शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

जगावेगळी

By admin | Updated: December 29, 2014 23:37 IST

दोन हजार चौदा सरत आलंय. या वर्षाच्या शेवटच्या काही घटका आता उरल्या आहेत.

दोन हजार चौदा सरत आलंय. या वर्षाच्या शेवटच्या काही घटका आता उरल्या आहेत. मागे वळून पाहता या वर्षातल्या विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या सर्वांत महत्त्वाच्या घटना कोणत्या, असा प्रश्न मनात उभा राहणे स्वाभाविक आहे. आणि त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तरही तयार आहे. दोन्ही घटना तसं पाहिलं, तर जगावेगळ्या आहेत. आपल्या या जगाच्या बाहेर, धरतीपासून दूर घडलेल्या आहेत. आणि तरीही त्यांची नाळ आपल्या या भूमीशी घट्ट जोडलेली आहे. एक घटना तर आपली, भारतीयांची मान उंचावणारी आहे. मंगलयानाचं मंगळ ग्रहाच्या कक्षेत सुरळीत, कोणतंही विघ्न न येता, आयोजलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश करणं अतिशय सुखावणारं तर आहेच, पण भारतीयांची या आघाडीच्या क्षेत्रातल्या प्रगतीची उर्वरित जगाला ओळख पटवून देणारंही आहे. दुसरी घटनाही अशीच अंतराळाशी संबंधित आहे. रोझेटा या यानानं फिले या धूमकेतूवर उतरण्याची किमया साध्य करणाऱ्या घटनेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं नसतं, तरच नवल?या दोन्ही घटनांमध्ये काही समानता आहे. पहिल्याच प्रयत्नात आपलं मंगलयान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करतं झालं. इतर कोणत्याही, अमेरिका, रशिया, चीन, युरोपीय समुदाय यांसारख्या प्रगत देशांनाही जे साध्य झालं नाही, ते आपल्या वैज्ञानिकांनी करून दाखवलं. हे यश जेवढं आपल्या वैज्ञानिक प्रगतीचं द्योतक आहे तेवढंच या वैज्ञानिकांच्या क्षमतेवर ठेवलेल्या विश्वासाचंही प्रतीक आहे. आपल्या समाजाची मानसिकता कडकलक्ष्मीची आहे. आपल्याच अंगावर आसूड ओढून घेत त्यातून होणाऱ्या वेदनांमध्येच एक प्रकारचं विकृत समाधान मानणारी आहे. आत्मपीडात सुख शोधणारी आहे. त्यामुळं आपण काही विशेष करू शकतो, जगाच्या नकाशावर आपलं खास स्थान प्रस्थापित करू शकतो, यावर सहसा कोणी विश्वासच ठेवायला तयार नसतं. आपली प्रसारमाध्यमंही या भावनेला खतपाणी घालणारीच आहेत. मुद्रित रूपातली वर्तमानपत्रं काय किंवा इलेक्ट्रॉनिक रूपातल्या वार्तावाहिन्या काय, नकारात्मक, उत्साहावर पाणी ओतणाऱ्या, मन विषण्ण करणाऱ्या घटनांचं खळबळजनक वर्णन करण्यातच धन्यता मानतात. नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित भीषणता यांनाच लक्षवेधी स्थान देण्याची अहमहमिका आपल्याला प्रसारमाध्यमांमध्ये दिसून येते. साहजिकच देशात काही उत्साहवर्धक सकारात्मक कार्य होत आहे,याची गंधवार्ताही सामान्यजनांना मिळत नाही. अशा परिस्थितीत काम करणाऱ्या कोणाच्याही जिद्दीला ग्रहण लागलं नाही तरच आश्चर्य? परंतु या स्थितीतही आपल्या आतल्या आवाजाला स्मरून आत्मविश्वासानं कोणी अवघड कामगिरी पार पाडली की आपले डोळे दीपून जातात. क्षणभर त्यावर विश्वास ठेवायलाही आपण तयार नसतो. अर्थात, मंगलयानाचं यश इतकं प्रकट आणि स्पष्ट होतं, की त्यावर अविश्वास दाखवण्याची संधीच कोणालाही मिळाली नाही. पण तेच जर समजा काही कारणानं आपण या पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झालो नसतो, तर मात्र उधळपट्टी केल्याचा ठपका अंतराळशास्त्रज्ञांवर ठेवण्यात, हे पांढरे हत्ती कशाला पोसायचे, असा सवाल करण्यात आपण सगळेच आघाडीवर राहिलो असतो. म्हणूनच त्या प्रसंगी जातीनं उपस्थित राहून आपल्या पंतप्रधानांनी त्या शास्त्रज्ञांना जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी त्या अखेरच्या कसोटीच्या क्षणी नियंत्रणकेंद्रात हजर राहून मंगळकक्षाप्रवेशाचा तो सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा मनोदय व्यक्त केला, तेव्हा त्यावर कोणता प्रतिसाद द्यावा, याबाबतीत शास्त्रज्ञ संभ्रमात पडले होते. सगळं काही ठरल्यानुसार पार पडलं तर ठीकच आहे. पण समजा ऐन वेळी काही घोटाळा झाला, तर पंतप्रधानांना अवघडल्यासारखं होईल, त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी आशंका शास्त्रज्ञांच्या मनात पिंगा घालत होती. ती त्यांनी बोलून दाखवल्यानंतर पंतप्रधान म्हणाले होते, की समजा दुर्दैवानं तसं झालंच, तर त्या क्षणी तुमच्या पाठीशी उभं राहून त्या पाठीवरून आश्वासक हात फिरवणं माझं प्रथम कर्तव्य ठरतं. मनोबल उंचावणारे ते शब्द शास्त्रज्ञांना इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे वाटले असतील, यात शंका नाही. पंतप्रधानांनी जो विश्वास आपल्या शास्त्रज्ञांच्या निष्ठेवर आणि कर्तृत्वावर दाखवला तोच आपण सर्वांनीच दाखवायला हवा. मंगलयान हे केवळ पहिलं पाऊल आहे. याही पुढे मजल मारायची आहे, हे रोझेटाच्या धूमकेतूअवतरणानं दाखवून दिलं आहे. क्षितिजापर्यंत पोचल्यासारखं वाटतं, त्याच वेळी क्षितिज अजूनही तितकंच दूर आहे, याचा प्रत्यय येतो. तसंच आपलं क्षितिज आता अधिक विस्तारलं आहे आणि तो विस्तार आपल्याला आपल्या कवेत घ्यायचा आहे. एवढंच नाही, तर याच विज्ञानतंत्रज्ञानातील पारंगततेचा उपयोग देशाच्या आर्थिक, सामाजिक, वैचारिक प्रगतीसाठी करायचा आहे. तो साध्य करण्यासाठी जशी अर्थबळाची, साधनसामग्रीची गरज भासते, तशीच दृढ मनोबलाचीही भासते, हे आपण ध्यानात घ्यायला हवं. तसं झालं तरच जगावेगळी कामगिरी आपल्या हातून पार पडेल.डॉ. बाळ फोंडकेपत्रकार व विज्ञानलेखक