शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

एका वाघिणीचा अंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:41 IST

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक!

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक! विजेचा धक्का बसला नसता तर ती कदाचित आणखी दोन-चार दिवस जगली असती. त्या काळात ती आणखी एखाद्याचा बळीही घेऊ शकली असती आणि म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, अशा प्रतिक्रिया नक्कीच उमटल्या असतील. जंगलांमध्ये अथवा जंगलांनजीक वास्तव्य करणा-या मंडळीच्या व्यथा त्यांनाच ठाऊक! शहरातून पर्यावरण रक्षणासाठी अश्रू ढाळणे, समाजमाध्यमांवर ‘सेव्ह टायगर’च्या ‘पोस्ट’ ‘फॉरवर्ड’ करणे फार सोपे असते, हेदेखील अगदी बरोबर; पण म्ह्णून काय समूळ नष्ट होण्याच्या पंथाला लागलेल्या वंशातील अवघ्या तेरा-चौदा महिन्यांच्या उमद्या जनावराचा जीव घेणेच गरजेचे होते? काला असे नामकरण करण्यात आलेल्या सदर वाघिणीच्या गळ्यात ‘रेडिओ ट्रॅकिंग कॉलर’ होती. त्यामुळे तिच्या सर्व हालचाली वन विभाग टिपत होता. गत काही दिवसात तिने सुमारे ६०० किलोमीटरचा प्रवास केला होता. प्रवासादरम्यान प्रत्येक क्षणी ती नेमकी कुठे आहे, हे वन विभागाला ठाऊक होते. मग असे असताना तिला ठार मारणेच का गरजेचे होते, जिवंत पकडणे का शक्य नव्हते, याचे उत्तर वन विभागाने द्यायलाच हवे. तिला यापूर्वी वन विभागाने पकडले होते, हे येथे ध्यानात घ्यायला हवे. भीतीच्या सावटाखालील नागरिकांनी नरभक्षक वाघास त्वरित ठार मारण्याची मागणी करणे समजून घेता येईल; पण इथे तर वन विभागालाच वाघिणीला ठार मारण्याची घाई झाली होती की काय, अशी शंका येते. वाघिणीला बंदुकीची गोळी घालण्याऐवजी ‘ट्रँक्विलायझर गन’द्वारा बेशुद्ध करणे आणि एखाद्या प्राणी संग्रहालयातील पिंज-यात ठेवणे सहज शक्य होते. हा पर्याय का निवडण्यात आला नाही, हे अनाकलनीय आहे. आधीच पृथ्वीवरून वाघाचा वंश समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगात जेवढे वाघ शिल्लक आहेत, त्यापैकी ७० टक्के एकट्या भारतातच आहेत. हा ठेवा वाचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, की केवळ नरभक्षक झाला म्हणून एखाद्या वाघाला ठारच करायला हवे? मुळात मनुष्य हे वाघांचे भक्ष्य नाही; अन्यथा भारतातील सुमारे १७०० वाघ दर आठवड्यात एक याप्रमाणे वर्षभरात ज्या ८५ हजारावर शिकारी करतात, त्यामध्ये मनुष्यांचाच भरणा अधिक असता! काला तर गेली. किमान यापुढे तरी अशी पाळी येऊ नये, यासाठी वन विभागाचे उच्च अधिकारी आवश्यक ती पावले उचलतील, अशी अपेक्षा करावी का?

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्र