शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अत्यंत चिंताजनक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:44 IST

भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी बुधवारी कारगिल विजय दिनानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर म्हणावे लागेल.

भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी बुधवारी कारगिल विजय दिनानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर म्हणावे लागेल. वायूदल सध्या दोन आघाड्यांवर लढण्याच्या स्थितीत नाही, असे एअर चीफ मार्शल धनोआ म्हणाले. युद्ध सुरू झाल्यास केवळ दहा दिवस पुरू शकेल एवढाच दारूगोळा सैन्याकडे असल्याचे, गत शुक्रवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या नियंत्रक आणि महालेखापाल म्हणजेच कॅगच्या अहवालात म्हटले होते. पाकिस्तान व चीनसोबतच्या सीमांवरील सद्यस्थिती आणि वायूदल प्रमुखांचे वक्तव्य व कॅगचा अहवाल यांचा एकत्र विचार केल्यास, परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट होते. भारत आणि अमेरिकेचे सख्य वाढीस लागल्यापासून पाकिस्तान जणू काही चीनचे मांडलिक राष्ट्रच झाले आहे. यापूर्वी १९६५ व १९७१ मध्ये भारताचे युद्ध झाले तेव्हा चीन तटस्थ राहिला होता. तत्कालीन सोव्हिएट रशियासोबतच्या भारताच्या मैत्रीने त्यामध्ये मोठी भूमिका अदा केली होती. आज रशिया भारतापासून दूर गेला आहे आणि अमेरिका भारताला कितीही घनिष्ट मित्र संबोधत असला तरी, युद्धाच्या स्थितीत तो देश भारताच्या मदतीला धावून येईलच, याची काही खात्री नाही. दुसरीकडे पाकिस्तान अथवा चीन या दोनपैकी कोणत्याही देशासोबत भारताचे युद्ध सुरू झाल्यास, ते दोन्ही देश एकत्र येऊन भारताविरुद्ध संयुक्त आघाडी उघडतील, अशी दाट शक्यता आहे. त्या स्थितीत भारतीय सेनादलांना दोन आघाड्यांवर लढा द्यावा लागेल. त्यासाठी आवश्यक ते मनोबल तिन्ही सेनादलांकडे निश्चितपणे आहे; मात्र लढाया केवळ मनोबलाच्या आधारे जिंकल्या जाऊ शकत नाहीत. त्यासाठी उच्च प्रतीची शस्त्रास्त्रे, दारुगोळा, उपकरणे यांची नितांत गरज असते. दुर्दैवाने सेनादलांकडे त्याची कमतरता दिसत आहे. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने त्यासंदर्भात कोणतीही पावले उचलली नसल्याची तक्रार सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे धुरीण उठताबसता करीत असतात; मात्र या सरकारच्या कारकिर्दीतही फार काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. लष्कराकडे किमान २० दिवसांचा राखीव दारूगोळा असावा, असे १९९९ मध्ये निश्चित करण्यात आले होते. दुर्दैवाने १८ वर्षे उलटल्यावरही ते लक्ष्य आपल्याला साध्य करता आलेले नाही. सीमांवर युद्धाचे ढग जमा होऊ लागले असल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.