शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

"राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात..."; मुख्यमंत्री शिंदेंच्या या ब्रँडिंगला भाजपची सहमती आहे का?

By यदू जोशी | Updated: June 13, 2023 11:00 IST

दहा महिन्यांनी होणारी लोकसभा निवडणूक व त्यानंतर सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वात लढायची तर त्यांच्या लोकप्रियतेचा टक्का वाढणे अत्यंत आवश्यक आहे.

>> यदु जोशी

मंगळवरची सकाळ एका जाहिरातीच्या चर्चेने सुरू झाली. बहुतेक सर्वच वृत्तपत्रांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने जाहिरात दिली. मथळा आहे, 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे'... या जाहिरातीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क व्यक्त व्हायला सकाळपासूनच सुरुवात झाली. सोशल मीडियात चर्चा रंगली. या जाहिरातीत एका सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला आहे. हे सर्वेक्षण केले कोणी याचा कुठलाही उल्लेख मात्र नाही. तथापि, हे सर्वेक्षण असे म्हणते की भाजपला राज्यातील ३०.२ टक्के तर शिवसेनेला (शिंदे) १६.२ टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप व शिवसेना युतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी इच्छुक आहे. मुख्यमंत्री पदासाठीच्या सर्वेक्षणात राज्यातील २६.१ खक्का जनतेने पुन्हा शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी हवेत असा कौल दिला. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असा कौल २३.२ टक्के जनतेने दिला आहे. याचा अर्थ ४९.३ टक्के जनतेने या जोडीला पसंती दिली आहे.

'दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र' अशी घोषणा गेल्या निवडणुकीत गाजली होती. किंबहुना, भाजपाचा प्रचार या घोषणेभोवतीच फिरला होता. आता येत्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपाने सुरुवात केली असताना, अचानक 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' ही जाहिरात झळकली आहे. या जाहिरातीत केलेल्या दाव्यांवरून आता आरोप-प्रत्यारोपांची, दावे-प्रतिदाव्यांची राळ नक्कीच उठेल. या जाहिरातीच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात. शिंदे यांनी नेमके आजचेच टायमिंग का साधले? कारण त्यांना स्वत:च्या आणि पक्षाच्या राजकीय भवितव्यासाठी हे ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. दहा महिन्यांनी होणारी लोकसभा निवडणूक व त्यानंतर सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वात लढायची तर त्यांच्या लोकप्रियतेचा टक्का वाढणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला १६ टक्के लोकांनी कौल दिल्याचे जाहिरातीत म्हटले असले तरी माहिती अशी आहे की भाजप व काही नामवंत संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार शिंदेंची शिवसेना ६ टक्क्यांपेक्षा आजतरी पुढे नाही.भाजप ३३ टक्क्यांवर आहे. शिंदेंचा हा टक्का १० किंवा त्यापेक्षा अधिक वाढवणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. त्याचवेळी भाजपचा टक्का किमान चार टक्के वाढवावा म्हणजे दोघांमिळून ४६्-४७ टक्केपर्यंत मजल जाईल व लोकसभेच्या ४० जागा जिंकता येतील असे हे गणित आहे. शिंदेचा टक्का दुपटीहून अधिक होणे भाजपची मजबुरी आहे. कारण तसे झाल्याशिवाय महाविकास आघाडीवर मात करता येणार नाही याची भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला कल्पना आहे आणि त्यातूनच शिंदे-फडणवीस यांच्यातील चर्चेनंतर ही जाहिरात दिली गेली असा तर्क मांडता येतो. भाजप-शिवसेना युतीमध्ये आज शिवसेना लंगडी वाटते. समोर महाविकास आघाडी आहे. आगामी निवडणुका जिंकायच्या असतील तर शिंदेंचा टक्का वाढवावाच लागणार आहे. भविष्यात शिंदे खूपच वाढले तरच दोन पक्षांमध्ये संघर्षाचे काही प्रसंग उद्भवतील.

शिंदे वाढू नयेत म्हणून महाविकास आघाडी व विशेषत: ठाकरे सेना असा प्रचार करत आहे की शिंदेंच्या खासदार, आमदारांच्या हाती एक दिवस कमळच असेल. ते कमळावरच लढतील. मात्र तसे काहीही होणार नसून आम्ही युतीमध्येच लढू आणि त्यातही वरचष्मा, नेतृत्व हे शिंदे यांचेच असेल असे आजच्या जाहिरातीतून अधोरेखित करण्यात आले आहे. भाजपच्या नेतृत्वात आम्ही जाण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, उलट आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजप युती लढणार आहे असे या जाहिरातीतून सूचित केले आहे. शिंदे यांच्या समर्थक पाच मंत्र्यांना डच्चू दिला जाणार अशा बातम्या माध्यमांमधून गेले चार-पाच दिवस येत आहेत. तथापि, शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदार, आमदारांची जी बैठक सोमवारी रात्री मुंबईत घेतली, त्यात आपले सगळे सहकारी मंत्री चांगले काम करत आहेत अशी शाबासकी दिली. त्यामुळे डच्चूची चर्चा ही चर्चाच राहणार असे दिसते. मात्र अनिर्बंध वागत असलेल्या दोन-चार मंत्र्यांना कडक शब्दात समज दिली जाईल व वर्तन सुधारण्याची हमी घेतली जाईल असे दिसते.