शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
4
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
5
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
6
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
7
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
8
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
9
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
10
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
11
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
12
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
13
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
14
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
15
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
16
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
17
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
19
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

इतकी का ठिसूळ नाती?

By किरण अग्रवाल | Published: July 05, 2018 10:13 AM

अडचणीच्या घडीतही नात्याची गुंफण उसवलेली मंडळी आपली अहंमन्य भूमिका न सोडता वागताना वा वावरताना दिसून येतात तेव्हा, अशांना नातीच कळत नाहीत की काय, असा प्रश्न पडून गेल्याशिवाय राहात नाही.

नाती ही काचेच्या भांड्यासारखीच असतात. ती तडकलीत की पुन्हा जुळण्याची शक्यता कमीच असते. नाती जपा असे म्हणूनच तर म्हटले जाते. पण कळणारी ही बाब अनेकांना वळत नाही. विशेषत: अडचणीच्या घडीतही नात्याची गुंफण उसवलेली मंडळी आपली अहंमन्य भूमिका न सोडता वागताना वा वावरताना दिसून येतात तेव्हा, अशांना नातीच कळत नाहीत की काय, असा प्रश्न पडून गेल्याशिवाय राहात नाही. नात्यांमध्ये ओढवलेली दुरस्थता व त्यातून कुटुंबकबिल्यात येणारी शुष्कता ही अनेकविध समस्यांना जन्म देणारीच असल्याने हा विषय सामाजिक चिंतेचा तसेच चिंतनाचाही ठरावा.

कुटुंब पद्धतीत वाढलेल्या विभक्ततेने जे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, त्यात नात्यांच्या ठिसूळपणाची बाब अग्रक्रमाने विचारात घेण्यासारखी आहे कारण व्यक्ती-व्यक्तीच्याच नव्हे तर एकूणच सामाजिक वेदनेचा पदर त्याच्याशी निगडित आहे. खरे तर नात्यात रस न उरणे किंवा त्यात महत्त्व न वाटणे या तशा भिन्न बाबी असल्या तरी त्या दोघांचा शेवट संबंध विच्छेदाकडेच नेणारा असतो; पण हे झाले टोकाचे पाऊल. खरीच का नाती अशी टोकाला नेऊन कडेलोट करण्यासारखी असतात, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होणारा असून, त्याची कारणे शोधायला निघता परस्परातील अविश्वास तर त्यामागे आढळून येतोच शिवाय कौटुंबिक जबाबदारीसंबंधीचे सामाजिक भय आज उरले नसल्यानेही ही स्थिती ओढवल्याचे आढळून येते.

अविश्वासातून तुटीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या नात्यांची उदाहरणे कमी नाहीत. पती-पत्नीमधील विश्वास संपल्याने विकोपाला गेलेली भांडणे जागोजागी पोलीस दप्तरी नोंद होत असतात. लग्नाला तब्बल १९ वर्षे झालेली व पदरी दोन अपत्ये असताना सिनेमात काम करण्याच्या हौसेपोटी गायब राहणाऱ्या पत्नीबद्दल मुंबईतील भायखळा पोलिसांकडे अलीकडेच दाखल झालेली तक्रार त्यापैकीच एक. प्रस्तुत प्रकरणातील खरे खोटे संबंधिताना ठाऊक; परंतु नात्यातील दुरावा वाढण्यास अविश्वास कारणीभूत ठरत असल्याची शेकडो उदाहरणे देता येणारी आहेत. ती जशी चिंतेची आहे तितकीच, किंबहुना त्यापेक्षा अधिक चिंताजनक बाब आहे ती कुटुंब कर्तव्याबद्दल सामाजिक धाक न उरल्याची. त्याकडे समाजधुरिणांनी गांभीर्याने लक्ष पुरवण्याची गरज आहे.

एका रुग्णालयात अनुभवयास मिळालेली दोनच उदाहरणे यासंदर्भात पुरेशी बोलकी ठरावीत. त्यापैकी पहिले म्हणजे, साठीतील एक महिला पक्षाघात झालेल्या आपल्या पतीला रुग्णालयात घेऊन आलेली. काहीही करा, यांना वाचवा अशी तिची याचना. सोबत कुणीच कसे नाही, असे विचारता जी बाब कळली ती खरी अस्वस्थ करणारी. म्हणाली, मुलगा रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या पथकात आहे. सूनबाईही डॉक्टर आहे. पण त्यांना वेळ नाही. विशेष म्हणजे, ज्या रुग्णालयात ही महिला पतीला घेऊन आली, तेथून मुलाचे घर जवळच आहे. पण सासू-सासºयास रुग्णालयात जेवणाचा डबा देण्याचीही सूनबाईची तयारी नाही. डोळ्यात आसवं घेऊन खिन्न मनाने नशिबाला दोष देत ही महिला आपल्या पतीच्या रुग्णालयीन सेवेत व्यस्त आहे.

दुसरे उदाहरण, पती-पत्नीचे जमत नाही. एकुलता एक मुलगा असल्याने व समाजात बदनामी नको म्हणून मुलाचे आई-वडील पडती बाजू घेत सूनबाईशी जुळवून घ्यायला तयार आहेत; पण तडकलेली काच जुळायला तयार नाही. अशात मुलाचा अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाली. म्हातारे आई-वडील जिवाच्या आकांताने धडपडत आहेत. पण सूनबाई अशा प्रसंगीही पाठीशी उभे राहायला तयार नाही. नावाला रुग्णालयात येऊन एकदा भेटून गेली. काही झाले तर कळवा, असे सांगून गेली. काही झाले म्हणजे काय अपेक्षित आहे तिला याचाच विचार करीत म्हातारा-म्हातारीचे डोळे टपटप टपकत आहेत. नात्यांमधले उसवलेपण किती गंभीर पातळीवर पोहचले आहे तेच यातून स्पष्ट व्हावे. वृद्ध माता-पित्यांकडे दुर्लक्ष करणाºया पाल्यांना जरब बसविणारा कायदा सरकारने केला आहे; पण ‘आपलेच दात आणि आपले ओठ’ची भावना हतबल करीत असते. म्हणजे कायदा असून त्याचा उपयोग करता येत नाही व सामाजिक भयही उरले नाही. माता-पित्यांना वाºयावर सोडून देणाºयांचा कान धरायला कुणी पुढे येत नाही. नाती ठिसूळ होताहेत ती त्यामुळेच. समाजशास्त्रींनी ही नाती टिकवण्यासाठी व जगवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप