शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कसं असेल कोरोनानंतरचं जग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 08:15 IST

ही नवी व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीयांना आता टाळेबंदी उठण्याचे वेध लागले आहेत. सरकार ३ मेनंतर टाळेबंदी वाढविणार नाही, किमानपक्षी कोविड-१९ आजाराचा फार कहर नसलेल्या भागांमधील टाळेबंदी तरी निश्चित हटविण्यात येईल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. एकदा का टाळेबंदी हटली की, आयुष्य पूर्ववत होईल, असेही अनेकांना वाटत असेल. दुर्दैवाने त्यांना वस्तुस्थितीची जाणीवच नाही. इतिहासात बीसी आणि एडी या दोन कालदर्शक संज्ञांचा नेहमीच वापर होतो. बीसी म्हणजे बिफोर ख्राईस्ट किंवा ख्रिस्त जन्मापूर्वी आणि एडी म्हणजे अ‍ॅनो डोमिनी किंवा ख्रिस्त जन्मानंतर! यापुढे बीसी (कोविडपूर्व) आणि पीसी (कोविडोत्तर) अशा दोन नव्या संज्ञा प्रचलित झाल्यास आश्चर्य वाटता कामा नये! त्यामागचे कारण हे आहे की, भविष्यातील जग डिसेंबर २०१९ पूर्वीच्या जगासारखे अजिबात नसेल.

कोविड-१९ आजाराला आळा घालण्यासाठी बहुतांश देशांनी टाळेबंदी या उपाययोजनेचा सहारा घेतला आहे; मात्र, ही स्थिती कायमस्वरूपी ठेवली जाऊ शकत नाही. जीव वाचविण्याकरिता टाळेबंदी अनिश्चित काळासाठी जारी ठेवल्यास, आजाराने मरणार नाहीत एवढे लोक उपासमारीने मरण्याची दाट शक्यता आहे; त्यामुळे आज ना उद्या टाळेबंदी उठवावीच लागणार आहे. मात्र, तसे करताना एक नवी व्यवस्था जन्माला येणार आहे आणि त्या नव्या व्यवस्थेमुळेच उद्याचे जग कालच्या जगापेक्षा खूप वेगळे असू शकते. कोविड-१९ आजारास कारणीभूत नॉव्हेल कोरोना विषाणूला अटकाव करणारी लस शोधण्यात वैज्ञानिकांना अद्याप यश आलेले नाही आणि काही वैज्ञानिकांच्या मते, कदाचित तशी लस कधीच निर्माण होणार नाही. जीवघेण्या एचआयव्ही विषाणूला प्रतिबंध करणारी लस तरी कुठे अजून तयार करता आली आहे? कोरोना विषाणूच्या यापूर्वी सापडलेल्या प्रजातींसाठी तरी कुठे लस शोधता आली आहे? जर कोरोना प्रतिबंधक लस शोधता आली नाही, तर ‘कोविड-१९’चा प्रकोप अधूनमधून होतच राहील व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शारीरिक अंतर पाळणे, स्वत:ला वेळोवेळी निर्जंतुक करून घेणे, वारंवार हात धुणे याला पर्यायच नसेल.शारीरिक अंतर पाळावे लागण्याची मजबुरीच पुढील काळात नव्या व्यवस्थेला जन्म देणार आहे. ही व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही त्याचे दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शारीरिक अंतर पाळण्याच्या मजबुरीपोटी टाळेबंदी उठल्यानंतरही चित्रपटगृहे अथवा नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटकांचा आस्वाद घेणे शक्य होणार नाही. चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करायची झाल्यास किमान दोन आसने आणि दोन रांगांचे अंतर पाळावे लागेल; त्यामुळे तिकिटांचे दर एवढे महागतील की ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतील. परिणामी, भविष्यात मनोरंजनाची साधने सामूहिकऐवजी वैयक्तिक असतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटके बघण्याचे दिवस कदाचित भूतकाळात जमा होतील. शारीरिक अंतर पाळायचे झाल्यास सार्वजनिक वाहतूक एवढी महागेल की, ती सर्वसामान्यांना परवडणार नाही आणि त्यामुळे लोकांना कमीत कमी प्रवास करावा लागेल, अशी नवीच व्यवस्था कदाचित जन्माला घालावी लागेल; त्यामुळे घरूनच काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) टाळेबंदीतील तात्पुरती व्यवस्थाच कदाचित उद्याच्या जगातील कायमस्वरुपी व्यवस्था असू शकेल.
निकट भविष्यात क्रीडा क्षेत्रही खूप बदललेले दिसू शकते. विना प्रेक्षकांच्या मैदानात सामने हेच कदाचित क्रीडा क्षेत्राचे भविष्य असू शकते. आजवर विकसित पाश्चात्य राष्ट्रांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या वर्चस्वाच्या जोरावर जगावर मजबूत पकड बनवून ठेवली होती. मात्र, कोरोना आपत्तीसमोर त्यांनी सपशेल हार पत्करल्याचे चित्र दिसत आहे, तर तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशांनी या आपत्तीला खूप चांगल्या प्रकारे तोंड दिले आहे; त्यामुळे भविष्यात पाश्चात्य देशांची जगावरील पकड चांगलीच ढिली होऊन नवी जागतिक व्यवस्था अस्तित्वात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कदाचित प्रत्यक्षात या सगळ्याच गोष्टी घडणारही नाहीत. कदाचित काही घडतील, काही घडणार नाहीत किंवा काहीतरी वेगळेही घडेल; पण एक मात्र निश्चित, की कोविडोत्तर जग हे कोविडपूर्व जगासारखे असणार नाही!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या