शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

म्हराठीचा बोलु कवतिके ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 07:33 IST

यंदाचा रेमॅन मॅगसेसे पुरस्कार घोषित झालेले लडाखमधील अभियंता सोनम वांगचुक यांचे मातृभाषेतून शिक्षणाविषयीचे कार्य या पुरस्काराच्या निमित्ताने देशभर पोहोचले.

- मिलिंद कुलकर्णीयंदाचा रेमॅन मॅगसेसे पुरस्कार घोषित झालेले लडाखमधील अभियंता सोनम वांगचुक यांचे मातृभाषेतून शिक्षणाविषयीचे कार्य या पुरस्काराच्या निमित्ताने देशभर पोहोचले. शांतताप्रिय असलेल्या लडाखमध्ये शिक्षणव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला असताना वांगचुक यांनी ‘आॅपरेशन होप’ हे अभियान हाती घेतले. ९५ टक्के विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का असण्याचे कारण म्हणजे मातृभाषेतून शिक्षण नसल्याने विद्यार्थ्यांना गोडी वाटत नसे. हे मूळ दुखणे हेरुन त्यांनी कार्य सुरु केले आणि त्याला चांगले फळ लाभले. हजारो विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. मॅगसेसे पुरस्काराने त्यांच्या या कार्याचा गौरव झाला आहे. प्रश्न असा आहे की, लडाखमधील जनतेला वांगचुक यांच्यासारखा धडपड्या सामाजिक कार्यकर्ता भेटला, तसा महाराष्ट्रातील आदिवासी, भटक्या विमुक्त जाती जमातींना कोणी भेटेल काय? आदिवासी समाज, भटक्यांची भाषा वेगळी आहे. त्यांना मराठीतून शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली. दिवसभर ही मुले त्यांच्या बोलीभाषेत मित्रांशी, नातेवाईकांशी बोलतात आणि शाळेच्या चार तासांमध्ये आम्ही त्याला प्रमाण मराठी भाषेचा डोस पाजत होतो. त्याचा पाया ठिसूळ राहणार आहे. त्याला संकल्पना स्पष्ट होणार नाही, पर्यायाने शिक्षणाची व्यवस्था आहे तोपर्यंत शिक्षण घेईल. आणि पुढे शिक्षण सोडेल. विद्यार्थी गळतीचे हेदेखील एक कारण आहे, याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

मुक्तार्इंनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा या फासेपारधींची वस्ती असलेल्या खेड्यांना नुकतीच भेट दिली. हलखेडा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. पहिली ते चौथीपर्यंत सुविधा असून पटसंख्या ८० आहे. तीन शिक्षक कार्यरत आहेत. एक किरकोळ रजेवर होते. दुसरे शिक्षक तिसऱ्याच शाळेवर काम करतायत. राहुल शिंदे नावाचे शिक्षक भेटले. त्यांनी मुलांची दोन वर्षातील प्रगती सांगितली. वाचता न येणारी मुले आता चांगले वाचतात, असे प्रात्यक्षिकासह दाखविले. मुलांचे अडखळणे, चेह-यावरील हरवलेपण खरे काय ते सांगत होतेच. शिक्षकांना विचारले, जंगलात जैवविविधता असताना त्यांना क कमळाचा आणि ब बदकाचा शिकविला जात आहे. क केळीचा आणि ब बेडकाचा...सांगितला तरी तो पटकन कळू शकेल, नाही का ? शिक्षक विभागाचे आदेश, असे म्हणून त्यांनी हतबलता दाखविली.

गावाच्या उपसरपंच बॅलेस्टिनबाई आणि त्यांचे पती शफी भोसले यांची भेट घेतली असता ते म्हणाले, आमची भाषा वेगळी आहे. आम्ही मूळ राजस्थानातील, त्यानंतर विदर्भात वाशिमजवळ आमची वस्ती होती. ३०-३५ वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यात आलो. या जोडप्याला ब-यापैकी मराठी आणि हिंदी बोलता येते. पण १६०० लोकवस्तीच्या गावातील इतरांना तेवढीही बोलता येत नाही. गळतीचे प्रमाण मोठे आहेच.भाषिक तिढा गंभीर आहे. तिकडे भाषिक जनगणनेच्या आकडेवारीत मराठी चौथ्या क्रमांकावरुन तिस-या क्रमांकावर आल्याचा आनंद आम्ही साजरा करीत आहोत. पण ज्यांच्या भाषांमध्ये पुस्तके नाहीत, लिप्या नाहीत, ज्यांच्या भाषांच्या अस्तित्वाची खूण सहजासहजी आढळत नाही,अशा ५ टक्क्यांहून अधिक लोकांच्या भाषेकडे समाज व शासनाचे दुर्लक्ष होत आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची पावरी भाषा सुमारे ३ लाख २५ हजार ७७२ लोक बोलत असून जनगणनेत हिंदीचीच बोलीभाषा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. आदिवासी आणि भटक्यांच्या बोलीभाषांची अशी अवस्था झालेली आहे. त्याचे सोयरसुतक ना समाजाला ना शासनाला आहे. 

टॅग्स :marathiमराठी