शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

इव्हेन्ट इन इंडिया

By admin | Updated: January 6, 2016 23:19 IST

जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी नोकरशहांनी नव्या कल्पना घेऊन समोर यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्यक्त केली.

जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी नोकरशहांनी नव्या कल्पना घेऊन समोर यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्यक्त केली. पण त्यापूर्वीच भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पाचपैकी चार नोबेल पारितोषिक विजेत्यांनी, मोदींना न मागताच एक चांगला सल्ला दिला आहे. मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात बदल करून, त्याला ‘इन्व्हेंट इन इंडिया’चे स्वरुप द्यावे, हा तो सल्ला! केवळ मोदींनीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाने आणि विशेषत: विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावा, असाच तो सल्ला आहे. जगाला शून्य या संकल्पनेची अमूल्य देणगी देऊन आधुनिक विज्ञानाचा पाया रचणाऱ्या भारताला त्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रात फार काही करता आले नाही, हे बोचरे असले तरी सत्य आहे. आज आम्ही मंगळावर पोहचलो आहोत आणि लवकरच सूर्यालाही कवेत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे खरे असले तरी त्यासाठी लागणारे कोणतेही मोठे तंत्रज्ञान आपण सर्वप्रथम विकसित केलेले नाही. मानवी जीवन बदलून टाकणारा कोणताही मोठा शोध भारतीयांनी लावलेला नाही. इतरांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाची नक्कल करण्यातच आपण धन्यता मानत आलो आहोत. प्रा. डेव्हिड ग्रॉस, प्रा. डॅन शेख्तमन, जॉन गॉर्डन आणि सर्ज हॅरॉच या नोबेल विजेत्यांनी नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. भारतात उत्पादन होणे भारतासाठी महत्त्वाचे आहेच; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे, ते इतरांवर विसंबून न राहता भारतात उत्पादन करणे आणि त्यासाठी भारतात शोध लागावे लागतील, असाच त्यांचा सूर होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर आज जवळपास सर्वच क्षेत्रात दबदबा प्रस्थापित केलेल्या अमेरिका व युरोपियन देशांनी तोच मार्ग अवलंबला होता. नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणे, शोध घेणे आणि शोध लावणे, याच मार्गाने दीर्घकालीन यशाच्या दिशेने अग्रेसर होता येईल. हे करीत असतानाच उद्यमशीलतेलाही प्रोत्साहन द्यावे लागेल. विद्यापीठात लागलेले शोध उद्योजकांपर्यंत पोहचायला हवेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यानंतर तो माल जगभर पोहचायला हवा. समृद्धी याच मार्गाने येऊ शकते. हे प्रत्यक्षात आणायचे असल्यास शिक्षण प्रणाली मजबूत करावी लागेल, त्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी लागेल, अभियांत्रिकीसोबतच विज्ञान शाखेकडेही लक्ष केंद्रित करावे लागेल. केवळ बोलघेवडेपणाने हे होणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्षात प्रचंड काम करावे लागेल.