शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भोग, योग आणि त्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:52 IST

गीतेची संपूर्ण शिकवण पाहिली तर जागोजागी कर्माचा त्याग करू नका

डॉ. रामचंद्र देखणेजगासाठी एखादी गोष्ट निरपेक्षपणे करणे हाही मोठा त्यागच आहे. निसर्गातील सर्वच घटक त्यागाच्या भूमिकेतून उभे आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी वृक्षाला त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून गौरविले आहे.हां तो त्याग तरुवरू।जो गा मोक्षफळे ये थोरू।सात्विक ऐसा डगरु।यासीची जगी।।वृक्ष स्वत: उन्हात उभे राहतो. सावली मात्र इतरांना देतो. फळांच्या भाराने वाकतो ती फळेही इतरांना देऊन टाकतो. एवढेच काय, पण पाने, फुले, लाकूड हेही सारे दुसऱ्यांसाठीच. कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा नसलेला हा वृक्ष त्यागी पुरुषाचेच महान प्रतीक आहे. त्याग ही परेश्वराने मानवाला दिलेली एक अद्वितीय देणगी आहे. त्यागात समर्पणाची भूमिका आहे आणि कृतार्थतेचा आनंदही. भोग सोडला की त्याग घडतो आणि या त्यागातच ‘योग’ हात जोडून उभा राहतो. भोग आणि योग यांच्यामागे त्याग आहे. भोगी तो रोगी. त्यागी तो निरोगी. याच्याही पुढची अवस्था म्हणजे योगी. कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग ही योगाची पहिली पायरी होय.गीतेची संपूर्ण शिकवण पाहिली तर जागोजागी कर्माचा त्याग करू नका, पण कर्मफलाचा त्याग करा असे गीता सांगते. गीतेच्या फलत्यागाला प्रत्यक्ष कर्मत्यागाची आवश्यकता नाही. कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार घालविणे हा मोठा त्यागच आहे. म्हणूनच गीतेने कर्ता, कर्मयोगी आणि कर्मसंन्यासी अशा तीन अवस्था सांगितल्या आहेत. त्या अवस्था त्याग आणि भोग यांच्या सीमारेषा स्पष्टपणे दाखविणाºया आहेत. जी काम्य कर्मे आहेत त्यांच्या मुळाशी कामना आहे. काम्यकर्माचा त्याग हा संन्यास आहे. परंतु फलत्यागासमोर काम्य आणि निषिद्ध कर्मे उभीच राहू शकत नाहीत. हिंसात्मक कर्मे, असत्यमय कर्मे, चोरीची कर्मे ही फलत्यागपूर्वक करता येत नाहीत. फलत्यागाची कसोटी लावताच ही कर्मे गळून पडतात. सूर्याची प्रभा विकसित झाली की सर्व वस्तू उजळून निघतात, परंतु अंधार उजळतो का? तर अंधार हा समग्र नाहीसा होतो. अंधार गळून पडतो. तशीच निषिद्ध आणि काम्य कर्माची स्थिती आहे. माऊली म्हणतात,म्हणौनि त्याज्य जे नोहे। तेथ त्यागाते न सुवावे।त्याज्यालागी नोहावे। लोभापार।।जे त्याग करण्यास योग्य नाही त्याचा त्याग करू नये, पण ज्या गोष्टींचा त्याग करणे योग्य आहे त्याचे आचरण करण्याचा लोभ न धरणे हाच खरा विवेक होय.

टॅग्स :Meditationसाधना