शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ आखाड्यात शिक्षणाचे खोबरे

By admin | Updated: March 10, 2015 22:41 IST

शिक्षण क्षेत्राचे राजकारण नवे नाही किंबहुना आता तर ते सर्वत्रच आणि सर्वमान्य आहे. त्यामुळेच शिक्षणसंस्था राजकारणाचे अड्डे बनल्या आणि शिक्षणाचा

सुधीर महाजन -

शिक्षण क्षेत्राचे राजकारण नवे नाही किंबहुना आता तर ते सर्वत्रच आणि सर्वमान्य आहे. त्यामुळेच शिक्षणसंस्था राजकारणाचे अड्डे बनल्या आणि शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. विद्यापीठेही यातून सुटली नाहीत. परवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका संघटना नेत्याने कुलगुरुंना अपशब्द वापरले. सार्वजनिक अपमानाने व्यथित झालेल्या कुलगुरुंनी पोलिसांना पाचारण केले. अजून या संदर्भात पोलिसी कारवाई झालेली नाही; पण कुलगुरुपदाची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागणे हे बाबासाहेबांनाही अपेक्षित नव्हते; पण ते येथे घडले. विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटना, राजकारणी धडपडत असतात, कारण आपल्या संस्थांचे हित साधणे हे त्यामागचे खरे कारण असते. व्यवस्थापन समिती ही यासाठी प्रभावी समजली जाते. या समितीत आपल्या समर्थकांची वर्णी लावली तर कोणालाही विद्यापीठ यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे सोपे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पूर्वीही अशी मंडळी होती, की ज्यांचा सर्वत्र प्रभाव होता. वसंत काळे, सुंदर गव्हाणे या जोडगोळीने एकेकाळी विद्यापीठाचे राजकारण गाजविले. हे विद्यापीठ सतत कोणाच्या तरी प्रभावाखाली राहिले. गंगाधर पाथ्रीकर, दत्ता पाथ्रीकर या बंधूंनीही विद्यापीठाच्या नाड्या काही काळ आपल्या हाती ठेवल्या होत्या. त्यानंतर अण्णा खंदारे, भाऊसाहेब राजाळे यांचाही काळ होता. त्यांचे वर्चस्व आमदार सतीश चव्हाणांनी संपविले. चव्हाणांनी अशोक मोहेकर, शिवाजी मदन यांच्यामार्फत नियंत्रण ठेवले. म्हणजे विद्यापीठाच्या राजकारणावर सतत कोणाचे तरी नियंत्रण असते. या राजकारणात तर चव्हाणांनी राजेश टोपेंना मागे टाकले.विद्यापीठात नवीन कुलगुरु आला, की त्याला नियंत्रणात ठेवून आपला कार्यभाग साधता येतो हा साधा हिशेब; पण विठ्ठलराव घुगे यांनी या सर्व राजकारण्यांना बाजूला ठेवले होते. आता कुलगुरु नवे आहेत. त्यांना कह्यात ठेवण्यासाठी राजकारणी, कर्मचारी संघटना, प्राध्यापक संघटना यांच्यातच चुरस लागली. आपला दबाव गट निर्माण करून कार्यभाग साधणे एवढाच उद्योग विद्यापीठात चालू आहे. पूर्वीचे कुलगुरू विजय पांढरीपांडे यांनी या विद्यापीठास नॅकचा दर्जा मिळवून दिला. तो कायम टिकविण्याची जबाबदारी नव्या कुलगुरुंवर आहे; पण या मंडळीकडून सातत्याने कुलगुरु आणि विद्यापीठ प्रसारमाध्यमांद्वारे चर्चेत कसे राहील याचा प्रयत्न केला जातो. सध्या सतीश चव्हाण विरुद्ध प्रा. शंकर उत्तम अंभोरे असा रंग चढला आहे.चव्हाणांना शह देण्यासाठी अंभोरे सरसावले. व्यवस्थापन परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने अनुकूल निर्णय करून घेण्याचा प्रयत्न असतो. गेल्या महिन्यात तर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय पत्रिकेवर चर्चाच झाली नाही. व्यवस्थापन परिषदेद्वारे नोकरभरतीत हस्तक्षेप करता येतो. जवळच्या मंडळींची वर्णी लावता येते. डीन पदासाठी शैक्षणिक पात्रता नसणाऱ्या व्यक्तीची या पदावर वर्णी लावण्यात आली. आता हे प्रकरणच न्यायप्रविष्ट आहे. विद्यापीठाला पूर्ण वेळ परीक्षा नियंत्रक नाही. त्याच्या निवडीचे प्रकरणही न्यायालयापर्यंत पोहोचले. या पदासाठी मुलाखती झाल्या; पण त्याचा निकाल १२ मार्चनंतर लावण्यात येईल. ही प्रकरणे वानगीदाखल. तशी तर ढीगभर आहेत. या राजकीय स्पर्धेत विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण आणि गुणवत्तेचे खोबरे झाले. प्राध्यापक-कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना आहेत; पण विद्यार्थ्यांचे काय? त्यांच्या प्रश्नांची दखल कोण घेणार? विद्यापीठ आपल्या मालकीचे, यासाठी चाललेली साठमारी न थांबणारी आहे. कुलगुरुंविषयी असभ्य भाषा वापरण्याइतपत जर वातावरण दूषित झाले असेल, तर ही स्थिती सुधारणे अवघडच म्हणावे लागेल. कारण हे पद शोभेचे नाही. एवढे घडूनही या घटनेचा साधा निषेधही विद्यापीठात कोणी केला नाही, म्हणजे नैतिक धाक असण्याचा प्रश्नही निकाली निघाला. अशा गोष्टींना आवर घातला नाही, तर विद्यापीठाचा आखाडा होईल.