शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

जातिअंताची चिरंतन चर्चा

By admin | Updated: May 1, 2015 00:15 IST

केवळ परिषदांचे, ठरावांचे व मर्यादित आवाका असलेल्यांच्या सहभागाचे उसासे टाकून जातिअंत साधणे शक्य नाही.

केवळ परिषदांचे, ठरावांचे व मर्यादित आवाका असलेल्यांच्या सहभागाचे उसासे टाकून जातिअंत साधणे शक्य नाही.आजच्या प्रचलित राजकीय व्यवस्थेत जातकारणाच्या भिंती दिवसेंदिवस अधिक बळकट होऊ पाहत असताना कुणी राजकारणी नव्याने जातिअंताचा विचार मांडत असेल तर ते अभिनंदनीय नक्कीच ठरावे, पण यातील व्यावहारिक अडचणींकडे दुर्लक्ष करून यासंबंधातील वाटचाल केली जाणार असेल तर सदर प्रयत्नही वांझोटा ठरल्याखेरीज राहणार नाही, हे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरादी मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.जातिअंताचा वा निर्मूलनाचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी प्रकर्षाने मांडला. परंतु या सुधारकांनाच आज जातीच्या कुंपणात बंदिस्त करण्याचे प्रयत्न चालले आहेत, हे आपण पाहतो आहोत. आजचे राजकारण, समाजकारण व धर्मकारणही जातींच्या जळमटाने असे काही व्यापले गेले आहे की, त्याचा गुंता सोडविणे अवघड ठरावे. अशात डॉ. बाबासाहेबांचा वारसा लाभलेले, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समविचारी पक्ष संघटनांना एकत्र आणून जातिअंताचा एल्गार पुकारला आहे ही तशी समाधानाचीच बाब म्हणायला हवी. त्यादृष्टीने सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळीच्या वतीने नाशकात जातिअंत परिषद घेतली गेली व तित शाळेच्या दाखल्यातूनच जात वगळावी असा ठराव करून त्यादिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले, हेही बरेच झाले. परंतु हे करताना पुन्हा मर्यादित वर्ग-समूहांच्याच सहभागाचे प्रदर्शन घडविले गेल्याने अशातून खरेच जातिअंत घडविता येणार आहे का, याबाबत शंकाच यावी. वैचारिकदृष्ट्या डावे पक्ष याबाबत अधिक जवळचे आहेत हे खरेच, पण म्हणून केवळ त्यांच्या पुढाकाराने जातिअंताचे उद्दिष्ट साधता येणार आहे का? सर्व पक्षातील व समाजाच्या सर्व वर्गातील प्रबुद्ध जनांना सोबत घेतल्याशिवाय यात पुढे जाता येणार नाही. कारण जनगणनेत जातीचा समावेश करण्यासाठी आग्रह धरणाऱ्यांचा हा काळ आहे. या काळावर मात करायची तर लढाईला निघण्यापूर्वीच कप्पेबंद होऊन चालणार नाही.जातकारणाचे सामाजिक, राजकीय तसेच मानसशास्त्रीय परिमाणही वेगवेगळे आहेत. जात ही जात नाही ती त्यामुळेच. तेव्हा त्या त्या पातळीवर जाऊन जात निर्मूलनाचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. डॉ.नरेंद्र दाभोळकरांनी जातपंचायतीचा विषय हाती घेतला तेव्हा जात हीच एक अंधश्रद्धा आहे, असा विचार ठेवून अंधश्रद्धेचे निर्मूलन करायचे त्याप्रमाणे जातिअंताचा विचार त्या त्या पंचायतींपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उत्सवी परिषदांमध्ये व पुरोगामी विचारसरणीच्या जवळ असणाऱ्या प्रेक्षकांमध्येच अडकून पडण्यापेक्षा जातीच्या जोखडात आपल्या उत्कर्षाच्या संधी हेरणाऱ्या वर्ग समूहांचे प्रत्यक्ष प्रबोधन करणाऱ्यावर भर दिला जावयास हवा. विचारातून खरेच निर्भयता येत असेल तर आचाराकडे वळायला हवे. तो आचार व्यावहारिकतेशी फारकत सांगणारा असल्यानेच वैचारिक गोंधळ व गडबड होताना दिसून येते. मनुव्यवस्थेवर प्रहार करायची भाषा करताना आपणच आपल्या प्रतिमांचे दैवतीकरण करणार असू तर बुद्धिनिष्ठेची हकालपट्टीच घडून येणार. मग कसा साधणार जातिअंत? येथे याच संदर्भाने एक आठवण प्रकर्षाने होणारी आहे. १९९२ मध्ये नाशकातच अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे तेरावे अधिवेशन झाले होते. रायभान जाधव अध्यक्ष राहिलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन करताना प्राचार्य पी. बी. पाटील यांनीही म. फुले यांना अभिप्रेत जातिअंताचा विचार मांडला होता. पण तेव्हाही प्रतिमांच्या नामस्मरणात सारे रेंगाळले होते. परिणामी गाडी पुढे सरकू शकली नाही. जातिअंत घडवून आणायचा असेल तर संधीच्या समानतेतून समता आणावी लागेल हेच खरे. त्याकरिता पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून समतेने व बंधूतेने वागणारे विविध समाज घटकांतील लोक एकत्र आणावे लागतील. विचारांना कृतीची जोड द्यावी लागेल. अन्यथा भगव्या ऐवजी निळा व लाल झेंडा फडकविण्याच्या समाधानाखेरीज फार काही हाती लागणार नाही. अर्थात, आजच्या वाढत्या जात्यंधपणाच्या वादळात किमान एक पणती का होईना फडफडत असेल तर तिच्या वातेभोवती सुजाणांनी हात धरायला हरकत नसावी.- किरण अग्रवाल