शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

विशेष लेख: वकिलांना ग्राहक कायद्यातून सूट देणे न्याय्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 12:09 IST

ज्ञानावर आधारलेली सेवा देताना त्या सेवेचे मूल्य आकारले जाते. अशा सेवादाराशी ग्राहकांचे संबंध मालक-नोकर असे नक्की नसतात !

- दिलीप फडके(ग्राहक हक्क चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते)

सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाने अलीकडेच एका निवाड्यात वकिलांसाठी ग्राहक कायदा लागू होणार नाही असा निकाल दिला आहे. याचा अर्थ, सेवेतल्या त्रुटी किंवा न्यूनतेच्या कारणांसाठी वकिलांच्या विरोधात ग्राहक न्यायालयात जाता येणार नाही. वकिलांच्या पाठोपाठ वैद्यक व्यावसायिकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने तीस वर्षांपूर्वी दिलेल्या निकालाचेही पुनर्विलोकन करावे, अशी विनंतीही न्यायालयाने मा. मुख्य न्यायाधीशांना केली आहे. तसे झाले तर वैद्यक व्यावसायिकांबद्दलच्या तक्रारींसाठीदेखील ग्राहक मंचाचे दरवाजे बंद होतील.

वस्तू, सेवा यांच्यातले दोष, त्रुटी, न्यूनतेपासून संरक्षण करण्यासाठी सामान्य ग्राहकाला एक प्रभावी मार्ग ग्राहक संरक्षण कायद्यामुळे उपलब्ध झाला आहे. या मूळ कायद्यात 'सेवा' या संज्ञेच्या व्याख्येत वैद्यक किंवा वकिलांचा उल्लेख नव्हता. पुढे 'सेवा' या शब्दाची व्याप्ती वाढायला लागली. सुरुवातीला एलआयसी, बँका, दूरसंचार यांच्यासह सेवा क्षेत्रातल्या अनेक संस्थांनी आपल्या क्षेत्राचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध असल्याने आपल्या संबंधातल्या तक्रारी ग्राहक कायद्याखाली विचारात घेतल्या जाऊ नयेत असा युक्तिवाद केला. तीस वर्षांपूर्वी तीन न्यायाधीशांच्या पीठाने या प्रश्नाचा विचार केला होताच. ताज्या निकालातही तोच मुद्दा नव्याने मांडला गेलेला आहे. वकिलांसाठी बार कौन्सिल, वैद्यक व्यावसायिकांसाठीची मेडिकल कौन्सिल या स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात आलेल्या संस्थांना त्यांच्या व्यवसायाचे नियमन करण्याचे, अनिष्ट प्रथा रोखण्याचे व्यापक अधिकार आहेत हे खरे; पण याबाबतची या संस्थांची कामगिरी समाधानकारक नाही. प्रसंगोपात एकमेकांना पाठीशी घालण्याचे कामच त्यात केले जाते असा सार्वत्रिक अनुभव आहे. अशा स्थितीत सामान्य माणसासाठी ग्राहक न्यायमंचाकडे जाणे हा साधासोपा मार्ग आहे. किंवा डॉक्टरांच्या संबंधातल्या वकील तक्रारी तांत्रिक, गुंतागुंतीच्या असतात, असेही सांगितले जाते; पण अनेकदा वस्तूंमधल्या दोषांबद्दलच्या तक्रारीदेखील तांत्रिक, गुंतागुंतीच्या असतातच. वैद्यक व्यवसायाच्या बाबतीत तक्रारीच्या सुनावणीच्या वेळी दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरचे मत घेतले पाहिजे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. ते मत मिळवण्यासाठी किती उठाठेवी कराव्या लागतात याची कल्पनाच केलेली बरी. सेवेतल्या त्रुटीबद्दल अशा नियामक संस्थांकडे आलेल्या ग्राहकांच्या तक्रारी खऱ्या आहेत असे आढळले तरी त्या फारफार तर संबंधित व्यावसायिकाला दंडित करू शकतात; पण ग्राहकाचे झालेले नुकसान भरून देण्याबद्दल कोणताही आदेश देण्याचे अधिकार या नियामक संस्थांना नाहीत.

वकिलांचा व्यवसाय विशेष ज्ञानावर आधारलेला एक' असे त्याच्या अशिलाचे स्थान असते, असे हा निकाल सांगतो. वकील हे न्याययंत्रणेतले एक महत्त्वाचे अधिकारी आहेतच; पण त्यांचे प्राथमिक दायित्व त्यांच्याकडे आपली बाजू न्यायालयात मांडण्याचे काम सोपविणाऱ्या अशिलाच्या संदर्भात असते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यात त्रुटी किंवा न्यूनता आढळल्यास त्याबद्दल दाद मागण्याचा एक सोपा उपाय या निकालामुळे ग्राहकांना नाकारला गेला आहे हे नक्की. वकिलांबद्दलच्या तक्रारी ग्राहक न्याययंत्रणेकडे मांडण्याचा मार्ग सुरू ठेवला तर प्रचंड तक्रारी येतील, असे न्यायालय सांगते. म्हणजे आज वकिलांबद्दल ग्राहकांच्या खूपच तक्रारी आहेत, असा याचा अर्थ समजावा का? वैद्यक व्यावसायिकांबद्दलचा आजवरचा अनुभव काय आहे? रुग्णांना ग्राहक न्यायालयाचे दरवाजे आज उघडे असले तरी किती दावे आज दाखल होतात? सर्वच तक्रारी नेहमी ग्राहक न्यायालयात नेल्या जात नाहीत. अनेकदा फुटकळ आणि निरर्थक दावे केले म्हणून न्यायालयाने तक्रारदाराला शासनदेखील केलेले आढळते आहेच की!

टॅग्स :Mumbaiमुंबई