शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगा कसं जगायचं? ऋतुचक्राचे उग्र रूप अन् महागाईने गाठलेले शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2023 08:32 IST

वर्षागणिक विस्कळीत होत चाललेल्या ऋतुचक्राने आता त्याचे उग्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपूर्वी महागाई आटोक्यात येईल, असे ...

वर्षागणिक विस्कळीत होत चाललेल्या ऋतुचक्राने आता त्याचे उग्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपूर्वी महागाई आटोक्यात येईल, असे वाटत असतानाच जुलैमध्ये मात्र महागाईने शिखर गाठले. देशाच्या खाद्यान्न निर्देशांकात ४.८७ वरून तब्बल ७.४४ टक्के इतकी वाढ झाली आहे. याचा साधा अर्थ असा की, आपल्या दैनंदिन खाण्या- पिण्याच्या गोष्टी जवळपास महिनाभरात तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत अन्न-धान्याच्या, भाजीपाल्याच्या व फळफळावळीच्या किमतीमध्ये यावर्षी ३७ टक्क्यांनी तर डाळींच्या किमतीमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

हे असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणात होणारा बदल. ऋतुचक्र आता बेभरवशाचे झाले आहे. याचा थेट परिणाम कृषी उत्पन्नावर होताना दिसत आहे. अर्थात निसर्गापुढे आपल्या मर्यादा असल्या तरी अर्थशास्त्राच्या पातळीवर यावर काही तोडगा काढणे शक्य आहे का, याचादेखील गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात चलनवाढीने डोके वर काढले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करत तब्बल सहा वेळा रेपो दरात वाढ केली. 

गेल्या दोनवेळी सादर झालेल्या पतधोरणामध्ये व्याजदरात वाढ झाली नाही. त्यावेळी चलनवाढ आटोक्यात येत असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेने केला होता. मात्र, आता खाद्यान्न व महागाई निर्देशांकाची प्रसिद्ध झालेली आकडेवारी लक्षात घेता चलनवाढ खरोखर आटोक्यात येत आहे का, रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्याचे जे लक्ष्य निश्चित केले आहे व त्या अनुषंगाने जी पावले उचचली आहेत, त्याचा खरोखर फायदा होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने वाढलेल्या व्याजदरामुळे चलनवाढीला नियंत्रण मिळत असल्याचा दावा होत असला तरी याचा थेट परिणाम हा गृहकर्जापासून विविध कर्ज महागल्यामुळे अनेकांनी घर खरेदीचा निर्णय बासनात गुंडाळल्याचे दिसते. 

तर दुसरीकडे ज्यांची कर्ज आहेत त्यांच्या मासिक हप्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे त्यांचाही खिसा हलका होत आहे. त्यात आता महागाईच्या विळख्याने त्यांचे जगणे असह्य झाले आहे. एकीकडे व्याजदरातील वाढ आणि दुसरीकडे इंधनाच्या किमतीत न होणारी कपात हादेखील कळीचा मुद्दा ठरला आहे. भारतासारख्या देशात महागाईचा थेट संबंध हा कच्च्या तेलाच्या किमतीशी निगडित आहे. कच्चा तेलाच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेलची निर्मिती होते. मालवाहतुकीचे अर्थकारण १०० टक्के डिझेलच्या किमतीशी निगडित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी आपल्याकडे इंधनदर कमी झालेले नाहीत. 

जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, त्या अनुषंगाने किंवा त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक आपल्याकडे इंधनाच्या किमती महागल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही महत्त्वाच्या इंधनांनी शंभरीचा आकडा पार केलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती घटत आहेत तर त्या अनुषंगाने भारतीय बाजारातही त्यात कपात होणे गरजेचे आहे. इंधनाच्या किमतीमध्ये कपात झाली तर याचा थेट परिणाम हा मालवाहतुकीचे दर कमी होण्यात होईल. त्याची परिणती त्यांच्याद्वारे वाहतूक होणाऱ्या भाजीपाल्यांच्या किमती कमी होण्याच्या रूपाने होईल व पर्यायाने लोकांच्या खिशातील चार पैसे वाचतील. निरोगी आयुष्य राखण्यासाठी सकस आणि चौरस आहार महत्त्वाचा. मात्र, आता खाण्या पिण्याच्या किमती महिन्याचे बजेट कोलमडू पाहात आहेत. अनेकांच्या ताटातून भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रोटीनचा उत्तम स्रोत समजल्या जाणाऱ्या डाळी महागल्या आहेत. 

कडधान्यांची स्थितीही वेगळी नाही. फळांच्या किमती तर आ वासून पाहात आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात फळांची खरेदीही कमी झाल्याचे दिसते. निरोगी आयुष्यासाठी जे अन्नघटक पोटात जाणे गरजेचे आहे त्याचे प्रमाण कमी झाले तर अर्थातच त्याचा फटका लोकांच्या आरोग्याला बसेल. विस्कळीत झालेल्या ऋतुचक्रामुळे महागाई वाढली ही कारणमीमांसा सरकारी पातळीवर होत असली तरी त्यातून मार्ग काढणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. ऋतुचक्र सातत्याने बदलत आहे तर त्याचाही सखोल अभ्यास व्हायला हवा. त्या अनुषंगाने आपल्या व्यवस्थेत आवश्यक ते बदल करायला हवेत. आपण हे आव्हान समजून घेत त्यावर तोडगा काढला नाही तर भविष्यात मार्ग काढण्याचीही वेळ निघून जाईल. त्यामुळे निसर्गाच्या हाका सावधपणे ऐकण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Inflationमहागाई