शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

अत्यंत चिंताजनक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:44 IST

भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी बुधवारी कारगिल विजय दिनानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर म्हणावे लागेल.

भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी बुधवारी कारगिल विजय दिनानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर म्हणावे लागेल. वायूदल सध्या दोन आघाड्यांवर लढण्याच्या स्थितीत नाही, असे एअर चीफ मार्शल धनोआ म्हणाले. युद्ध सुरू झाल्यास केवळ दहा दिवस पुरू शकेल एवढाच दारूगोळा सैन्याकडे असल्याचे, गत शुक्रवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या नियंत्रक आणि महालेखापाल म्हणजेच कॅगच्या अहवालात म्हटले होते. पाकिस्तान व चीनसोबतच्या सीमांवरील सद्यस्थिती आणि वायूदल प्रमुखांचे वक्तव्य व कॅगचा अहवाल यांचा एकत्र विचार केल्यास, परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट होते. भारत आणि अमेरिकेचे सख्य वाढीस लागल्यापासून पाकिस्तान जणू काही चीनचे मांडलिक राष्ट्रच झाले आहे. यापूर्वी १९६५ व १९७१ मध्ये भारताचे युद्ध झाले तेव्हा चीन तटस्थ राहिला होता. तत्कालीन सोव्हिएट रशियासोबतच्या भारताच्या मैत्रीने त्यामध्ये मोठी भूमिका अदा केली होती. आज रशिया भारतापासून दूर गेला आहे आणि अमेरिका भारताला कितीही घनिष्ट मित्र संबोधत असला तरी, युद्धाच्या स्थितीत तो देश भारताच्या मदतीला धावून येईलच, याची काही खात्री नाही. दुसरीकडे पाकिस्तान अथवा चीन या दोनपैकी कोणत्याही देशासोबत भारताचे युद्ध सुरू झाल्यास, ते दोन्ही देश एकत्र येऊन भारताविरुद्ध संयुक्त आघाडी उघडतील, अशी दाट शक्यता आहे. त्या स्थितीत भारतीय सेनादलांना दोन आघाड्यांवर लढा द्यावा लागेल. त्यासाठी आवश्यक ते मनोबल तिन्ही सेनादलांकडे निश्चितपणे आहे; मात्र लढाया केवळ मनोबलाच्या आधारे जिंकल्या जाऊ शकत नाहीत. त्यासाठी उच्च प्रतीची शस्त्रास्त्रे, दारुगोळा, उपकरणे यांची नितांत गरज असते. दुर्दैवाने सेनादलांकडे त्याची कमतरता दिसत आहे. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने त्यासंदर्भात कोणतीही पावले उचलली नसल्याची तक्रार सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे धुरीण उठताबसता करीत असतात; मात्र या सरकारच्या कारकिर्दीतही फार काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. लष्कराकडे किमान २० दिवसांचा राखीव दारूगोळा असावा, असे १९९९ मध्ये निश्चित करण्यात आले होते. दुर्दैवाने १८ वर्षे उलटल्यावरही ते लक्ष्य आपल्याला साध्य करता आलेले नाही. सीमांवर युद्धाचे ढग जमा होऊ लागले असल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.