शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

एका वाघिणीचा अंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:41 IST

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक!

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक! विजेचा धक्का बसला नसता तर ती कदाचित आणखी दोन-चार दिवस जगली असती. त्या काळात ती आणखी एखाद्याचा बळीही घेऊ शकली असती आणि म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, अशा प्रतिक्रिया नक्कीच उमटल्या असतील. जंगलांमध्ये अथवा जंगलांनजीक वास्तव्य करणा-या मंडळीच्या व्यथा त्यांनाच ठाऊक! शहरातून पर्यावरण रक्षणासाठी अश्रू ढाळणे, समाजमाध्यमांवर ‘सेव्ह टायगर’च्या ‘पोस्ट’ ‘फॉरवर्ड’ करणे फार सोपे असते, हेदेखील अगदी बरोबर; पण म्ह्णून काय समूळ नष्ट होण्याच्या पंथाला लागलेल्या वंशातील अवघ्या तेरा-चौदा महिन्यांच्या उमद्या जनावराचा जीव घेणेच गरजेचे होते? काला असे नामकरण करण्यात आलेल्या सदर वाघिणीच्या गळ्यात ‘रेडिओ ट्रॅकिंग कॉलर’ होती. त्यामुळे तिच्या सर्व हालचाली वन विभाग टिपत होता. गत काही दिवसात तिने सुमारे ६०० किलोमीटरचा प्रवास केला होता. प्रवासादरम्यान प्रत्येक क्षणी ती नेमकी कुठे आहे, हे वन विभागाला ठाऊक होते. मग असे असताना तिला ठार मारणेच का गरजेचे होते, जिवंत पकडणे का शक्य नव्हते, याचे उत्तर वन विभागाने द्यायलाच हवे. तिला यापूर्वी वन विभागाने पकडले होते, हे येथे ध्यानात घ्यायला हवे. भीतीच्या सावटाखालील नागरिकांनी नरभक्षक वाघास त्वरित ठार मारण्याची मागणी करणे समजून घेता येईल; पण इथे तर वन विभागालाच वाघिणीला ठार मारण्याची घाई झाली होती की काय, अशी शंका येते. वाघिणीला बंदुकीची गोळी घालण्याऐवजी ‘ट्रँक्विलायझर गन’द्वारा बेशुद्ध करणे आणि एखाद्या प्राणी संग्रहालयातील पिंज-यात ठेवणे सहज शक्य होते. हा पर्याय का निवडण्यात आला नाही, हे अनाकलनीय आहे. आधीच पृथ्वीवरून वाघाचा वंश समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगात जेवढे वाघ शिल्लक आहेत, त्यापैकी ७० टक्के एकट्या भारतातच आहेत. हा ठेवा वाचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, की केवळ नरभक्षक झाला म्हणून एखाद्या वाघाला ठारच करायला हवे? मुळात मनुष्य हे वाघांचे भक्ष्य नाही; अन्यथा भारतातील सुमारे १७०० वाघ दर आठवड्यात एक याप्रमाणे वर्षभरात ज्या ८५ हजारावर शिकारी करतात, त्यामध्ये मनुष्यांचाच भरणा अधिक असता! काला तर गेली. किमान यापुढे तरी अशी पाळी येऊ नये, यासाठी वन विभागाचे उच्च अधिकारी आवश्यक ती पावले उचलतील, अशी अपेक्षा करावी का?

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्र