शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

निवडणूक विशेष लेख: राहुल गांधी, शरद पवारांच्या दौऱ्याचा मविआला लाभ कितपत?

By मिलिंद कुलकर्णी | Updated: March 18, 2024 09:36 IST

लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता तयारीला अधिकच जोर आला आहे

बेरीज-वजाबाकी: मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी संपादक, लोकमत

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे उत्कृष्ट नियोजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा सहभाग, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट, शिवसेना ठाकरे गट, माकप, समविचारी संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मितीत आघाडी यशस्वी ठरली आहे. दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकसाठी दिलेला अर्धा दिवस जसा प्रभाव निर्माण करून गेला, त्याप्रमाणे राहुल गांधी यांच्या यात्रेने प्रभाव निर्माण केला. मालेगावात जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष एजाज बेग, चांदवड येथे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, पिंपळगाव बसवंत येथे माजी आमदार अनिल कदम, नाशकात डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, डाॅ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष आकाश छाजेड, त्र्यंबकेश्वर येथे आमदार हिरामण खोसकर येथे यांनी पूर्ण ताकद लावली. यात्रा झाली; मात्र, याचा लाभ कॉंग्रेसला होईल काय?

राहुल गांधींची शेतीप्रश्नांवर थेट भूमिका

केंद्र सरकार व भाजप यांच्यावर शेतीप्रश्नांविषयी उदासीन राहिल्याचा आरोप विरोधक नेहमी करीत असतात. कृषीविषयक तीन कायदे, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन, नाशिक जिल्ह्यातील कांदा व द्राक्ष उत्पादकांची सुरू असलेली ससेहोलपट यामुळे शेतकऱ्यांच्या असलेल्या नाराजीला विरोधी पक्षांनी हवा देणे अपेक्षित होते. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान चांदवडच्या सभेत शेतीप्रश्नांविषयी घेतलेली थेट भूमिका शेतकऱ्यांना भावली. त्यांनी सुचविलेले पाच उपाय शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशेचा किरण ठरू शकतात, अशी वातावरणनिर्मिती करण्यात त्यांना यश आले. मोठ्या उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत देऊ, पीकविम्याची पुनर्रचना करणार, कांद्यासह सर्वच शेतीमालाचे आयात-निर्यात धोरण शेतकरीस्नेही करणार, शेतकऱ्यांना जीएसटीतून मुक्त करणार, या घोषणा प्रभावी ठरल्या. यात्रेनंतर मतदानापर्यंत हे वातावरण टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत.

मविआच्या उमेदवारांविषयी शरद पवार सतर्क

शरद पवार आणि नाशिक जिल्हा हे समीकरण आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील घडामोडींविषयी पवार हे सजग आणि सतर्क असतात, हे वेळोवेळी दिसून आले. मविप्रच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. यशवंतराव चव्हाण केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक क्षेत्राला बळ देण्याचे कार्य केले. कादवा कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभासाठी वर्षभरापूर्वी ते येऊन गेले. त्यामुळे नाशिकमध्ये पवार यांची म्हणून काही माणसे आहेत. त्यांच्याकडून नाशिकचा कानोसा ते नेहमी घेत असतात. अशी इत्थंभूत माहिती असलेला राज्यस्तरीय नेता दुसरा नाही. राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवल्यात झाली. आता निफाडला आमदार दिलीप बनकर यांच्या मतदारसंघात सभा घेऊन उर्वरित तिघांना इशारा दिला आहे. दिंडोरीत त्यांनी भास्कर भगरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिकमध्येदेखील ते सेनेच्या उमेदवाराविषयी सल्लागाराच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

विजय करंजकरांवर पुन्हा अन्याय?

नाशिक मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मनसेच्या निर्मितीनंतरही सेनेने हा बालेकिल्ला अबाधित राखला. उमेदवारी बदलत राहिल्याने सेनेला यश मिळत गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही मोठी निवडणूक होत आहे. नाशिकच्या बालेकिल्ल्यावर सेनेने जोर दिलेला आहे. राज्यस्तरीय मेळावा नाशकात घेऊन पक्षाने इरादे जाहीर केले. अद्वय हिरे, सुधाकर बडगुजर या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध सरकारने कारवाई केल्यानंतरही पक्ष सक्षमपणे उभा आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत हे नाशिकच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. विधान परिषद निवडणुकीत विजय करंजकर यांचे नाव यादीत असूनही ती निवडणूक होऊ न शकल्याने ते आमदारकीपासून वंचित राहिले. आता खासदारकीसाठी त्यांचेच नाव पक्षाने निश्चित केले आहे. मात्र शरद पवार-संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर करंजकर यांचे नाव मागे पडत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पक्षाबाहेरील उमेदवार शिवसैनिक स्वीकारतील काय? करंजकरांवर पुन्हा अन्याय होईल काय हे लवकरच स्पष्ट होईल.

डॉ. भारती पवार यांच्यावर पुन्हा विश्वास

केंद्रीय आरोग्य व जनजाती कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीविषयी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर देखील नकारात्मक वातावरण तयार करण्याचा झालेला प्रयत्न भाजपने पुन्हा उमेदवारी देऊन उधळून लावला आहे. उच्चविद्याविभूषित, आरोग्य आणि जनजाती कल्याण या दोन्ही खात्यांचा अभ्यास आणि देशभरातील त्यासंबंधीच्या दौऱ्यामुळे डॉ. पवार यांनी सरकार आणि पक्षात स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे. स्थानिक पातळीवर जनसंपर्क, पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासकामांची आखणी व अंमलबजावणी यासंबंधी नाराजी आहे. निरीक्षक राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर अनेक पदाधिकाऱ्यांनी ती उघडपणे मांडल्याचे सांगितले जाते. कांदा व द्राक्ष उत्पादकांची नाराजी हा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याविरोधात आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे डॉ. पवार यांना उमेदवारी मिळणार नाही, असे चित्र निर्माण केले गेले. मात्र पक्षाने निष्ठा व संयमाला महत्व दिले.

शिवसेनेची रणनीती की अतिआत्मविश्वास

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पक्ष आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी असली तरी प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निर्णय घेताना दिसत आहे. अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार बारामतीतून सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी बहाल केली. भाजपवगळता कोणत्याही पक्षाची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नसली तरी अनेकांची घोषणा परस्पर झाली आहे. नाशिकमध्ये आमदारांचा विचार केला तर भाजप : ३, अजित पवार गट : २ असे संख्याबळ महायुतीकडे आहे. शिंदे यांच्या गटाकडे ही जागा असली तरी राजकीय स्थिती विचारात घेता समन्वय व संवादाने उमेदवारी जाहीर व्हायला हवी होती. महायुतीतील दबावाचे राजकारण म्हणून ही उमेदवारी जाहीर केली की, अतिआत्मविश्वास होता, हे कळायला मार्ग नाही.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी