शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या प्रवाहातील एका दीपस्तंभाची अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 04:19 IST

‘भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील असते. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला योग्य दिशा द्यावी लागते अन्यथा हाहाकार संभवतो, त्याप्रमाणेच भाषेच्या प्रवाहाला योग्य दिशा, योग्य मार्ग आणि काही शिस्त असली पाहिजे. जसे कपड्यांमधील नीटनेटकेपणा कपड्यांचे सौंदर्य वाढवितो, तसेच भाषेतील शुद्धता ही त्या भाषेचे सौंदर्य वाढवित असते.’ अशा अनेक सोप्या उदाहरणांवरून त्यांनी भाषिक शुद्धतेची गरज अधोरेखित केली.

मराठी भाषा शुद्धलेखन चळवळीचे महाराष्ट्रातील बिनीचे शिलेदार, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे शुक्रवारी वयाच्या ६५व्या वर्षी नाशिक येथे निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. विशेष म्हणजे कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही त्यांनी उपचारानंतर व्याख्याने, मार्गदर्शनवर्ग पुन्हा सुरू केले होते.‘भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील असते. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला योग्य दिशा द्यावी लागते अन्यथा हाहाकार संभवतो, त्याप्रमाणेच भाषेच्या प्रवाहाला योग्य दिशा, योग्य मार्ग आणि काही शिस्त असली पाहिजे. जसे कपड्यांमधील नीटनेटकेपणा कपड्यांचे सौंदर्य वाढवितो, तसेच भाषेतील शुद्धता ही त्या भाषेचे सौंदर्य वाढवित असते.’ अशा अनेक सोप्या उदाहरणांवरून त्यांनी भाषिक शुद्धतेची गरज अधोरेखित केली.मराठी ही सामर्थ्यवान भाषा असून, तिला स्वत:ची लेखनप्रकृती आहे. मराठी भाषेबद्दल सर्वांनाच आपुलकी आणि अभिमान असतो. मात्र, जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मराठी ज्ञानभाषा होत असताना मला मातृभाषेत शुद्ध लिहिता आले पाहिजे, ही इच्छाशक्तीही प्रत्येकाजवळ असणे गरजेचे आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. माणसांच्या स्वैर वागण्याला कायदे आणि नीतिनियम वळणावर आणतात. कारण, व्यवहारातील नियमव्यवस्थाच जर आपण नाकारली, तर त्याचे परिणाम स्वत:ला किंवा इतरांना भोगावे लागतात. त्याप्रमाणे चुकीच्या लेखनामुळे भाषेत भेसळ निर्माण होऊन समाजजीवनात अव्यवस्था आणि पर्यायाने अराजक यांना आमंत्रण दिल्यासारखे होते. म्हणून शुद्धलेखन हा आग्रह न धरताती महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची सवय झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती आणि या भूमिकेशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले, कार्यरत राहिले.आपल्या राज्यात पहिली ते पदव्युत्तर ते अगदी विद्यावाचस्पती (पीएच.डी.)पर्यंत मराठी भाषा शिकविली जाते; पण मराठी कशी लिहावी, याचे ज्ञान दिले जात नाही. त्यामुळे मराठीत पदवी, पदव्युत्तर तसेच डॉक्टर झालेले अनेक वाचस्पतीहीदहा ओळी शुद्ध लिहू शकत नाहीत, अशी खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखविली होती आणि शासनाकडे शुद्धलेखनाच्या नियमावलीच्या कायदेशीर अंमलबजावणीसाठी ते प्रयत्नशील होते. ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’, ‘सोपे मराठी शुद्धलेखन’, ‘मला मराठी शिकायचंय’, ‘मराठी लेखन-कोश’ ही त्यांची मराठी भाषेवरील अप्रतिम पुस्तके विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक तसेच विद्यावाचस्पतींसह सर्वांनाच मार्गदर्शक आहेत. त्यांच्या निधनाने सध्या दुर्मीळ होत चाललेले मराठी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि शुद्धलेखन चळवळीतील तळमळीचा कार्यकर्ता हरविल्याची खंत आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.- सरोजकुमार मिठारी,वाई (जि. सातारा)

टॅग्स :marathiमराठी