शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

फडणवीस सरकराच्या दिव्याखाली अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:20 IST

आभासी प्रतिमा आणि वस्तुस्थिती यांच्यात टोकाचे अंतर असते. सध्या राज्य सरकारच्या ‘लाभार्थी’च्या जाहिराती जोरात सुरू आहेत.

आभासी प्रतिमा आणि वस्तुस्थिती यांच्यात टोकाचे अंतर असते. सध्या राज्य सरकारच्या ‘लाभार्थी’च्या जाहिराती जोरात सुरू आहेत. प्रत्यक्षात कोणाला, किती लाभ झाला? हा कदाचित शोधाचा विषय ठरू शकेल. याबाबत पनवेलमधील आदिवासी पाड्याचे उदाहरण बोलके ठरेल. पनवेल महापालिकेच्या हद्दीत वाघºयाची आणि सागाची वाडी हे आदिवासी पाडे येतात. या प्रभागामधून भाजपाचा नगरसेवकही निवडून आला आहे, पण याच नगरसेवकाच्या घरात अद्याप विजेचा प्रकाश पोहोचलेला नाही. मुंबईपासून अवघ्या ५० किलोमीटरवर असलेल्या पनवेल परिसरात अत्याधुनिक विमानतळ उभारले जात आहे, तसेच सिडकोनेही प्रचंड मोठी वसाहत निर्माण केली आहे. मात्र, विकासाचा हा प्रवाह या आदिवासी पाड्यांपर्यंत अजून का पोहोचलेला नाही? इथे वर्षानुवर्षे निवडून येणाºया जिल्हा परिषद सदस्याने अथवा ग्रामपंचायत सदस्याने प्रशासनापर्यंत मूलभूत समस्या का मांडल्या नाहीत? किंवा त्याने मांडलेल्या समस्यांना कचºयाची टोपली दाखविली गेली का? हेही तपासायला हवे. पनवेल महापालिकेत निवडून आलेल्या भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डाची, किंबहुना त्यांच्या राहत्या घराची जर ही अवस्था असेल, तर सामान्यांचे काय? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या भाजपाची सत्ता असलेल्या पनवेल महापालिकेतील आदिवासी पाड्यात, तीन वर्षांमध्ये एकाही आदिवासीला कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. सूर्य मावळला की, ‘गावात अंधार व घरात रॉकेलच्या दिव्याचा आधार’ अशी स्थिती आहे. भाजपा नगरसेवकाच्या आईला चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. एकीकडे केंद्र सरकारने ‘पंतप्रधान उज्ज्वला योजना’ सुरू केली आहे. ग्रामीण भागात चुलीला पर्याय म्हणून एलपीजी गॅस देण्याची घोषणा केली, पण अजून नगरसेवकाच्या घरातही तो पोहोचू शकलेला नाही. घरात वापराचे पाणी आणण्यासाठी दोन किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. गावामध्ये शाळा नाही. आरोग्याची सुविधा, शिधावाटप दुकान नाही, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी समाजमंदिरही नाही. नगरसेवकाच्या गावात व प्रभागात जाण्यासाठी कच्चा रस्ताही नाही. पायवाटेने पाच किलोमीटर डोंगर चढून जावे लागते. स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास सुरू असलेल्या पनवेलमधील सर्वच आदिवासी पाड्यांची स्थिती अशी बिकट आहे. हे मूलभूत प्रश्न सुटले, तरच देश खºया अर्थाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकेल. केवळ जाहिरातबाजी करून वस्तुस्थिती फार काळ लपविता येत नाही, हेच या घटनांवरून सिद्ध होते. त्यातून सरकार किती शिकणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस