शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पुन्हा समान नागरी कायदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 10:08 IST

भाजप गुजरातमध्ये तब्बल २७ वर्षांपासून सत्तारूढ आहे. जनता दल लयास गेल्यापासून त्या राज्यात परंपरेने भाजप आणि कॉंग्रेस या दोनच पक्षांमध्ये लढत होते.

निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित करण्यास केलेल्या विलंबामुळे चर्चेत असलेली गुजरात विधानसभेची निवडणूक समान नागरी कायद्याच्या मुद्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाही सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने सत्तेत परतल्यास समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या घोषणेपूर्वी उत्तराखंडमधील सत्ता कायम राखण्याच्या भाजपच्या शक्यतेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती; परंतु निवडणुकीचे निकाल घोषित झाले आणि भाजपने अनपेक्षितरीत्या भरघोस यश मिळविले. बहुधा तो पूर्वेतिहास लक्षात घेऊनच, भाजपने पुन्हा एकदा गुजरातमध्ये तीच खेळी करण्याचे ठरविले असावे.

भाजप गुजरातमध्ये तब्बल २७ वर्षांपासून सत्तारूढ आहे. जनता दल लयास गेल्यापासून त्या राज्यात परंपरेने भाजप आणि कॉंग्रेस या दोनच पक्षांमध्ये लढत होते; परंतु यावेळी आम आदमी पक्षाने गुजरातेत चांगलीच हवा बनवली आहे. दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष मात्र निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाही हवा तसा सक्रिय झालेला नाही. गत निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात काही कडवी विधाने केल्याची किंमत कॉंग्रेसला गुजरातेत मोजावी लागली. त्यामुळे यावेळी कॉंग्रेस अत्यंत सावधगिरी बाळगताना दिसत आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आप या दोनच पक्षात लढाई होणार असल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे.

आपसोबत थेट लढाई झाल्यास दाणादाण उडते, असा अनुभव भाजपने दिल्ली व पंजाबमध्ये घेतला आहे. त्यातच आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी, चलनी नोटांवर लक्ष्मी व गणेश या हिंदू देवतांच्या प्रतिमा छापण्याची मागणी करून, भाजपच्या हिंदुत्वाच्या हुकमी प्रांतातच थेट घुसखोरी केली आहे. बहुधा त्यामुळेच भाजपने समान नागरी कायद्याचा बाण बाहेर काढला असावा, असे दिसते. अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य मंदिर, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे राज्यघटनेचे कलम ३७० रद्दबातल आणि देशात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी, हे गत अनेक वर्षांपासून भाजपच्या भात्यातील हुकमी बाण आहेत. त्यापैकी पहिले दोन्ही विषय मार्गी लागले असल्यामुळे, समान नागरी कायदा हा एकच बाण आता शिल्लक राहिला आहे.

कदाचित तो हुकमी बाण संसदेत कायदा पारित करून एकाच वेळी न चालवता, गरज भासेल तसा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वापरण्याचे नवे डावपेच भाजपने आखले असावे. वस्तुतः देशात समान नागरी असायला हवा, असे राज्यघटनेतच नमूद आहे. सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला तशी सूचना वेळोवेळी केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये समान नागरी कायदे आहेत आणि सर्वच धर्मांचे लोक त्यांचे निमूटपणे पालन करतात. त्यामुळे भारतातही समान नागरी कायदा असण्यास काहीच प्रत्यवाय नसावा; परंतु दुर्दैवाने आपल्या देशात प्रत्येक विषयाकडे राजकारणाच्या चष्म्यातून आणि आपली पोळी भाजून घेण्याच्या हेतूनेच बघितले जाते. समान नागरी कायदादेखील त्याला अपवाद नाही. एक बाजू समाजाच्या सर्वच घटकांना समान हक्क, अधिकार मिळवून देण्यापेक्षा, विशिष्ट धर्माच्या अनुयायांना खिजविण्यासाठी समान नागरी कायद्याचा वापर करते, तर दुसरी बाजू समान नागरी कायदा अस्तित्वात आल्यास जणू काही त्यांचे देशातील अस्तित्वच धोक्यात येणार असल्याचा कांगावा करते!

प्रत्यक्षात दोन्ही बाजूंना केवळ त्यांचे मतपेढीचे राजकारण तेवढे साधायचे असते. दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्ष त्यामध्ये सहभागी आहेत. काही पक्ष समान नागरी कायद्याची भलामण करून राजकीय स्वार्थ साधतात, तर काही त्याला विरोध करून, एवढाच काय तो फरक! भारतासारख्या देशात समान नागरी कायदा प्रस्थापित करणे वाटते तेवढे सोपे नाही. समान नागरी कायद्यामुळे महिलांना समान हक्क मिळण्यास मदत होईल, युवा पिढीच्या आकांक्षांना नवे पंख लाभतील, राष्ट्रीय एकात्मतेला चालना मिळेल, विद्यमान वैयक्तिक कायद्यांमधील सुधारणांचा विषय कायमस्वरूपी बाद होईल. हे सगळे खरे असले तरी, सर्वच धर्मांच्या अनुयायांना मान्य होतील, असा नियमांचा संच तयार करणे सोपे नाही. शिवाय एकाच कायद्याने सगळ्यांना बांधल्यामुळे धर्माचरणाच्या घटनादत्त अधिकारावर टाच आल्याची ओरड सुरू होईल! त्यातून अनेक प्रश्न उभे ठाकू शकतात. त्यामुळे या विषयाकडे मतपेढीच्या चष्म्यातून न बघता, प्रत्येकाने व्यापक देशहित नजरेसमोर ठेवूनच बघायला हवे!

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा