शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कसं असेल कोरोनानंतरचं जग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 08:15 IST

ही नवी व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीयांना आता टाळेबंदी उठण्याचे वेध लागले आहेत. सरकार ३ मेनंतर टाळेबंदी वाढविणार नाही, किमानपक्षी कोविड-१९ आजाराचा फार कहर नसलेल्या भागांमधील टाळेबंदी तरी निश्चित हटविण्यात येईल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. एकदा का टाळेबंदी हटली की, आयुष्य पूर्ववत होईल, असेही अनेकांना वाटत असेल. दुर्दैवाने त्यांना वस्तुस्थितीची जाणीवच नाही. इतिहासात बीसी आणि एडी या दोन कालदर्शक संज्ञांचा नेहमीच वापर होतो. बीसी म्हणजे बिफोर ख्राईस्ट किंवा ख्रिस्त जन्मापूर्वी आणि एडी म्हणजे अ‍ॅनो डोमिनी किंवा ख्रिस्त जन्मानंतर! यापुढे बीसी (कोविडपूर्व) आणि पीसी (कोविडोत्तर) अशा दोन नव्या संज्ञा प्रचलित झाल्यास आश्चर्य वाटता कामा नये! त्यामागचे कारण हे आहे की, भविष्यातील जग डिसेंबर २०१९ पूर्वीच्या जगासारखे अजिबात नसेल.

कोविड-१९ आजाराला आळा घालण्यासाठी बहुतांश देशांनी टाळेबंदी या उपाययोजनेचा सहारा घेतला आहे; मात्र, ही स्थिती कायमस्वरूपी ठेवली जाऊ शकत नाही. जीव वाचविण्याकरिता टाळेबंदी अनिश्चित काळासाठी जारी ठेवल्यास, आजाराने मरणार नाहीत एवढे लोक उपासमारीने मरण्याची दाट शक्यता आहे; त्यामुळे आज ना उद्या टाळेबंदी उठवावीच लागणार आहे. मात्र, तसे करताना एक नवी व्यवस्था जन्माला येणार आहे आणि त्या नव्या व्यवस्थेमुळेच उद्याचे जग कालच्या जगापेक्षा खूप वेगळे असू शकते. कोविड-१९ आजारास कारणीभूत नॉव्हेल कोरोना विषाणूला अटकाव करणारी लस शोधण्यात वैज्ञानिकांना अद्याप यश आलेले नाही आणि काही वैज्ञानिकांच्या मते, कदाचित तशी लस कधीच निर्माण होणार नाही. जीवघेण्या एचआयव्ही विषाणूला प्रतिबंध करणारी लस तरी कुठे अजून तयार करता आली आहे? कोरोना विषाणूच्या यापूर्वी सापडलेल्या प्रजातींसाठी तरी कुठे लस शोधता आली आहे? जर कोरोना प्रतिबंधक लस शोधता आली नाही, तर ‘कोविड-१९’चा प्रकोप अधूनमधून होतच राहील व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शारीरिक अंतर पाळणे, स्वत:ला वेळोवेळी निर्जंतुक करून घेणे, वारंवार हात धुणे याला पर्यायच नसेल.शारीरिक अंतर पाळावे लागण्याची मजबुरीच पुढील काळात नव्या व्यवस्थेला जन्म देणार आहे. ही व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही त्याचे दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शारीरिक अंतर पाळण्याच्या मजबुरीपोटी टाळेबंदी उठल्यानंतरही चित्रपटगृहे अथवा नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटकांचा आस्वाद घेणे शक्य होणार नाही. चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करायची झाल्यास किमान दोन आसने आणि दोन रांगांचे अंतर पाळावे लागेल; त्यामुळे तिकिटांचे दर एवढे महागतील की ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतील. परिणामी, भविष्यात मनोरंजनाची साधने सामूहिकऐवजी वैयक्तिक असतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटके बघण्याचे दिवस कदाचित भूतकाळात जमा होतील. शारीरिक अंतर पाळायचे झाल्यास सार्वजनिक वाहतूक एवढी महागेल की, ती सर्वसामान्यांना परवडणार नाही आणि त्यामुळे लोकांना कमीत कमी प्रवास करावा लागेल, अशी नवीच व्यवस्था कदाचित जन्माला घालावी लागेल; त्यामुळे घरूनच काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) टाळेबंदीतील तात्पुरती व्यवस्थाच कदाचित उद्याच्या जगातील कायमस्वरुपी व्यवस्था असू शकेल.
निकट भविष्यात क्रीडा क्षेत्रही खूप बदललेले दिसू शकते. विना प्रेक्षकांच्या मैदानात सामने हेच कदाचित क्रीडा क्षेत्राचे भविष्य असू शकते. आजवर विकसित पाश्चात्य राष्ट्रांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या वर्चस्वाच्या जोरावर जगावर मजबूत पकड बनवून ठेवली होती. मात्र, कोरोना आपत्तीसमोर त्यांनी सपशेल हार पत्करल्याचे चित्र दिसत आहे, तर तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशांनी या आपत्तीला खूप चांगल्या प्रकारे तोंड दिले आहे; त्यामुळे भविष्यात पाश्चात्य देशांची जगावरील पकड चांगलीच ढिली होऊन नवी जागतिक व्यवस्था अस्तित्वात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कदाचित प्रत्यक्षात या सगळ्याच गोष्टी घडणारही नाहीत. कदाचित काही घडतील, काही घडणार नाहीत किंवा काहीतरी वेगळेही घडेल; पण एक मात्र निश्चित, की कोविडोत्तर जग हे कोविडपूर्व जगासारखे असणार नाही!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या