शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

फडणवीस,पवार आणि हिरकणी

By admin | Updated: October 13, 2016 01:31 IST

भगवानगडावर पंकजा मुंडे जिंकल्या की हरल्या, त्यांच्या दसरा मेळाव्याला गर्दी किती होती, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात दिसणारी गर्दी वाढली की ओसरली, असे हिशेब

भगवानगडावर पंकजा मुंडे जिंकल्या की हरल्या, त्यांच्या दसरा मेळाव्याला गर्दी किती होती, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात दिसणारी गर्दी वाढली की ओसरली, असे हिशेब जुळविणे सुरु आहे. मुंडेंचे समर्थक व विरोधक असे दोघे ही आकडेमोड करीत आहेत. भगवानगडाचे दरवाजे बंद झाल्याने आता मुंडे यांचे काय होणार, असाही प्रश्न होता. पण, या सगळ्या शंकांवर मात करीत आपले स्थान अधिक बळकट करण्याचा राजकीय प्रयत्न पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात केलेला दिसतो. गडावर मेळावा घेण्यास महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केल्याने पंकजा यांच्या समर्थकांनी गडाच्या पायथ्याशी तो घेण्याचा तह स्वीकारला. या सगळ्या वादाचा फटका बसण्याऐवजी मेळाव्याचा ‘टीआरपी’ वाढला. यापूर्वी हा मेळावा नगर-बीड व वंजारी समाजापुरता मर्यादीत होता. यावेळी तो राज्यात गाजला. तणावाच्या परिस्थितीमुळे मेळाव्यात महिलांची संख्या कमी होती. वृद्धांपेक्षा तरुण जास्त होते. पण, गर्दीपेक्षाही मुंडे यांनी महादेव जानकर, सदाभाऊ खोत, राम शिंदे या मंत्र्यांना व राजू शेट्टी यांना व्यासपीठावर आणून स्वपक्षाला व विरोधकांनाही एक संदेश दिला. या तिन्ही मंत्र्यांना लाल दिवे मी मिळवून दिले असे त्यांनी उघडपणे सांगितले. मंत्र्यांनीही त्याची कबुली दिली. जानकर, खोत यांनी मंत्रिपदासाठी किती संघर्ष केला व भाजपाने त्यांना कसे झुलविले हे राज्याला ज्ञात आहे. अशा वेळी पंकजा यांनी हे विधान करुन भाजपात बहुजनांना आपणच न्याय देत आहोत, असे ठसविण्याचा प्रयत्न केला. मंत्रिपदे फडणवीस नाही, तर मी ठरविते असेच त्यांना म्हणायचे असावे असे दिसते. मेळाव्यात उपस्थित मराठा आमदारांनाही पंकजा यांनीच उमेदवारी दिली असे जानकर यांनी या आमदारांकडून व्यासपीठावरच वदवून घेतले. पंकजा यांच्या पाठीशी किती ताकद आहे हेच यातून दाखविण्याचा प्रयत्न झाला. एकप्रकारे पंकजा यांचे अनुयायी म्हणून राजकीय दीक्षा समारंभच झाला. राज्यातील मराठा मोर्चांचे प्रायोजक हे शरद पवार व प्रस्थापित मराठा नेते आहेत, असा तर्क काढला जातो. या पार्श्वभूमीवर जातीचे मोर्चे दुर्देवी आहेत हे पंकजा यांचे विधानही अर्थपूर्ण आहे. मराठा आरक्षणाला समर्थन दाखवितानाच दलितांना मुख्य प्रवाहात का आणले नाही, असा मुद्दा मांडत त्यांनी दलितांबद्दल सहानूभूती दाखविली. ‘माधवं’ समीकरणात दलितांची मते वाढावीत या नव्या राजकारणाची नांदी म्हणून त्यांच्या या विधानाकडे पाहाता येऊ शकेल. पंकजा यांनी भाषणात स्वत:ला हिरकणीची उपमा दिली. आपला ‘अभिमन्यू’ केला गेलाय असेही म्हटले. कटकारस्थानांचा बुरुज उतरुन मी हिरकणीसारखी गड उतरुन खाली आले, या त्यांच्या विधानाचा रोख महंतांसोबतच सत्ताधारी व विरोधकांकडे होता. मुख्यमंत्री या वादावर काहीही बोललेले नाहीत. पवारांचेही मौन आहे. या दोघांनीच कारस्थाने करुन गडाचे दरवाजे पंकजा यांच्यासाठी बंद केले, असा वंजारी समाजाचा रोष आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गत वर्षी भगवानगडावरील गर्दी पाहून आश्चर्यचकित झाले होते. तेव्हापासूनच मेळाव्याविरोधात राजकारण शिजले, असे मानले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही भगवानगड सोडणार नाही. पुढील वर्षी महंतच बोलावतील, असे ठासून सांगितले गेले.भगवानगडाचा मेळावा राजकीय नाही असे सांगितले जाते. पण, सर्व भाषणे राजकारणाने ओतप्रोत होती. जानकर, खोत यांनी तर या अध्यात्मिक पीठावर ‘दलाल’, ‘हरामखोर’ असे आक्रस्ताळी शब्द वापरले. विरोधी पक्षनेत्याचे नाव जानकर यांनी उद्धटपणे उच्चारले. गर्दीवर स्वार होण्याच्या नादात आपण मंत्री आहोत हेही सारे विसरले. भगवानगड मंत्रिपद देतो, हे नेत्यांनीच जाहीर केले. त्यामुळे भगवानबाबांपेक्षाही मंत्रिपदांसाठी येथे गर्दी वाढेल, असे दिसते.- सुधीर लंके