शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एका वाघिणीचा अंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:41 IST

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक!

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक! विजेचा धक्का बसला नसता तर ती कदाचित आणखी दोन-चार दिवस जगली असती. त्या काळात ती आणखी एखाद्याचा बळीही घेऊ शकली असती आणि म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, अशा प्रतिक्रिया नक्कीच उमटल्या असतील. जंगलांमध्ये अथवा जंगलांनजीक वास्तव्य करणा-या मंडळीच्या व्यथा त्यांनाच ठाऊक! शहरातून पर्यावरण रक्षणासाठी अश्रू ढाळणे, समाजमाध्यमांवर ‘सेव्ह टायगर’च्या ‘पोस्ट’ ‘फॉरवर्ड’ करणे फार सोपे असते, हेदेखील अगदी बरोबर; पण म्ह्णून काय समूळ नष्ट होण्याच्या पंथाला लागलेल्या वंशातील अवघ्या तेरा-चौदा महिन्यांच्या उमद्या जनावराचा जीव घेणेच गरजेचे होते? काला असे नामकरण करण्यात आलेल्या सदर वाघिणीच्या गळ्यात ‘रेडिओ ट्रॅकिंग कॉलर’ होती. त्यामुळे तिच्या सर्व हालचाली वन विभाग टिपत होता. गत काही दिवसात तिने सुमारे ६०० किलोमीटरचा प्रवास केला होता. प्रवासादरम्यान प्रत्येक क्षणी ती नेमकी कुठे आहे, हे वन विभागाला ठाऊक होते. मग असे असताना तिला ठार मारणेच का गरजेचे होते, जिवंत पकडणे का शक्य नव्हते, याचे उत्तर वन विभागाने द्यायलाच हवे. तिला यापूर्वी वन विभागाने पकडले होते, हे येथे ध्यानात घ्यायला हवे. भीतीच्या सावटाखालील नागरिकांनी नरभक्षक वाघास त्वरित ठार मारण्याची मागणी करणे समजून घेता येईल; पण इथे तर वन विभागालाच वाघिणीला ठार मारण्याची घाई झाली होती की काय, अशी शंका येते. वाघिणीला बंदुकीची गोळी घालण्याऐवजी ‘ट्रँक्विलायझर गन’द्वारा बेशुद्ध करणे आणि एखाद्या प्राणी संग्रहालयातील पिंज-यात ठेवणे सहज शक्य होते. हा पर्याय का निवडण्यात आला नाही, हे अनाकलनीय आहे. आधीच पृथ्वीवरून वाघाचा वंश समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगात जेवढे वाघ शिल्लक आहेत, त्यापैकी ७० टक्के एकट्या भारतातच आहेत. हा ठेवा वाचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, की केवळ नरभक्षक झाला म्हणून एखाद्या वाघाला ठारच करायला हवे? मुळात मनुष्य हे वाघांचे भक्ष्य नाही; अन्यथा भारतातील सुमारे १७०० वाघ दर आठवड्यात एक याप्रमाणे वर्षभरात ज्या ८५ हजारावर शिकारी करतात, त्यामध्ये मनुष्यांचाच भरणा अधिक असता! काला तर गेली. किमान यापुढे तरी अशी पाळी येऊ नये, यासाठी वन विभागाचे उच्च अधिकारी आवश्यक ती पावले उचलतील, अशी अपेक्षा करावी का?

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्र