शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

पुरे झाला खेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 13:31 IST

मनपा प्रशासनाकडून बोटचेपी भूमिका

मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेने थकबाकीदार करदात्यांची यादी भरचौकात लावली. आर्थिक वर्ष संपायला अवघे सव्वा दोन महिने राहिल्याने प्रशासनाचे हे पाऊल योग्य आहे. १० महिन्यांमध्ये केवळ ५० टक्के मालमत्ता कर वसुली झाली असल्याने हे कठोर पाऊल उचलले गेल्याचे प्रशासनाचे म्हणणेदेखील रास्त आहे. परंतु, यासोबतच महापालिकेच्या गाळेधारकांकडे २०१२ पासून भाडे थकीत असून त्यासंबंधी न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही प्रशासनाकडून बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. थकबाकीदार करदात्यांना एक न्याय आणि ६ वर्षांपासून भाडे न भरणाऱ्या, कराराचे नुतनीकरण न करणाºया गाळेधारकांना दुसरा न्याय हा प्रशासनाचा दुटप्पीपणा नाही काय?हे सगळे राजकारण आहे, हे जळगावकरांना पुरते ठाऊक आहे. महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांची मुदत २००८ मध्ये संपुष्टात आली. त्यांच्याशी नव्याने करार करताना भाडेवाढ किती असावी, किती वर्षांचा करार असावा हा महत्त्वाचा विषय होता. गाळेधारकांचे नेते आणि महापालिकेतील तत्त्कालीन सत्ताधारी म्हणजे खान्देश विकास आघाडीचे नेते यांच्यात चर्चेच्या फेºया झाल्या. प्रत्येक जण आपल्या ताटात अधिक यावे, हा प्रयत्न करीत असतो. तसेच झाले. गाळेधारक जास्त द्यायला तयार नाही आणि महापालिका कमी दरासाठी तयार नाही, अशा वादात मग राजकारण शिरले. सत्ताधारी आपले म्हणणे ऐकत नाही, म्हणून गाळेधारक विरोधकांना भेटले. विरोधकांना काही संस्था चालवायची नसल्याने त्यांना अवास्तव मागण्या, अपेक्षा, आश्वासने देण्यात काही तोटा नसतो. याठिकाणी तेच झाले. हद्द म्हणजे, व्यापारी संकुलाची जागा ही महसूल विभागाची आहे, महापालिकेची नाहीच, आम्ही तुमच्या नावावर ती करुन देऊ असे आश्वासन विरोधकांनी दिले. राजकीय लाभ उठवत, लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुका विरोधी पक्षाने जिंकल्या. सत्ताधारी झाले. परंतु, पाच महिन्यांपासून तर पाच वर्षांपर्यंत गाळेधारकांना तसूभरही दिलासा देण्यात तत्कालीन विरोधक आणि आताचे सत्ताधारी यश मिळवू शकलेले नाही.जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन महाापालिकेच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. विरोधक सत्ताधारी झाले तर खरे, पण आता दुहेरी कात्रीत सापडले. ‘अच्छे दिन’ची गत देशभर झाली, तशी या गाळेधारकांविषयीही झाली. सत्ता येईल, असे वाटत नसल्याने अवास्तव आश्वासने दिली, मात्र ती कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याने गोची झाली. भारतीय राजकारण्यांकडे एक गुण आहे, परिस्थिती, नियम आपल्या अनुकूल नसतील तर ‘वेळ काढू धोरण’ अवलंबून विषय भिजत पडू द्यायचा. अनेक मातब्बर राजकारण्यांनी हा हातखंडा वापरला आहे. तोच आता गाळेधारकांविषयी वापरला जात आहे. परंतु, वेळकाढू धोरणामुळे प्रश्न सुटत नसला तरी टांगती तलवार कायम राहते आणि असंतोष धुमसत राहतो. कधी तरी त्याचा स्फोट होतो आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाते. प्रशासनाचा वापर करीत सत्ताधारी हा प्रश्न लोंबकळत ठेवत आहे. गाळेधारक विनाभाड्याने गाळे वापरत आहे आणि मालमत्ता कर न भरल्याने जळगावकरांची इज्जत भरचौकात उधळली जात आहे. हा दुहेरी खेळ थांबवायला हवा.

टॅग्स :Jalgaonजळगाव