शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 02:20 IST

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयावरील न्यायाधीशांच्या नेमणुकासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे निर्णय न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देणे सुरू झाल्याने

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयावरील न्यायाधीशांच्या नेमणुकासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे निर्णय न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देणे सुरू झाल्याने, या निवड पद्धतीच्या तद्दन बेकायदेशीरपणाचे व निरर्थकतेचे नवे पैलू समोर येऊ लागले आहेत. अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्यापूर्वी त्यांच्या निकालपत्रांचे मूल्यमापन आता सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीश करतील, असा हा निर्णय आहे. आधीच्या पद्धतीनुसार अतिरिक्त न्यायाधीशांनी दिलेल्या निकालपत्रांचे मूल्यमापन त्यांच्याच न्यायालयातील सहकारी न्यायाधीश करीत असत. इंग्रजीत याला ‘पिअर रिव्ह्यू’ म्हणजे एखाद्या क्षेत्रातील सहकाºयांनी परस्परांचे मूल्यमापन करणे असे म्हणतात. न्यायाधीशांनीच न्यायाधीश निवडण्याची कॉलेजियम पद्धत हा देखील एकप्रकारे ‘पिअर रिव्ह्यू’च आहे. पण अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्याच्या बाबतीत मात्र असा ‘पिअर रिव्ह्यू’ योग्य नाही, असा साक्षात्कार कॉलेजियमला झाला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयांच्या अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्यापूर्वी त्यांनी दिलेल्या निकालपत्रांचे मूल्यमापन आता सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश करतील, असे कॉलेजियमने ठरविले आहे. निकालपत्रांचे मूल्यमापन करणार म्हणजे काय करणार? त्याचे नेमके निकष काय? हे गुलदस्त्यातच आहे. परंतु असे मूल्यमापन करणे तद्दन बेकायदा व निरर्थक आहे. याचे कारण असे की, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने दिलेला निकाल योग्य आहे की अयोग्य, हे त्याविरुद्ध रीतसर अपील केले तरच, तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयास अधिकार आहे. हा अधिकारही न्यायिक आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अशा निकालाचे मूल्यमापन करण्याचा अधिकार कॉलेजियमला कुठून मिळाला, असा प्रश्न पडतो. कनिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या बढत्यांमध्ये त्यांच्या कामाचे मूल्यमापन हा एक महत्त्वाचा निकष असतो. तशी कायद्यात व त्यांच्या सेवानियमांमध्ये स्पष्ट तरतूद असते. परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत असा कायदा नाही. दुसरे असे की, हे मूल्यमापन निरर्थक आहे. कारण अशा मूल्यमापनातून अतिरिक्त न्यायाधीशाने दिलेले निकाल कितीही चुकीचे वा गैर वाटले तरी ते रद्द होत नाहीत. सर्वसाधारणपणे दोन वर्षे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर न्यायाधीशांना कायम केले जाते. या काळात हे न्यायाधीश शेकडो प्रकरणांचे निकाल देतात. हे निकाल एखाद्याचे स्वातंत्र्य दीर्घ काळासाठी हिरावून घेण्यापासून ते त्याच्या मालमत्तेच्या मालकीसंबंधीचे असू शकतात. मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी मूल्यमापन करणे मूळ नेमणुकीला लागू नाही. म्हणजेच नेमलेला अतिरिक्त न्यायाधीश दोन वर्षांनी अशा मूल्यमापनात कितीही रद्दड ठरला तरी त्याने दिलेल्या चुकीच्या किंवा सुमार निकालाचे परिमार्जन करण्याची कोणतीही सोय नाही. यामुळे सुमार न्यायाधीश न्यायव्यवस्थेतून वेळीच दूर केले जाऊ शकतात, असे म्हणता येऊ शकेल. पण तेही निरर्थक आहे. कारण जे कायम होण्यास नालायक ठरविले जातात त्यांची मुळात निवड याच कॉलेजियमने केलेली असते. अशा चुकीच्या निवडीबद्दल कॉलेजियमला जाब विचारण्याची सोय नाही. आपण चुकतो आहोत याची जाणीव करून देऊनही जो चूक कबूल करीत नाही त्याचा त्या चुकीच्या पद्धतीत काही तरी स्वार्थ दडलेला असतो. लोकांनी असा समज करून घेण्यापूर्वीच न्यायसंस्थेने या चुका जाणीवपूर्वक करण्याचा हेका सोडणे सर्वांच्याच हिताचे ठरेल.

टॅग्स :Courtन्यायालय