शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

इव्हेन्ट इन इंडिया

By admin | Updated: January 6, 2016 23:19 IST

जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी नोकरशहांनी नव्या कल्पना घेऊन समोर यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्यक्त केली.

जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी नोकरशहांनी नव्या कल्पना घेऊन समोर यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्यक्त केली. पण त्यापूर्वीच भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पाचपैकी चार नोबेल पारितोषिक विजेत्यांनी, मोदींना न मागताच एक चांगला सल्ला दिला आहे. मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात बदल करून, त्याला ‘इन्व्हेंट इन इंडिया’चे स्वरुप द्यावे, हा तो सल्ला! केवळ मोदींनीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाने आणि विशेषत: विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावा, असाच तो सल्ला आहे. जगाला शून्य या संकल्पनेची अमूल्य देणगी देऊन आधुनिक विज्ञानाचा पाया रचणाऱ्या भारताला त्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रात फार काही करता आले नाही, हे बोचरे असले तरी सत्य आहे. आज आम्ही मंगळावर पोहचलो आहोत आणि लवकरच सूर्यालाही कवेत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे खरे असले तरी त्यासाठी लागणारे कोणतेही मोठे तंत्रज्ञान आपण सर्वप्रथम विकसित केलेले नाही. मानवी जीवन बदलून टाकणारा कोणताही मोठा शोध भारतीयांनी लावलेला नाही. इतरांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाची नक्कल करण्यातच आपण धन्यता मानत आलो आहोत. प्रा. डेव्हिड ग्रॉस, प्रा. डॅन शेख्तमन, जॉन गॉर्डन आणि सर्ज हॅरॉच या नोबेल विजेत्यांनी नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. भारतात उत्पादन होणे भारतासाठी महत्त्वाचे आहेच; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे, ते इतरांवर विसंबून न राहता भारतात उत्पादन करणे आणि त्यासाठी भारतात शोध लागावे लागतील, असाच त्यांचा सूर होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर आज जवळपास सर्वच क्षेत्रात दबदबा प्रस्थापित केलेल्या अमेरिका व युरोपियन देशांनी तोच मार्ग अवलंबला होता. नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणे, शोध घेणे आणि शोध लावणे, याच मार्गाने दीर्घकालीन यशाच्या दिशेने अग्रेसर होता येईल. हे करीत असतानाच उद्यमशीलतेलाही प्रोत्साहन द्यावे लागेल. विद्यापीठात लागलेले शोध उद्योजकांपर्यंत पोहचायला हवेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यानंतर तो माल जगभर पोहचायला हवा. समृद्धी याच मार्गाने येऊ शकते. हे प्रत्यक्षात आणायचे असल्यास शिक्षण प्रणाली मजबूत करावी लागेल, त्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी लागेल, अभियांत्रिकीसोबतच विज्ञान शाखेकडेही लक्ष केंद्रित करावे लागेल. केवळ बोलघेवडेपणाने हे होणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्षात प्रचंड काम करावे लागेल.