शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

अत्यंत चिंताजनक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:44 IST

भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी बुधवारी कारगिल विजय दिनानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर म्हणावे लागेल.

भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी बुधवारी कारगिल विजय दिनानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर म्हणावे लागेल. वायूदल सध्या दोन आघाड्यांवर लढण्याच्या स्थितीत नाही, असे एअर चीफ मार्शल धनोआ म्हणाले. युद्ध सुरू झाल्यास केवळ दहा दिवस पुरू शकेल एवढाच दारूगोळा सैन्याकडे असल्याचे, गत शुक्रवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या नियंत्रक आणि महालेखापाल म्हणजेच कॅगच्या अहवालात म्हटले होते. पाकिस्तान व चीनसोबतच्या सीमांवरील सद्यस्थिती आणि वायूदल प्रमुखांचे वक्तव्य व कॅगचा अहवाल यांचा एकत्र विचार केल्यास, परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट होते. भारत आणि अमेरिकेचे सख्य वाढीस लागल्यापासून पाकिस्तान जणू काही चीनचे मांडलिक राष्ट्रच झाले आहे. यापूर्वी १९६५ व १९७१ मध्ये भारताचे युद्ध झाले तेव्हा चीन तटस्थ राहिला होता. तत्कालीन सोव्हिएट रशियासोबतच्या भारताच्या मैत्रीने त्यामध्ये मोठी भूमिका अदा केली होती. आज रशिया भारतापासून दूर गेला आहे आणि अमेरिका भारताला कितीही घनिष्ट मित्र संबोधत असला तरी, युद्धाच्या स्थितीत तो देश भारताच्या मदतीला धावून येईलच, याची काही खात्री नाही. दुसरीकडे पाकिस्तान अथवा चीन या दोनपैकी कोणत्याही देशासोबत भारताचे युद्ध सुरू झाल्यास, ते दोन्ही देश एकत्र येऊन भारताविरुद्ध संयुक्त आघाडी उघडतील, अशी दाट शक्यता आहे. त्या स्थितीत भारतीय सेनादलांना दोन आघाड्यांवर लढा द्यावा लागेल. त्यासाठी आवश्यक ते मनोबल तिन्ही सेनादलांकडे निश्चितपणे आहे; मात्र लढाया केवळ मनोबलाच्या आधारे जिंकल्या जाऊ शकत नाहीत. त्यासाठी उच्च प्रतीची शस्त्रास्त्रे, दारुगोळा, उपकरणे यांची नितांत गरज असते. दुर्दैवाने सेनादलांकडे त्याची कमतरता दिसत आहे. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने त्यासंदर्भात कोणतीही पावले उचलली नसल्याची तक्रार सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे धुरीण उठताबसता करीत असतात; मात्र या सरकारच्या कारकिर्दीतही फार काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. लष्कराकडे किमान २० दिवसांचा राखीव दारूगोळा असावा, असे १९९९ मध्ये निश्चित करण्यात आले होते. दुर्दैवाने १८ वर्षे उलटल्यावरही ते लक्ष्य आपल्याला साध्य करता आलेले नाही. सीमांवर युद्धाचे ढग जमा होऊ लागले असल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.