शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पुरे झाला खेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 13:31 IST

मनपा प्रशासनाकडून बोटचेपी भूमिका

मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेने थकबाकीदार करदात्यांची यादी भरचौकात लावली. आर्थिक वर्ष संपायला अवघे सव्वा दोन महिने राहिल्याने प्रशासनाचे हे पाऊल योग्य आहे. १० महिन्यांमध्ये केवळ ५० टक्के मालमत्ता कर वसुली झाली असल्याने हे कठोर पाऊल उचलले गेल्याचे प्रशासनाचे म्हणणेदेखील रास्त आहे. परंतु, यासोबतच महापालिकेच्या गाळेधारकांकडे २०१२ पासून भाडे थकीत असून त्यासंबंधी न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही प्रशासनाकडून बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. थकबाकीदार करदात्यांना एक न्याय आणि ६ वर्षांपासून भाडे न भरणाऱ्या, कराराचे नुतनीकरण न करणाºया गाळेधारकांना दुसरा न्याय हा प्रशासनाचा दुटप्पीपणा नाही काय?हे सगळे राजकारण आहे, हे जळगावकरांना पुरते ठाऊक आहे. महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांची मुदत २००८ मध्ये संपुष्टात आली. त्यांच्याशी नव्याने करार करताना भाडेवाढ किती असावी, किती वर्षांचा करार असावा हा महत्त्वाचा विषय होता. गाळेधारकांचे नेते आणि महापालिकेतील तत्त्कालीन सत्ताधारी म्हणजे खान्देश विकास आघाडीचे नेते यांच्यात चर्चेच्या फेºया झाल्या. प्रत्येक जण आपल्या ताटात अधिक यावे, हा प्रयत्न करीत असतो. तसेच झाले. गाळेधारक जास्त द्यायला तयार नाही आणि महापालिका कमी दरासाठी तयार नाही, अशा वादात मग राजकारण शिरले. सत्ताधारी आपले म्हणणे ऐकत नाही, म्हणून गाळेधारक विरोधकांना भेटले. विरोधकांना काही संस्था चालवायची नसल्याने त्यांना अवास्तव मागण्या, अपेक्षा, आश्वासने देण्यात काही तोटा नसतो. याठिकाणी तेच झाले. हद्द म्हणजे, व्यापारी संकुलाची जागा ही महसूल विभागाची आहे, महापालिकेची नाहीच, आम्ही तुमच्या नावावर ती करुन देऊ असे आश्वासन विरोधकांनी दिले. राजकीय लाभ उठवत, लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुका विरोधी पक्षाने जिंकल्या. सत्ताधारी झाले. परंतु, पाच महिन्यांपासून तर पाच वर्षांपर्यंत गाळेधारकांना तसूभरही दिलासा देण्यात तत्कालीन विरोधक आणि आताचे सत्ताधारी यश मिळवू शकलेले नाही.जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन महाापालिकेच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. विरोधक सत्ताधारी झाले तर खरे, पण आता दुहेरी कात्रीत सापडले. ‘अच्छे दिन’ची गत देशभर झाली, तशी या गाळेधारकांविषयीही झाली. सत्ता येईल, असे वाटत नसल्याने अवास्तव आश्वासने दिली, मात्र ती कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याने गोची झाली. भारतीय राजकारण्यांकडे एक गुण आहे, परिस्थिती, नियम आपल्या अनुकूल नसतील तर ‘वेळ काढू धोरण’ अवलंबून विषय भिजत पडू द्यायचा. अनेक मातब्बर राजकारण्यांनी हा हातखंडा वापरला आहे. तोच आता गाळेधारकांविषयी वापरला जात आहे. परंतु, वेळकाढू धोरणामुळे प्रश्न सुटत नसला तरी टांगती तलवार कायम राहते आणि असंतोष धुमसत राहतो. कधी तरी त्याचा स्फोट होतो आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाते. प्रशासनाचा वापर करीत सत्ताधारी हा प्रश्न लोंबकळत ठेवत आहे. गाळेधारक विनाभाड्याने गाळे वापरत आहे आणि मालमत्ता कर न भरल्याने जळगावकरांची इज्जत भरचौकात उधळली जात आहे. हा दुहेरी खेळ थांबवायला हवा.

टॅग्स :Jalgaonजळगाव