शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जगावेगळी

By admin | Updated: December 29, 2014 23:37 IST

दोन हजार चौदा सरत आलंय. या वर्षाच्या शेवटच्या काही घटका आता उरल्या आहेत.

दोन हजार चौदा सरत आलंय. या वर्षाच्या शेवटच्या काही घटका आता उरल्या आहेत. मागे वळून पाहता या वर्षातल्या विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या सर्वांत महत्त्वाच्या घटना कोणत्या, असा प्रश्न मनात उभा राहणे स्वाभाविक आहे. आणि त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तरही तयार आहे. दोन्ही घटना तसं पाहिलं, तर जगावेगळ्या आहेत. आपल्या या जगाच्या बाहेर, धरतीपासून दूर घडलेल्या आहेत. आणि तरीही त्यांची नाळ आपल्या या भूमीशी घट्ट जोडलेली आहे. एक घटना तर आपली, भारतीयांची मान उंचावणारी आहे. मंगलयानाचं मंगळ ग्रहाच्या कक्षेत सुरळीत, कोणतंही विघ्न न येता, आयोजलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश करणं अतिशय सुखावणारं तर आहेच, पण भारतीयांची या आघाडीच्या क्षेत्रातल्या प्रगतीची उर्वरित जगाला ओळख पटवून देणारंही आहे. दुसरी घटनाही अशीच अंतराळाशी संबंधित आहे. रोझेटा या यानानं फिले या धूमकेतूवर उतरण्याची किमया साध्य करणाऱ्या घटनेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं नसतं, तरच नवल?या दोन्ही घटनांमध्ये काही समानता आहे. पहिल्याच प्रयत्नात आपलं मंगलयान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करतं झालं. इतर कोणत्याही, अमेरिका, रशिया, चीन, युरोपीय समुदाय यांसारख्या प्रगत देशांनाही जे साध्य झालं नाही, ते आपल्या वैज्ञानिकांनी करून दाखवलं. हे यश जेवढं आपल्या वैज्ञानिक प्रगतीचं द्योतक आहे तेवढंच या वैज्ञानिकांच्या क्षमतेवर ठेवलेल्या विश्वासाचंही प्रतीक आहे. आपल्या समाजाची मानसिकता कडकलक्ष्मीची आहे. आपल्याच अंगावर आसूड ओढून घेत त्यातून होणाऱ्या वेदनांमध्येच एक प्रकारचं विकृत समाधान मानणारी आहे. आत्मपीडात सुख शोधणारी आहे. त्यामुळं आपण काही विशेष करू शकतो, जगाच्या नकाशावर आपलं खास स्थान प्रस्थापित करू शकतो, यावर सहसा कोणी विश्वासच ठेवायला तयार नसतं. आपली प्रसारमाध्यमंही या भावनेला खतपाणी घालणारीच आहेत. मुद्रित रूपातली वर्तमानपत्रं काय किंवा इलेक्ट्रॉनिक रूपातल्या वार्तावाहिन्या काय, नकारात्मक, उत्साहावर पाणी ओतणाऱ्या, मन विषण्ण करणाऱ्या घटनांचं खळबळजनक वर्णन करण्यातच धन्यता मानतात. नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित भीषणता यांनाच लक्षवेधी स्थान देण्याची अहमहमिका आपल्याला प्रसारमाध्यमांमध्ये दिसून येते. साहजिकच देशात काही उत्साहवर्धक सकारात्मक कार्य होत आहे,याची गंधवार्ताही सामान्यजनांना मिळत नाही. अशा परिस्थितीत काम करणाऱ्या कोणाच्याही जिद्दीला ग्रहण लागलं नाही तरच आश्चर्य? परंतु या स्थितीतही आपल्या आतल्या आवाजाला स्मरून आत्मविश्वासानं कोणी अवघड कामगिरी पार पाडली की आपले डोळे दीपून जातात. क्षणभर त्यावर विश्वास ठेवायलाही आपण तयार नसतो. अर्थात, मंगलयानाचं यश इतकं प्रकट आणि स्पष्ट होतं, की त्यावर अविश्वास दाखवण्याची संधीच कोणालाही मिळाली नाही. पण तेच जर समजा काही कारणानं आपण या पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झालो नसतो, तर मात्र उधळपट्टी केल्याचा ठपका अंतराळशास्त्रज्ञांवर ठेवण्यात, हे पांढरे हत्ती कशाला पोसायचे, असा सवाल करण्यात आपण सगळेच आघाडीवर राहिलो असतो. म्हणूनच त्या प्रसंगी जातीनं उपस्थित राहून आपल्या पंतप्रधानांनी त्या शास्त्रज्ञांना जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी त्या अखेरच्या कसोटीच्या क्षणी नियंत्रणकेंद्रात हजर राहून मंगळकक्षाप्रवेशाचा तो सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा मनोदय व्यक्त केला, तेव्हा त्यावर कोणता प्रतिसाद द्यावा, याबाबतीत शास्त्रज्ञ संभ्रमात पडले होते. सगळं काही ठरल्यानुसार पार पडलं तर ठीकच आहे. पण समजा ऐन वेळी काही घोटाळा झाला, तर पंतप्रधानांना अवघडल्यासारखं होईल, त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी आशंका शास्त्रज्ञांच्या मनात पिंगा घालत होती. ती त्यांनी बोलून दाखवल्यानंतर पंतप्रधान म्हणाले होते, की समजा दुर्दैवानं तसं झालंच, तर त्या क्षणी तुमच्या पाठीशी उभं राहून त्या पाठीवरून आश्वासक हात फिरवणं माझं प्रथम कर्तव्य ठरतं. मनोबल उंचावणारे ते शब्द शास्त्रज्ञांना इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे वाटले असतील, यात शंका नाही. पंतप्रधानांनी जो विश्वास आपल्या शास्त्रज्ञांच्या निष्ठेवर आणि कर्तृत्वावर दाखवला तोच आपण सर्वांनीच दाखवायला हवा. मंगलयान हे केवळ पहिलं पाऊल आहे. याही पुढे मजल मारायची आहे, हे रोझेटाच्या धूमकेतूअवतरणानं दाखवून दिलं आहे. क्षितिजापर्यंत पोचल्यासारखं वाटतं, त्याच वेळी क्षितिज अजूनही तितकंच दूर आहे, याचा प्रत्यय येतो. तसंच आपलं क्षितिज आता अधिक विस्तारलं आहे आणि तो विस्तार आपल्याला आपल्या कवेत घ्यायचा आहे. एवढंच नाही, तर याच विज्ञानतंत्रज्ञानातील पारंगततेचा उपयोग देशाच्या आर्थिक, सामाजिक, वैचारिक प्रगतीसाठी करायचा आहे. तो साध्य करण्यासाठी जशी अर्थबळाची, साधनसामग्रीची गरज भासते, तशीच दृढ मनोबलाचीही भासते, हे आपण ध्यानात घ्यायला हवं. तसं झालं तरच जगावेगळी कामगिरी आपल्या हातून पार पडेल.डॉ. बाळ फोंडकेपत्रकार व विज्ञानलेखक