शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

न्यायाधीशांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 02:20 IST

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयावरील न्यायाधीशांच्या नेमणुकासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे निर्णय न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देणे सुरू झाल्याने

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयावरील न्यायाधीशांच्या नेमणुकासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे निर्णय न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देणे सुरू झाल्याने, या निवड पद्धतीच्या तद्दन बेकायदेशीरपणाचे व निरर्थकतेचे नवे पैलू समोर येऊ लागले आहेत. अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्यापूर्वी त्यांच्या निकालपत्रांचे मूल्यमापन आता सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीश करतील, असा हा निर्णय आहे. आधीच्या पद्धतीनुसार अतिरिक्त न्यायाधीशांनी दिलेल्या निकालपत्रांचे मूल्यमापन त्यांच्याच न्यायालयातील सहकारी न्यायाधीश करीत असत. इंग्रजीत याला ‘पिअर रिव्ह्यू’ म्हणजे एखाद्या क्षेत्रातील सहकाºयांनी परस्परांचे मूल्यमापन करणे असे म्हणतात. न्यायाधीशांनीच न्यायाधीश निवडण्याची कॉलेजियम पद्धत हा देखील एकप्रकारे ‘पिअर रिव्ह्यू’च आहे. पण अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्याच्या बाबतीत मात्र असा ‘पिअर रिव्ह्यू’ योग्य नाही, असा साक्षात्कार कॉलेजियमला झाला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयांच्या अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्यापूर्वी त्यांनी दिलेल्या निकालपत्रांचे मूल्यमापन आता सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश करतील, असे कॉलेजियमने ठरविले आहे. निकालपत्रांचे मूल्यमापन करणार म्हणजे काय करणार? त्याचे नेमके निकष काय? हे गुलदस्त्यातच आहे. परंतु असे मूल्यमापन करणे तद्दन बेकायदा व निरर्थक आहे. याचे कारण असे की, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने दिलेला निकाल योग्य आहे की अयोग्य, हे त्याविरुद्ध रीतसर अपील केले तरच, तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयास अधिकार आहे. हा अधिकारही न्यायिक आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अशा निकालाचे मूल्यमापन करण्याचा अधिकार कॉलेजियमला कुठून मिळाला, असा प्रश्न पडतो. कनिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या बढत्यांमध्ये त्यांच्या कामाचे मूल्यमापन हा एक महत्त्वाचा निकष असतो. तशी कायद्यात व त्यांच्या सेवानियमांमध्ये स्पष्ट तरतूद असते. परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत असा कायदा नाही. दुसरे असे की, हे मूल्यमापन निरर्थक आहे. कारण अशा मूल्यमापनातून अतिरिक्त न्यायाधीशाने दिलेले निकाल कितीही चुकीचे वा गैर वाटले तरी ते रद्द होत नाहीत. सर्वसाधारणपणे दोन वर्षे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर न्यायाधीशांना कायम केले जाते. या काळात हे न्यायाधीश शेकडो प्रकरणांचे निकाल देतात. हे निकाल एखाद्याचे स्वातंत्र्य दीर्घ काळासाठी हिरावून घेण्यापासून ते त्याच्या मालमत्तेच्या मालकीसंबंधीचे असू शकतात. मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी मूल्यमापन करणे मूळ नेमणुकीला लागू नाही. म्हणजेच नेमलेला अतिरिक्त न्यायाधीश दोन वर्षांनी अशा मूल्यमापनात कितीही रद्दड ठरला तरी त्याने दिलेल्या चुकीच्या किंवा सुमार निकालाचे परिमार्जन करण्याची कोणतीही सोय नाही. यामुळे सुमार न्यायाधीश न्यायव्यवस्थेतून वेळीच दूर केले जाऊ शकतात, असे म्हणता येऊ शकेल. पण तेही निरर्थक आहे. कारण जे कायम होण्यास नालायक ठरविले जातात त्यांची मुळात निवड याच कॉलेजियमने केलेली असते. अशा चुकीच्या निवडीबद्दल कॉलेजियमला जाब विचारण्याची सोय नाही. आपण चुकतो आहोत याची जाणीव करून देऊनही जो चूक कबूल करीत नाही त्याचा त्या चुकीच्या पद्धतीत काही तरी स्वार्थ दडलेला असतो. लोकांनी असा समज करून घेण्यापूर्वीच न्यायसंस्थेने या चुका जाणीवपूर्वक करण्याचा हेका सोडणे सर्वांच्याच हिताचे ठरेल.

टॅग्स :Courtन्यायालय