शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
4
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
5
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
6
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
7
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
8
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
9
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
10
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
11
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
12
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
13
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
14
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
15
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
16
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
17
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
18
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
19
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
20
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: पश्चिम घाटाचा इशारा, चौपदरीकरणासाठी, घाटरस्त्यांसाठी मोडतोड चालू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 09:16 IST

महाराष्ट्रात चौपदरीकरणासाठी, घाटरस्त्यांसाठी मोडतोड चालू आहे. ती खूप हानिकारक आहे. पश्चिम घाटाच्या पर्यावरणावर भारत उभा आहे. त्याच्या संवर्धनासाठी किंमत मोजावीच लागेल. त्याला ओरबाडून चालणार नाही.

आपण पश्चिम घाटाचे पर्यावरणीय महत्त्व ओळखण्यात अपयशी ठरलो आहोत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली २०१० मध्ये पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने गुजरात ते तामिळनाडूपर्यंतच्या सहा राज्यांत विस्तारलेल्या पश्चिम घाटाचा अभ्यास करून अहवाल दिला. पश्चिम घाटातील अलीकडच्या बदलांची नोंद घेत सहाही राज्य सरकारांकडून विकासाच्या नावाने या घाटांत होत असलेल्या ढवळाढवळीची गांभीर्याने नोंद घेतली.

पश्चिम घाटाचा सुमारे एक लाख २९ हजार चौरस किलोमीटरचा परिसर संवेदनशील म्हणून घोषित करण्याची शिफारस त्यांनी प्रामुख्याने केली. शिवाय संवेदनशीलतेची तीव्रता लक्षात घेऊन त्याचे तीन भाग पाडले. अतिसंवेदनशील असलेल्या पहिल्या दोन भागांत कोणत्याही प्रकारे भौगोलिक बदल करणारी कामे करू नयेत, खाणकाम, वाळू उत्खनन करू नये, खनिज उत्खनन टप्प्याटप्प्याने बंद करावे, नवे औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभे करू नयेत, नव्या टाऊनशिप उभारण्यास पूर्ण बंदी करावी, अशा शिफारशी त्यात करण्यात आल्या आहेत. पश्चिम घाटात अलीकडे जे घडते आहे, ते पाहता या शिफारशी अनावश्यक वाटत नाहीत. गेल्याच आठवड्यात केरळमध्ये वायनाडला भूस्खलन झाले. २०१८ मध्ये केरळला आलेला पूर असेल किंवा दहा वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण गावच जमिनीखाली गडप झाले होते. अशा घटनांची मालिका वाढते आहे; कारण सरकार पर्यावरणीय संवर्धनाकडे दुर्लक्ष करीत विविध प्रकारचे प्रकल्प राबवीत आहे. माधव गाडगीळ समितीच्या शिफारशींना विविध राजकीय पक्षांच्या सहा राज्यांत सत्तेवर असलेल्या सरकारांनी कडाडून विरोध केला. केरळात रबर लागवड, काजूची लागवड आणि बेसुमार वाळू उपसा, गोव्यात अमर्याद खनिजांची लूट करण्यासाठीचे उत्खनन, कर्नाटकात पर्यटनासाठी रस्ते, वीजप्रकल्पांसाठी धडपड, महाराष्ट्रात रस्तेबांधणीसाठी प्रचंड खोदकाम चालू आहे. पश्चिम घाटाचे पर्यावरणीय संवर्धन करण्यासाठी उपाययोजना तातडीने लागू करण्याची गरज असताना गाडगीळ समितीलाच पूर्णतः विरोध करण्याची भूमिका सहाही राज्यांकडून मांडली जाते.

राजकारणात टोकाचे मतभेद असताना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी समोर असलेल्या शिफारशींना विरोध करण्यावर त्यांचे एकमत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत पाच वेळा अधिसूचना काढून प्रस्ताव चर्चेला मांडला. दोनच दिवसांपूर्वी तो सहाव्यांदा मांडला गेला आहे. त्यावर साठ दिवसांत राज्य सरकार, विविध समाजघटक आणि जनतेने आपले अभिप्राय नोंदवायचे आहेत. त्यांचा साकल्याने विचार करून केंद्र सरकारने अंतिम अधिसूचना काढून पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्र जाहीर करायचे आहे. हा प्रस्ताव सार्वजनिक केल्यानंतर आलेल्या सूचनांवर ७२५ दिवसांत अंतिम निर्णय जाहीर करायचा असतो. मात्र, केंद्र सरकारने तसे न करता मुदत संपताच नवी अधिसूचना जारी करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यानच्या काळात युपीए दोन-सरकार सत्तेवर असतानाच गाडगीळ समितीच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी 'इस्रो'चे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने एक लाख २९ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील म्हणून गृहीत धरावे, अशी शिफारस केली. त्यालाही सहाही राज्यांचा विरोध आहे.

महाराष्ट्रात १७३४० चौ. कि.मी., गुजरात ४४९, गोवा १४६१, कर्नाटक २०,६६८, केरळ ९९९३ आणि तामिळनाडूमध्ये ६९१४ चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशीनुसारच आता सहाव्यांदा अधिसूचना काढून साठ दिवसांत अभिप्राय मागविण्यात आला आहे. वास्तविक भारतावर नैक्रेत्य मान्सून वाऱ्याच्या आधारे येणारा पाऊस पश्चिम घाटाला अडणाऱ्या ढगांमुळेच पडतो. परिणामी असंख्य नद्या या घाटात उगम पावून बंगालच्या उपसागराला मिळतात. हा सारा प्रदेश समृद्ध असण्याला पश्चिम घाटाचे भौगोलिक, पर्यावरणीय स्थान कारणीभूत आहे. त्याचे संवर्धन केले नाही तर निसर्गाच्या या साखळीलाच धोका निर्माण होऊ शकतो. घाटामध्ये दऱ्याखोऱ्यांत आणि कोकण किनारपट्टीसारख्या प्रदेशांत माणसांचे जीवनमान सुधारायला हवे याबद्दल वाद नाही. मात्र, त्याच्या मॉडेल पर्यावरणीय रचनेला धक्का न लावता राबविले पाहिजे. ऊठसूट सर्वत्र रस्ते, कारखाने किंवा नागरीकरण करणे याच मार्गाने जाण्याची गरज नाही.

महाराष्ट्रात चौपदरीकरणासाठी, घाटरस्त्यांसाठी मोडतोड चालू आहे. ती खूप हानिकारक आहे. पश्चिम घाटाच्या पर्यावरणावर भारत उभा आहे. त्याच्या संवर्धनासाठी किंमत मोजावीच लागेल. त्याला ओरबाडून चालणार नाही.

टॅग्स :landslidesभूस्खलन