शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

इव्हेन्ट इन इंडिया

By admin | Updated: January 6, 2016 23:19 IST

जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी नोकरशहांनी नव्या कल्पना घेऊन समोर यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्यक्त केली.

जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी नोकरशहांनी नव्या कल्पना घेऊन समोर यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्यक्त केली. पण त्यापूर्वीच भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पाचपैकी चार नोबेल पारितोषिक विजेत्यांनी, मोदींना न मागताच एक चांगला सल्ला दिला आहे. मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात बदल करून, त्याला ‘इन्व्हेंट इन इंडिया’चे स्वरुप द्यावे, हा तो सल्ला! केवळ मोदींनीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाने आणि विशेषत: विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावा, असाच तो सल्ला आहे. जगाला शून्य या संकल्पनेची अमूल्य देणगी देऊन आधुनिक विज्ञानाचा पाया रचणाऱ्या भारताला त्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रात फार काही करता आले नाही, हे बोचरे असले तरी सत्य आहे. आज आम्ही मंगळावर पोहचलो आहोत आणि लवकरच सूर्यालाही कवेत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे खरे असले तरी त्यासाठी लागणारे कोणतेही मोठे तंत्रज्ञान आपण सर्वप्रथम विकसित केलेले नाही. मानवी जीवन बदलून टाकणारा कोणताही मोठा शोध भारतीयांनी लावलेला नाही. इतरांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाची नक्कल करण्यातच आपण धन्यता मानत आलो आहोत. प्रा. डेव्हिड ग्रॉस, प्रा. डॅन शेख्तमन, जॉन गॉर्डन आणि सर्ज हॅरॉच या नोबेल विजेत्यांनी नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. भारतात उत्पादन होणे भारतासाठी महत्त्वाचे आहेच; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे, ते इतरांवर विसंबून न राहता भारतात उत्पादन करणे आणि त्यासाठी भारतात शोध लागावे लागतील, असाच त्यांचा सूर होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर आज जवळपास सर्वच क्षेत्रात दबदबा प्रस्थापित केलेल्या अमेरिका व युरोपियन देशांनी तोच मार्ग अवलंबला होता. नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणे, शोध घेणे आणि शोध लावणे, याच मार्गाने दीर्घकालीन यशाच्या दिशेने अग्रेसर होता येईल. हे करीत असतानाच उद्यमशीलतेलाही प्रोत्साहन द्यावे लागेल. विद्यापीठात लागलेले शोध उद्योजकांपर्यंत पोहचायला हवेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यानंतर तो माल जगभर पोहचायला हवा. समृद्धी याच मार्गाने येऊ शकते. हे प्रत्यक्षात आणायचे असल्यास शिक्षण प्रणाली मजबूत करावी लागेल, त्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी लागेल, अभियांत्रिकीसोबतच विज्ञान शाखेकडेही लक्ष केंद्रित करावे लागेल. केवळ बोलघेवडेपणाने हे होणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्षात प्रचंड काम करावे लागेल.