शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

एका वाघिणीचा अंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:41 IST

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक!

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक! विजेचा धक्का बसला नसता तर ती कदाचित आणखी दोन-चार दिवस जगली असती. त्या काळात ती आणखी एखाद्याचा बळीही घेऊ शकली असती आणि म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, अशा प्रतिक्रिया नक्कीच उमटल्या असतील. जंगलांमध्ये अथवा जंगलांनजीक वास्तव्य करणा-या मंडळीच्या व्यथा त्यांनाच ठाऊक! शहरातून पर्यावरण रक्षणासाठी अश्रू ढाळणे, समाजमाध्यमांवर ‘सेव्ह टायगर’च्या ‘पोस्ट’ ‘फॉरवर्ड’ करणे फार सोपे असते, हेदेखील अगदी बरोबर; पण म्ह्णून काय समूळ नष्ट होण्याच्या पंथाला लागलेल्या वंशातील अवघ्या तेरा-चौदा महिन्यांच्या उमद्या जनावराचा जीव घेणेच गरजेचे होते? काला असे नामकरण करण्यात आलेल्या सदर वाघिणीच्या गळ्यात ‘रेडिओ ट्रॅकिंग कॉलर’ होती. त्यामुळे तिच्या सर्व हालचाली वन विभाग टिपत होता. गत काही दिवसात तिने सुमारे ६०० किलोमीटरचा प्रवास केला होता. प्रवासादरम्यान प्रत्येक क्षणी ती नेमकी कुठे आहे, हे वन विभागाला ठाऊक होते. मग असे असताना तिला ठार मारणेच का गरजेचे होते, जिवंत पकडणे का शक्य नव्हते, याचे उत्तर वन विभागाने द्यायलाच हवे. तिला यापूर्वी वन विभागाने पकडले होते, हे येथे ध्यानात घ्यायला हवे. भीतीच्या सावटाखालील नागरिकांनी नरभक्षक वाघास त्वरित ठार मारण्याची मागणी करणे समजून घेता येईल; पण इथे तर वन विभागालाच वाघिणीला ठार मारण्याची घाई झाली होती की काय, अशी शंका येते. वाघिणीला बंदुकीची गोळी घालण्याऐवजी ‘ट्रँक्विलायझर गन’द्वारा बेशुद्ध करणे आणि एखाद्या प्राणी संग्रहालयातील पिंज-यात ठेवणे सहज शक्य होते. हा पर्याय का निवडण्यात आला नाही, हे अनाकलनीय आहे. आधीच पृथ्वीवरून वाघाचा वंश समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगात जेवढे वाघ शिल्लक आहेत, त्यापैकी ७० टक्के एकट्या भारतातच आहेत. हा ठेवा वाचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, की केवळ नरभक्षक झाला म्हणून एखाद्या वाघाला ठारच करायला हवे? मुळात मनुष्य हे वाघांचे भक्ष्य नाही; अन्यथा भारतातील सुमारे १७०० वाघ दर आठवड्यात एक याप्रमाणे वर्षभरात ज्या ८५ हजारावर शिकारी करतात, त्यामध्ये मनुष्यांचाच भरणा अधिक असता! काला तर गेली. किमान यापुढे तरी अशी पाळी येऊ नये, यासाठी वन विभागाचे उच्च अधिकारी आवश्यक ती पावले उचलतील, अशी अपेक्षा करावी का?

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्र