शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

इलेक्शन वर्ष आहे, निघून ये...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:04 IST

प्रिय विजय मल्ल्या ,स.न.वि.वि.त्या दिवशी पेपरात बातमी वाचली, तू मायदेशी परतण्यास इच्छुक आहे. ‘सुबह का भुला शाम को घर आया’ म्हणून ऊर अभिमानाने भरून आला. छाती ५६ इंचाच्या वर गेली. अगदी राहवलं नाही म्हणून लगेच पत्र लिहायला घेतलं. आधी मोबाईलवरूनच काँग्रॅज्युलेशन करायचे होते पण, तुझा फोन सारखा नॉट रिचेबल येत ...

प्रिय विजय मल्ल्या,स.न.वि.वि.त्या दिवशी पेपरात बातमी वाचली, तू मायदेशी परतण्यास इच्छुक आहे. ‘सुबह का भुला शाम को घर आया’ म्हणून ऊर अभिमानाने भरून आला. छाती ५६ इंचाच्या वर गेली. अगदी राहवलं नाही म्हणून लगेच पत्र लिहायला घेतलं. आधी मोबाईलवरूनच काँग्रॅज्युलेशन करायचे होते पण, तुझा फोन सारखा नॉट रिचेबल येत होता. म्हटलं अख्ख्या भारत सरकारला तू नॉट रिचेबल असताना म्या पामराला कसा उपलब्ध होशील. मग पत्रच लिहायला घेतले.आता तू येणार म्हटल्यावर आमच्या समस्त बँकवाल्यांचा जीव कसा भांड्यात पडला बघ! पडणार का नाही...! साधी रक्कम नव्हे तर ९००० कोटी डावावर लागले आहेत त्यांचे. मोदी साहेबांचे तर विचारूच नका...! कितीतरी दिवसांनी त्यांना अशी आनंदाची बातमी वाचायला मिळाली. २०१९ चे निवडणूक वर्ष तोंडावर आहे. काळा पैसा बाहेर काढू, पळून गेलेल्यांच्या मुसक्या बांधून हजर करू अशा घोषणा गेल्या चार वर्षांपासून करत होते, पण हाती काहीच आले नाही. भारतात पब्लिकमध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. (लोकं मात्र उगाच त्यांच्या वारंवार विदेशात जाण्याला नावे ठेवतात.) आता तू येणार म्हटल्यावर त्यांना अर्धी निवडणूक आत्ताच जिंकल्यासारखे वाटत आहे. या ‘पोस्टर बॉय’ ला कुठे ठेवू, कुठे नको असे झाले आहे बघ! देवेंद्रभाऊंना लगेच सूचना देऊन त्यांनी आर्थर रोड जेलमधील बराक नंबर १२ सर्व सोर्इंनी सज्ज ठेवायला सांगितली. खोलीत भरपूर सूर्यप्रकाश येईल, फ्रेश हवा खेळत राहील, मऊ बिछाना, पाश्चात्त्य पद्धतीचे टॉयलेट अशा सर्व सोई त्यांनी करून घेतल्या आहेत. मोदी साहेबांचे स्वच्छता मिशन कितीतरी दिवस त्यासाठी राबत होते म्हणे... या व्यवस्थेचे खास शुटिंग करून (यासाठी बॉलिवूडमधील काही चित्रपट निर्मात्यांची मदत घेतल्याचीही चर्चा आहे.) त्याचे फोटोग्राफ्स तुला आणि लंडनमधील तुझ्या त्या वकिलालाही पाठविले आहेत. तू मात्र विनाकारण या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावलेस. म्हणे फोटोग्राफ्स बनावट आहेत. आर्थरमधले वातावरण हायजिनिक नाही. आम्ही भारतीय येथे कोणत्या कचराकुंडीत राहतो याची तुला कल्पना नाही. आमची अनेक शहरे नुसती डम्पिंग यार्ड झाली आहेत.बरं ते जाऊ दे. तुला या व्यवस्थेत आणखी काय काय सुधारणा पाहिजेत हे कळव म्हणजे त्या करून घेता येतील. आधी तू भारतात येणे महत्त्वाचे आहे. ‘बघा मी कसा मल्ल्याला भारतात खेचून आणला’ किमान एवढे तरी मोदी साहेबांना आपल्या प्रचार सभेत सांगता येईल. बाकी मुद्दे तर घासूनघासून गुळगुळीत झाले आहेत.आणि हो...एक सांगायचे राहूनच गेले... तू आणि तुझ्यासाखेच ललित, नीरव (हेही मोदीच बरं का!) यांना भारतात आणण्यासाठी सरकारने मोठी शक्कल लढविली आहे. इलेक्शन फंडासाठी तुमच्यासारख्यापुढे हात पसरविण्यापेक्षा त्यांनी निवडणूक रोखे योजनाच आणली. यात तुम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या नावाने बॉण्ड घ्यायचे म्हणजेच त्यांना दक्षिणा द्यायची आणि आपला उल्लू सिधा करून घ्यायचा. बघ पटतं का...? सरळ भारतात ये...बीजेपीच्या नावाने हजार बाराशे कोटींचे बॉण्ड घेऊन टाक म्हणजे पुढचे काम सोप्पे. तर निघ लवकर, ‘बराक नंबर 12’ इज वेटिंग 4 यू...!

(तिरकस)

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या