शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कर्मचारी संघटनांचा धाक संपला

By यदू जोशी | Updated: January 15, 2018 02:17 IST

राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आणि सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळत नसल्याचे आणि वारंवार मागणी करूनही पाच दिवसांचा आठवडा लागू होत

राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आणि सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळत नसल्याचे आणि वारंवार मागणी करूनही पाच दिवसांचा आठवडा लागू होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा असे लक्षात आले की सातवा वेतन आयोग देण्यासाठी राज्य सरकारने वर्षदीडवर्षांपूर्वी नेमलेल्या के.पी.बक्षी समितीने अद्याप आपले कामकाजच सुरू केलेले नाही. निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीने अहवाल तर तयार केला पण तो राज्य सरकारला सादर केलेला नाही. कर्मचारी, अधिकाºयांच्या संघटनांना सरकार किती गांभीर्याने घेते त्याचे हे लक्षण आहे.सातवा वेतन आयोग एप्रिल २०१७ पासून द्या, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, पाच दिवसांचा आठवडा करा, महिला कर्मचाºयांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा द्या आणि प्रशासनातील रिक्त १ लाख ९० हजार पदे भरा, अशा प्रमुख मागण्या आहेत. त्यांना आतापर्यंत सध्याच्या राज्य सरकारने वाटाण्याचा अक्षदा लावल्या आहेत. सरकारवर दडपण आणून मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी आवश्यक असलेला धाक कमी झाल्याचे हे प्रतीक आहे. रिक्त पदे भरणे तर सोडाच उलट ३० टक्के पदे कमी करून नवा आकृतिबंध तयार करण्याचे आदेश प्रत्येक विभागाला देण्यात आले आहेत. राज्य शासनाची पावले कर्मचारी कपातीकडे पडत आहेत. साडेचार लाख कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबलेल्या शासनाला त्यांच्या तिजोरीवर भार पडेल अशी कोणतीही मागणी मान्य करायची नाही. संघटनांची संघर्षाची धार बोथट होत झाली आहे. त्यामुळे आहेत ते प्रश्न तसेच राहत आहेत. खरेतर कोणत्याही राजकीय विचारांच्या खुंटीला न बांधून घेता महाराष्ट्रातील कर्मचारी,अधिकारी संघटनांनी आपले वेगळेपण आजवर जपले आहे. त्याबद्दल त्या प्रशंसेस पात्रच आहेत पण या संघटनांमध्ये आपसात एकवाक्यतेचा अभाव दिसतो. काही प्रमुख मागण्यांबाबतही त्यांच्यात मतभिन्नता आहे. ‘अधिकारी महासंघ स्वत:चे घोडे दामटतो. आपल्याला सोबत घेणे त्यांना कमीपणाचे वाटते’, अशी कर्मचारी संघटनांची अनेकदा भावना असते. ‘कर्मचारी संघटनांसारखी आततायी भूमिका अधिकाºयांच्या संघटनेला घेता येत नाही त्यामुळे बरेचदा भूमिकेवरून मतभेद होतात’, अशी अधिकारी महासंघाची भावना असते. संघटनांचा एकत्रित दबाव सरकारला घाबरवू शकेल पण तसे होत नाही. ‘पगारात भागवा’ अभियानाने नोकरशाहीतील भ्रष्टाचार कमी झाला वा संपला हे म्हणणे विनोदाचे ठरेल.नोकरशाहीचा भ्रष्टाचार आणि सामान्यांप्रतीची अनास्था यामुळे नोकरशाहीबद्दलची आस्था लोप पावतेय याचे आत्मचिंतन व्हावे. र.ग.कर्णिक हे राज्यातील कर्मचाºयांचे तर ग.दि.कुलथे हे अधिकाºयांचे आजही सर्वात मोठे नेते आहेत आणि त्या दोघांचेही योगदान नि:संशय मोठे आहे पण, दोघांनीही वयाची ऐंशी गाठली आहे. त्या तोडीचे नेतृत्व पुढे येताना दिसत नाही. आपल्यानंतरची नेतृत्वाची पिढी आपल्या हयातीत घडविण्याची जबाबदारी ही ज्येष्ठ नेत्यांची असते आणि त्यातून त्यांच्या नेतृत्वाला मोठेपणही प्राप्त होत असते. या मोठेपणाची दोघांकडून अपेक्षा आहे. इतर संघटनांमधील त्याच त्या नेत्यांनीही याचा विचार करायला हरकत नसावी. - यदु जोशी