शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कसं असेल कोरोनानंतरचं जग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 08:15 IST

ही नवी व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीयांना आता टाळेबंदी उठण्याचे वेध लागले आहेत. सरकार ३ मेनंतर टाळेबंदी वाढविणार नाही, किमानपक्षी कोविड-१९ आजाराचा फार कहर नसलेल्या भागांमधील टाळेबंदी तरी निश्चित हटविण्यात येईल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. एकदा का टाळेबंदी हटली की, आयुष्य पूर्ववत होईल, असेही अनेकांना वाटत असेल. दुर्दैवाने त्यांना वस्तुस्थितीची जाणीवच नाही. इतिहासात बीसी आणि एडी या दोन कालदर्शक संज्ञांचा नेहमीच वापर होतो. बीसी म्हणजे बिफोर ख्राईस्ट किंवा ख्रिस्त जन्मापूर्वी आणि एडी म्हणजे अ‍ॅनो डोमिनी किंवा ख्रिस्त जन्मानंतर! यापुढे बीसी (कोविडपूर्व) आणि पीसी (कोविडोत्तर) अशा दोन नव्या संज्ञा प्रचलित झाल्यास आश्चर्य वाटता कामा नये! त्यामागचे कारण हे आहे की, भविष्यातील जग डिसेंबर २०१९ पूर्वीच्या जगासारखे अजिबात नसेल.

कोविड-१९ आजाराला आळा घालण्यासाठी बहुतांश देशांनी टाळेबंदी या उपाययोजनेचा सहारा घेतला आहे; मात्र, ही स्थिती कायमस्वरूपी ठेवली जाऊ शकत नाही. जीव वाचविण्याकरिता टाळेबंदी अनिश्चित काळासाठी जारी ठेवल्यास, आजाराने मरणार नाहीत एवढे लोक उपासमारीने मरण्याची दाट शक्यता आहे; त्यामुळे आज ना उद्या टाळेबंदी उठवावीच लागणार आहे. मात्र, तसे करताना एक नवी व्यवस्था जन्माला येणार आहे आणि त्या नव्या व्यवस्थेमुळेच उद्याचे जग कालच्या जगापेक्षा खूप वेगळे असू शकते. कोविड-१९ आजारास कारणीभूत नॉव्हेल कोरोना विषाणूला अटकाव करणारी लस शोधण्यात वैज्ञानिकांना अद्याप यश आलेले नाही आणि काही वैज्ञानिकांच्या मते, कदाचित तशी लस कधीच निर्माण होणार नाही. जीवघेण्या एचआयव्ही विषाणूला प्रतिबंध करणारी लस तरी कुठे अजून तयार करता आली आहे? कोरोना विषाणूच्या यापूर्वी सापडलेल्या प्रजातींसाठी तरी कुठे लस शोधता आली आहे? जर कोरोना प्रतिबंधक लस शोधता आली नाही, तर ‘कोविड-१९’चा प्रकोप अधूनमधून होतच राहील व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शारीरिक अंतर पाळणे, स्वत:ला वेळोवेळी निर्जंतुक करून घेणे, वारंवार हात धुणे याला पर्यायच नसेल.शारीरिक अंतर पाळावे लागण्याची मजबुरीच पुढील काळात नव्या व्यवस्थेला जन्म देणार आहे. ही व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही त्याचे दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शारीरिक अंतर पाळण्याच्या मजबुरीपोटी टाळेबंदी उठल्यानंतरही चित्रपटगृहे अथवा नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटकांचा आस्वाद घेणे शक्य होणार नाही. चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करायची झाल्यास किमान दोन आसने आणि दोन रांगांचे अंतर पाळावे लागेल; त्यामुळे तिकिटांचे दर एवढे महागतील की ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतील. परिणामी, भविष्यात मनोरंजनाची साधने सामूहिकऐवजी वैयक्तिक असतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटके बघण्याचे दिवस कदाचित भूतकाळात जमा होतील. शारीरिक अंतर पाळायचे झाल्यास सार्वजनिक वाहतूक एवढी महागेल की, ती सर्वसामान्यांना परवडणार नाही आणि त्यामुळे लोकांना कमीत कमी प्रवास करावा लागेल, अशी नवीच व्यवस्था कदाचित जन्माला घालावी लागेल; त्यामुळे घरूनच काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) टाळेबंदीतील तात्पुरती व्यवस्थाच कदाचित उद्याच्या जगातील कायमस्वरुपी व्यवस्था असू शकेल.
निकट भविष्यात क्रीडा क्षेत्रही खूप बदललेले दिसू शकते. विना प्रेक्षकांच्या मैदानात सामने हेच कदाचित क्रीडा क्षेत्राचे भविष्य असू शकते. आजवर विकसित पाश्चात्य राष्ट्रांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या वर्चस्वाच्या जोरावर जगावर मजबूत पकड बनवून ठेवली होती. मात्र, कोरोना आपत्तीसमोर त्यांनी सपशेल हार पत्करल्याचे चित्र दिसत आहे, तर तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशांनी या आपत्तीला खूप चांगल्या प्रकारे तोंड दिले आहे; त्यामुळे भविष्यात पाश्चात्य देशांची जगावरील पकड चांगलीच ढिली होऊन नवी जागतिक व्यवस्था अस्तित्वात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कदाचित प्रत्यक्षात या सगळ्याच गोष्टी घडणारही नाहीत. कदाचित काही घडतील, काही घडणार नाहीत किंवा काहीतरी वेगळेही घडेल; पण एक मात्र निश्चित, की कोविडोत्तर जग हे कोविडपूर्व जगासारखे असणार नाही!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या