते. एक जानेवारीला यात्रा सज्ज झालेली असते. याचे भान मुंढे, देवस्थान समिती अथवा पालकमंत्र्यांना राहिले नाही. त्यामुळे जानेवारीचा पहिला आठवडा सरला तरी देवस्थान समिती आंदोलनामध्येच गुंतली तर जिल्हाधिकारी ‘मीच खरा’ हे सांगण्यासाठी पुरावे गोळा करण्यात मग्न राहिले. या सगळ्या घटना-घडामोडीतून सर्वसामान्य सोलापूरकर आणि सिद्धेश्वर भक्तांच्या पदरी अनाठायी वैतागाशिवाय काहीच पडले नाही. शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांनी अपेक्षित असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेशी फारकत घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षाकडे दुर्लक्षच केले. अखेर आपत्कालीन रस्त्याचा वाद परवा मुख्यमंत्र्यांच्याच दरबारात मिटला. तो मिटविण्यासाठी जो निर्णय मुख्यमंत्री दीड महिन्यापूर्वी देऊ शकले असते तो त्यांनी परवा दिला. आपत्कालीन रस्ता या वर्षापुरता देवस्थानला देतानाच यात्रा परंपरेनुसार व्हावी, अशा सूचना दिल्या. कायमस्वरूपी यात्रा नियोजनासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली. जे काल केले ते दीड महिन्यापूर्वी केले असते तर गेला दीड महिना वेठीस धरलेल्या प्रत्येक घटकाला त्रास झाला नसता. केवळ काही घटकांच्या अहंकारासाठी सोलापूर शहराला वेठीस धरले गेले. एवढे होऊनही ज्या मुद्यांवरून संघर्ष सुरू झाला ते जवळजवळ सर्वच मुद्दे सर्वांनीच बासनात गुंडाळून ठेवले. शहरात होणारा पिवळ्या अशुद्ध पाण्याचा पुरवठा, दुष्काळ जाहीर करणार असल्याच्या महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या घोषणेचा पाठपुरावा आणि दुष्काळी परिस्थितीने भरडला जात असलेला जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी या जिव्हाळ्याच्या आणि गंभीर विषयांचा सर्वांनाच विसर पडला. यात्रेसंदर्भात स्वत: लक्ष घालण्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या विलंबामुळेच तर हे घडले नाही ना ? - राजा माने