शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमची ‘मन की बात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:32 IST

आमच्या जीवाला स्वस्थता नाही, हेच खरं. देशात एकाच दिवशी सगळ्या निवडणुका घेण्याची कल्पना किती सुखद वाटते. पण छे, एवढं कुठलं मेलं आमचं नशीब

आमच्या जीवाला स्वस्थता नाही, हेच खरं. देशात एकाच दिवशी सगळ्या निवडणुका घेण्याची कल्पना किती सुखद वाटते. पण छे, एवढं कुठलं मेलं आमचं नशीब. आज गुजरात तर उद्या महाराष्ट्र आणि परवा राजस्थान. कुठं गोठवून टाकणारी थंडी, तर कुठं अंगाची लाहीलाही करणारा कडक उष्मा. सारं मुकाट्यानं सहन करायचं कशासाठी, तर म्हणे लोकशाही चिरायू होण्यासाठी. कुठल्या एखाद्या बुथवर एखादीच्या अंगात वारं शिरल्यानं कुठलंही बटण दाबलं तरी एकाच निशाणीला मत दिल्याची चर्चा सुरू होते आणि हा हा म्हणता म्हणता साऱ्यांनाच नाकं मुरडली जातात. आता परवाचंच पाहा. कुठूनकुठून प्रवास करून दमूनथकून निवडणुकीचं ठिकाण गाठलं. लागलीच आम्हा साºया मैत्रिणींना वेगवेगळं करून निवडणूक अधिकाºयांच्या ताब्यात दिलं. हे निवडणूक कर्मचारीसुद्धा बळेबळे दावणीला बांधल्यासारखे काम करतात. त्यांना लागलेल्या ड्युटीचा राग आमच्यावर काढतात. त्या मेल्या अधिकाºयानं मला तिकडं धुळीत, घाणीत ठेवून स्वत: गरमागरम पदार्थ चापत बसला. इतकी धूळ उडत होती सांगू, गेली नाकातोंडात. त्यातच उकाडा मी म्हणत होता. मग, त्या पठ्ठ्यानं मला वरवर पुसून मतदान केंद्रात ठेवलं. मी पण मनात म्हटलं आता दाखवते चांगलाच इंगा. काही केल्या हालचाल केली नाही. मला जागं करण्याकरिता बसला खटपट करीत. चांगले तासभर रुसून बसले. बाहेर नुस्ती बोंबाबोंब. रांगेत खोळंबलेल्या लोकांचे शिव्याशाप ऐकून गयावया करायला लागला. मी मनात म्हटलं, काय पठ्ठ्या कसा घेतला सूड. मला धुळीत अन् उन्हात टाकून मजा मारतोस का? रात्री आम्ही साºयाजणी एकत्र झालो, तेव्हा इतरांनी पण अशाच खोड्या करून पार नक्षा उतरवला होता, या निवडणूक यंत्रणेचा. आम्हाला काय वेठबिगार समजतात की काय? फेरमतदान घ्या, फेरनिवडणूक घ्या, निवडणूक हायजॅक केलीय वगैरे काय एकेक आरोप, प्रत्यारोप, टीका, चर्चा आणि महाचर्चा. हसून मुरकुंडी वळली बघा. रात्री आम्ही गप्पा मारत असताना दोन-पाचजण आले आणि आमच्यापैकी तीन-चारजणींना घेऊन गेले. पहाटे आल्या तर त्या खूप थकलेल्या वाटल्या. आम्ही विचारलं काय कुठं गेला होतात? तशा त्या बोलल्या, हे काय नवीन आहे का? एकाच चिन्हासमोरील बटणं दाबून आमच्या तनामनावर अत्याचार केला त्या नराधमांनी. लोकशाही बदनाम करतात हे आणि बदनाम होते आमची जात. दररोज उठून होणारे आरोप असह्य करतात. एवढ्यात, अंधाºया कोपºयात हालचाल झाली. साºयाजणी घाबºयाघुबºया झाल्या. एक थकलीभागली. जीर्ण मतपेटी पुढं झाली. पोरींनो, गेली कित्येक वर्षे मी या कोपºयात पडल्येय. उंदीर, घुशी, पाली आणि ही अंगावर चढलेली धुळीची पुटं हेच काय ते माझं विश्व झालंय. जेव्हा मी तुमच्या जागी होते, तेव्हा माझी पण शान होती. मला पळवून त्यात बोगस मतपत्रिका घुसडण्याकरिता धडपड केली जायची. तेव्हा माझ्यावरही भलतेसलते आरोप झाले. लोकशाहीचे पावित्र्य टिकवले नाही, अशी ओरड झाली. आता तुम्ही आलात. दोष तुमचा, माझा नाही या माणसाच्या जातीपासून सावध राहा पोरींनो.- संदीप प्रधान