शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

निवडणूक, युद्ध आणि..

By admin | Updated: October 29, 2014 23:36 IST

ताज्या विधानसभा निवडणुकीचं! शिवाय एकूणच खेळ किंवा स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा विचार तर खूप पूर्वी एकदा थोडा कागदावरही उतरवला होता.

एक विचार बरेच दिवस मनात घोळत होता. तो अधिक स्पष्ट होण्यासाठी निमित्त झालं एका राष्ट्रीय पातळीवरच्या बुद्धिबळ स्पर्धेचं! त्यातही लागोपाठ झालेल्या लोकसभा आणि ताज्या विधानसभा निवडणुकीचं! शिवाय एकूणच खेळ किंवा स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा विचार तर खूप पूर्वी एकदा थोडा कागदावरही उतरवला होता.
म्हणजे एकूण मास्तरकीचं (शिक्षकी पेशाचं) प्रशिक्षण घेण्याच्या काळात विद्याथ्र्याच्या मानसशास्त्रसंदर्भात तेव्हाच्या प्राध्यापकांनी सांगितलेला एक मुद्दा पुन्हा पुन्हा आठवावा असे अनुभव शिक्षणोतर राजकारणात (दुरूनच) अनुभवावे लागले. हल्ली तर एकूणच सामान्य माणूस राजकारणाविषयी (बोलण्यात तरी) अधिक सजग झालेला दिसतो. तर आधी विद्याथ्र्याच्या मानसशास्त्रसंदर्भातला मानसशास्त्रीय विचार असा, जे विद्यार्थी-विद्याíथनी 
अधिक बंडखोर, मारामा:या करणारे वगैरे उपद्रवकारक उद्योग करणारे असतील, त्यांना  क्रीडाशिक्षकांनी भरपूूर शारीरिक ऊर्जा खर्च होते अशा, कबड्डी, खो-खो, धावणो, क्रिकेट आदी खेळांत प्रोत्साहन द्यावे. शिवाय त्यातही बंडखोरी करणा:याकडे वर्गाचे-गटाचे नेतृत्व द्यावे. त्यामुळे होते काय की, त्याच्या ऊर्जेचा उपयोग मारामा:या करून उपद्रव देण्यात खर्च होणार नाही. उलट वर्गाला शिस्त लावण्यासारख्या विधायक कामाकडे त्याचा उपयोग होईल. आता अशी काही मंडळी अधिक दंगेखोर का असतात? तर त्याचे मानसशास्त्रीय कारण म्हणजे, त्यांची युद्धप्रवृत्ती अधिक प्रबळ असते.
माणसाच्या काही उपजत प्रवृत्ती असतात. त्या बहुधा शरीरधारणोशी संबंधित असतात. उदा. भूक, निद्रा, लैंगिकता, क्रीडा, तशी युद्ध ही एक उपजत प्रवृत्ती! अधिक असलेली शारीरिक ऊर्जा खर्च करणारी म्हणून शक्यतो सामूहिक, मैदानी क्रीडाप्रकारांकडे त्या वृत्तीचा विनियोग करण्यासाठी संधी द्यावी. म्हणजे उपद्रवकारक युद्धप्रवृत्तीची खुमखुमी विधायक कामाकडे वळते. ती उदात्तीकृत होते. ही उदात्तीकरणाची प्रवृत्ती प्रकृतीला संस्कृतीकडे नेऊ शकते; अन्यथा नुसत्याच मारामा:या केल्या तर ती विकृती होते.
मग युद्ध, मारामा:या, शारीरिक हिंसा या क्षेत्रतली परिभाषा अशा क्रीडाप्रकारात सर्रास वापरलेली दिसते. हुतुतू, कबड्डी, खो-खो अशा मैदानी देशी खेळांत ‘गडी मेला!’ (आऊट झाला.) प्रतिपक्षाचा ‘गडी मारला’ की आपल्या पक्षाचा गडी (खेळात तरी) ‘जिवंत’ होतो. संजीवनी मंत्रसारखा! धरणो, मारणो, बुकलणो, चितपट करणो ही भाषाच किती हिंसक आहे!
राजकारणात तरी दुसरे काय असते! निवडणूक काळातली वक्त्यांची भाषणो, नंतरच्या किंवा समांतर चालणा:या वृत्तपत्रीय टीका-टिपणीत तर ‘अमक्याने गड राखला, तमक्याचा धुव्वा उडाला, धूळदाण झाली, तोफा डागल्या, मुलुखमैदान (तोफ) उडाली, बालेकिल्ला राखला (किंवा पडला) ही परिभाषा तटस्थ वाचकांची करमणूकही करते आणि नेमके चित्रही उभे करते. व्यूहरचना (पक्षांची) ‘रणनीती’ ही तर चालतेच. आता असेच बुद्धिबळाच्या पटाकडे जाऊ. तेथे तर शह, मात, कोट करणो, आधी ‘प्यादी’ (पायदळ) मारण्यासाठी आणि राजाच्या रक्षणासाठी पुढे करणो. मग क्रमाने सगळे चौरंगी दळ (सैन्य) घोडदळ, उंटदळ, हत्तीदळ त्यांच्या त्यांच्या चालीने (अडीच घर, तिरके, सरळ) राजाच्या रक्षणार्थ झुंजवणो, मग वजीर, प्रधान आहेतच. त्यातही ही ‘व्यूहरचना’, ‘रणनीती’ भविष्याचा अंदाज घेत करीत राहणो, त्यासाठी बुद्धिबळ (पुन्हा बळ) खर्च करणो. प्रतिपक्षाची ही सगळी प्यादी, दळे ‘मारणो’ महत्त्वाचे! मग उरेल तो ‘जितम् मया’ म्हणून विजयी होतो. प्रतिपक्षाला खेळात काय, युद्धात काय, की राजकारणात काय, शह देणो, त्याच्यावर मात करणो ही ‘रणनीती’ खेळणाराच विजयी होतो.
मग युद्ध खेळले जाते आणि खेळाचे युद्ध होते. राजकारणात तर दोन्हींचा समसमासंयोग होतो असे वाटते.
पण.. पण हे सगळे जर उदात्तीकृत संस्कृतीकरणाच्या दिशेने गेले, तरच ती क्रीडा! राजकारणही! अन्यथा विनाशक, हिंसक विकृतीतून अटळपणो विनाशाचीच वाट प्रशस्त होणार!
 
तारा भवाळकर