शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 03:52 IST

वीज ग्राहकांना आणखी ‘जोर का झटका धीरेसे’ देण्याची तयारी महावितरणने चालविली आहे.

वीज ग्राहकांना आणखी ‘जोर का झटका धीरेसे’ देण्याची तयारी महावितरणने चालविली आहे. वीज दरवाढीसाठी महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. आयोगाने नागपुरात घेतलेल्या सुनावणीला राजकीय कार्यकर्त्यांसह विविध संस्था, संघटनांनी विरोध दर्शविला. आयोगासमक्ष आपली व्यथा मांडायला कदाचित सामान्य माणूस येऊ शकला नसेल, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या भावना तीव्र नाहीत. महागाईचे चटके सहन करणाऱ्या सामान्य माणसाला वीज दरवाढीचा शॉक असह्य करणारा आहे. महावितरणने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाºया घरगुती ग्राहकांसाठी केवळ आठ पैसे प्रति युनिट दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. ही दरवाढ ८३ पैसे प्रति युनिट इतकी राहील. कारण महावितरणने फिक्स चार्जेस (स्थायी शुल्क) वाढवून ६५ रुपयांवरून १४० रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाºया ग्राहकांना ७५ रुपये अधिक द्यावे लागेल. महावितरणने तोटा सहन करून वीज द्यावी, अशीही अपेक्षा नाही. मात्र, लोकहितासाठी योग्य पावले उचलणेही तेवढेच आवश्यक आहे. वास्तविकत: माफक दरात वीज मिळणे हा सामान्य माणसाचा अधिकारच आहे. तर परवडणारी वीज उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. नागरिकांवर आर्थिक भार टाकणे योग्य नाही. विजेचे दर वाढविण्याऐवजी तिचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला तर यातून मार्ग निघू शकतो. सोबतच कंपनीने वीजचोरी कशी थांबेल यावर भर द्यायला हवा. थकीत वसुलीवरही लक्ष केंद्रित करायला हवे. बड्यांना सूट देताना लहानांना फटका बसणार नाही, असे धोरण आखावे लागेल. हे सर्व प्रामाणिकपणे झाले तर सामान्य नागरिकांवर बोझा टाकण्याची वेळच येणार नाही. यात आव्हाने नक्कीच आहेत. पण प्रयत्न केल्यास मार्गही आहेत. अंधारमय जीवनाशी संघर्ष करणाºया सामान्य माणसाला घरात प्रकाश हवा आहे, मात्र खिशाला परडेल असा. आता महागाईचे चटके सहन करण्याची सहनशक्ती त्यात उरलेली नाही. एकेकाळी वीज दरवाढीविरोधात रस्त्यावर आंदोलन करणारे, आयोगाची सुनावणी उधळून लावणारे आता सत्तेत आहेत. त्यांना या विषयाची जाणही आहे. त्यामुळे त्यांच्याकडून साहजिकच अपेक्षा आहे. ती पूर्ण व्हावी. विजेच्या वाढत्या बिलाविरोधात दिल्लीत आम आदमी जागा झाला व सरकारचे सिंहासन हलविल्याचे उदाहरण फार जुने नाही. त्यामुळे सरकारने वेळीच या विषयावर प्रकाश टाकलेला बरा. अन्यथा कॉमन मॅनचा शॉक सरकारला परवडणारा नसेल.